शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - मुस्लीम आरक्षणाच्या नशिबी न चर्चा, न मोर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 05:23 IST

आर्थिक दुर्बल असलेल्या, मागासलेल्या, शोषित वंचित मुस्लीम समाजाला आरक्षण मिळू न देणं हे अन्यायकारक नाही का?

ठळक मुद्देनिवडणुका आल्या की आपापल्या पक्षाचा राजकीय अजेंडा समाजापर्यंत न थकता न चुकता पोहोचवणाऱ्या या आघाड्यांनीदेखील समाजाची हेळसांड  आपापल्या पक्षनेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं  काम करावं आणि मुस्लीम आरक्षणासंबंधी आग्रह धरावा.

नासिर ताजुद्दीनभाई इनामदार

महाराष्ट्रात आरक्षणाच्या संबंधाने सामाजिक अस्वस्थता प्रचंड वाढली आहे; कारण न्यायालयाने  मराठा आरक्षण रद्द ठरवलं तसंच ओबीसींचंदेखील राजकीय आरक्षण संपुष्टात आणलं आहे आणि मुस्लीम समाज तर शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी जाहीर झालेलं ५% आरक्षण कोर्टानं ग्राह्य धरलं तरी लागू होत नाही म्हणून अस्वस्थ असून, न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याकरिता अनेक आंदोलनं झाली, अनेक मोर्चे झाले. सरकारने मराठा समाजाकरिता  आरक्षण जाहीर केल्यानंतर अतिशय आनंद झाला होता. त्यापाठोपाठ मुस्लीम समाजालादेखील मिळालेलं आरक्षण लागू होईल हा आशावाद बळावला होता; पण न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण रद्द झालं आणि सगळाच हिरमोड झाला.

मराठा आणि ओबीसी  आरक्षणाची प्रक्रिया अडचणीत असताना एका गोष्टीची खूप खंत वाटते ती म्हणजे न्यायालयाने ग्राह्य धरलेलं मुस्लीम समाजाचं आरक्षण मिळवून देण्याकरिता न कोणी बोलताना दिसतात न प्रयत्न करताना दिसतात. निवडणुका आल्या की तेवढ्यापुरता हा विषय चघळला जातो आणि नंतर  बासनात गुंडाळून ठेवला जातो. अंमलबजावणी तर सोडाच; पण मुस्लीम आरक्षणाच्या नशिबी न चर्चा न मोर्चा असं होऊन बसलं आहे.आर्थिक दुर्बल असलेल्या, मागासलेल्या, शोषित वंचित  मुस्लीम समाजाला आरक्षण मिळू न देणं हे अन्यायकारक नाही का?  ही शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांशी प्रतारणा नाही का? २००६ मध्ये सादर झालेला न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समितीचा अहवाल आणि २००९ मध्ये आलेला न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा यांचा अहवाल, त्याचबरोबर २०१३ या वर्षी तत्कालीन महाराष्ट्र सरकारकडे सादर झालेला मेहमूद उर रहमान समितीचा अहवाल;  सर्वांनीच मुस्लीम समाजाचं शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय मागासलेपण अधोरेखित केलं आहे आणि याच आधारावर मुस्लीम समाजाला मिळालेलं आरक्षण न्यायालयानेदेखील ग्राह्य धरलेलं आहे. असं असतानादेखील ते लागू न करणं  अतिशय  वेदनादायी आणि अस्वस्थ करणारं आहे.

मुस्लीम समाजाचं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय मागासलेपण सर्वश्रुत असतानादेखील व सरकारच्या समित्यांनी ते अधोरेखित केलेलं असतानादेखील धर्मावर आधारित आरक्षण म्हणून केविलवाणा विरोध करणाऱ्या व ‘सबका साथ सबका विकास’ म्हणून केंद्रात सत्ता चाखणाऱ्या सत्ताधीशांनी यात आपली भूमिका निभावली पाहिजे.  मुस्लीम समाजालादेखील विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कर्तव्य  पूर्ण करून मुस्लीम समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक हेळसांड थांबवली पाहिजे. यात सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ती अल्पसंख्याक आघाड्यांवर. अशा आघाड्या प्रत्येकच पक्षात आहेत. निवडणुका आल्या की आपापल्या पक्षाचा राजकीय अजेंडा समाजापर्यंत न थकता न चुकता पोहोचवणाऱ्या या आघाड्यांनीदेखील समाजाची हेळसांड  आपापल्या पक्षनेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं  काम करावं आणि मुस्लीम आरक्षणासंबंधी आग्रह धरावा. बाकी समाजदेखील इतर कुठल्याच गोष्टींची तुमच्याकडून अपेक्षा ठेवत नाही. एकंदरीतच मुस्लीम समाजाच्या या सर्व परिस्थितीचा आणि मागणीसंबंधीच्या भावना शायर एजाज कमर साहेब यांनी आपल्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत. ते लिहितात-  

हालात जमाने के संभलने नही देते,हम साथ चलते है तो चलने नही देते,कहते फिरते है नफरत की हवाओ को मिटा दो,और उल्फत के चरागो को तो जलने नही देते...

(लेखक मुस्लीम सेवा समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष आहेत)naseerinamdar1@gmail.com

टॅग्स :reservationआरक्षणMuslimमुस्लीमGovernmentसरकार