शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

ना धनुष्य, ना बाण! ठाकरेंपेक्षा शिंदेंनाच जड जाणार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 09:15 IST

राज्याच्या राजकारणात ‘धनुष्यबाण’च घायाळ झाला आहे. रामायण, महाभारत काळापासून शौर्याचे प्रतीक मानल्या गेलेल्या धनुष्यबाणावर शिवसेनेच्या संदर्भात गोठण्याची पाळी आली आहे.

भारतातील निवडणुकांमध्ये चिन्हाचे कमालीचे महत्त्व आहे. कारण, राजकीय पक्षांचे प्रभूत्व आणि लोकमान्यता सिद्ध करण्यासाठीच्या लढाईतील ते अंतिम महत्त्वाचे साधन आहे. ईव्हीएमने ‘ताई, माई अक्का, ...वर मारा शिक्का’ ही घोषणा मिटवली; पण चिन्हांचे महत्त्व कायम आहे. कारण, आधीची मतपेटी असो की आताची ईव्हीएम, उमेदवाराचे नाव आणि त्याच्यासमोरील निवडणूक चिन्ह बघूनच मतदान होत असल्याने उमेदवार, त्याचा पक्ष (वा अपक्ष)  या इतकेच चिन्हाचे गारुड मतदारांवर असते. चिन्ह हे त्या- त्या राजकीय पक्षाची अस्मिता असते. प्रादेशिक अस्मितेचे राजकारण करीत आलेल्या शिवसेनेवर त्यांचे साडेतीन दशकांपासूनचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गमावण्याची वेळ आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढील महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे वा एकनाथ शिंदे गटालाही हे चिन्ह वापरता येणार नाही, असा आदेश दिला आहे. ‘शिवसेना’ हे नाव वापरायचे असेल तर दोन्ही गटांनी स्वत:च्या गटाचे नाव जोडून ते वापरण्यास आयोगाने अनुमती दिली आहे.  दोन्ही गटांनी आपापले गट कोणत्या नावाने ओळखले जावेत याचे पर्याय सोमवारपर्यंत द्यावेत, असेही आयोगाने सांगितले आहे. हा सगळा घटनाक्रम बघता राज्याच्या राजकारणात ‘धनुष्यबाण’च घायाळ झाला आहे. रामायण, महाभारत काळापासून शौर्याचे प्रतीक मानल्या गेलेल्या धनुष्यबाणावर शिवसेनेच्या संदर्भात गोठण्याची पाळी आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे अंतर्विरोधाने पडेल असे तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने म्हणत. शिवसेनेत निर्माण झालेल्या आणि भाजपने पाठबळ दिलेल्या अंतर्विरोधातूनच ते सरकार पडले. त्या अंतर्विरोधाचा पुढचा प्रवास आता शिवसेनेची मोठी ओळख असलेल्या धनुष्यबाणाचे अस्तित्व संकटात सापडण्यापर्यंत येऊन ठेपला आहे. धनुष्यबाण गौरवाने मिरविणाऱ्या शिवसेनेचा मुख्य सहभाग असलेले उद्धव ठाकरे सरकार पाडण्यात भाजपने महत्त्वाची भूमिका बजावली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आता ठाकरे- शिंदे यांच्या गटांदरम्यान धनुष्यबाण चिन्ह मिळविण्यासाठी निकराची लढाई होत असताना आयोगाने हे चिन्ह तूर्त दोघांनाही नाकारले आहे.

राज्याराज्यातील बिगर भाजप सरकारे पाडण्याचा सपाटा लावलेल्या भाजपच्या दबावाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठविल्याची टीका आता ठाकरे गटाकडून होत आहे. ईडी, सीबीआयनंतर आता आयोगही केंद्र सरकारच्या दबावाखाली वागत असल्याचा निशाणाही साधला गेला. त्याचवेळी आयोगाने यापूर्वी काँग्रेससह अन्य पक्षांच्या अंतर्गत लढाईत त्यांचे निवडणूक चिन्ह गोठविले होते आणि दोघांनाही स्वतंत्र चिन्ह घ्यायला लावले. तोच न्याय आयोगाने शिवसेनेबाबतही लावला. मग, त्यात पक्षपात कसा झाला, असे समर्थन आयोगाच्या निर्णयाच्या बाजूने बोलत असलेले लोक करीत आहेत. धनुष्यबाण गोठविण्याचा अंतरिम निर्णय हा अंतिम निर्णयातही कायम राहिला तर केवळ ठाकरे गटालाच नव्हे तर एकनाथ शिंदे गटालाही तो मोठा धक्का असेल. धनुष्यबाण दोघांपैकी कोणालाही मिळण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. दोघांच्या बाजूचे आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधी हे धनुष्यबाण चिन्हावरच निवडून गेलेले आहेत आणि आता हे चिन्ह नसेल तर नवीन चिन्ह घेणे आणि ते प्रस्थापित करण्याचे आव्हान दोघांसमोरही असेल. त्यामुळे आयोगाने अंतिमत: धनुष्यबाण गोठविला तर त्याचा फटका दोघांनाही बसणार आहे.

उद्धव यांच्याकडे ‘ठाकरे’, ‘मातोश्री’ आणि ‘शिवसेना भवन’ हे ब्रँड तरी आहेत. शिंदे यांच्याकडे तेही नसल्याने उलट नव्या चिन्हासह मतदारांना सामोरे जाताना त्यांना अधिक कठीण परीक्षा द्यावी लागेल असे दिसते. अंधेरी पूर्वमध्ये शिंदे गट लढणार नसून ठाकरे गट लढणार असल्याने या निवडणुकीपूरते नुकसान हे निर्विवादपणे ठाकरे गटाचे आहे. २०१९ च्या निवडणुकीत धनुष्यबाणावर शिवसेना या ठिकाणी जिंकली होती. आता धनुष्यबाणच निवडणुकीत नसणे ही ठाकरे गटासाठी मोठी डोकेदुखी आहे. कालच्या निर्णयाबद्दल आयोगाला दोष देणे, आयोग हे केंद्र सरकारचे बटिक असल्याच्या टीकेची राळ उठविणे आणि त्यातून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न दिसत आहे. ही सहानुभूती मिळते की नाही याचा फैसला जनतेच्या न्यायालयातच होईल.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे