शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन - कोरोना विषाणूचा इतिहास नऊ दशकांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 23:12 IST

कोरोना विषाणू त्याच्या अजून वेगळ्या स्वरूपात प्रकटला ते २००३ च्या जागतिक उद्रेकात म्हणजेच सार्स (र५ी१ी ंू४३ी १ी२स्र्र१ं३ङ्म१८ २८ल्ल१िङ्मेी - रअफर) आणि त्यावेळी त्याच्या त्या रूपाचे नाव होते

डॉ. राजन वाल्हे ।

कोरोना विषाणू प्रथमत: १९३०च्या दशकात प्राण्यांमध्ये रोगकारक अस्तित्व म्हणून आढळला. १९६०च्या सुमारास तो मानवी श्वसन संस्थेत संसर्गरोग निर्माण करणारा घटक आहे असे समजले. मानवी कोरोना विषाणू या सदराखाली प्रथम निदर्शनास आलेले करोना विषाणू म्हणजे : २२९ ए, डउ४३, डउ१६ आदींचे वर्णने आहेत. परंतु, त्यांचे सखोल असे अन्वेषण झालेले दिसत नाही. कोरोना विषाणूसदृश कण प्रामुख्याने नवजात शिशूंच्या विष्टेत ग्यास्ट्रोइंटेरायटीस आणि एनडो-कार्डायटीस संभाव्य रोगकारक अस्तित्व म्हणूनही मिळालेत. परंतु, तत्कालीन तांत्रिक मर्यादेमुळे त्यांचा बारकाईने अभ्यास होऊ शकला नाही.

कोरोना विषाणू त्याच्या अजून वेगळ्या स्वरूपात प्रकटला ते २००३ च्या जागतिक उद्रेकात म्हणजेच सार्स (र५ी१ी ंू४३ी १ी२स्र्र१ं३ङ्म१८ २८ल्ल१िङ्मेी - रअफर) आणि त्यावेळी त्याच्या त्या रूपाचे नाव होते सार्स करोना विषाणू (रअफर उङ्म१ङ्मल्लं श््र१४२- रअफर-उङ्मश्); नवीन श्वसनसंस्था रोगकारक म्हणून. हा उद्रेक साधारण नऊ महिने चालला. त्यात सुमारे ८००० लोकांना संसर्ग झाला व अंदाजे ७७५ लोकांचा जीव त्याने घेतला. बरेच तज्ज्ञ असे मानतात की, सार्स कोरोना विषाणूची उत्क्रांती सार्स कोरोना विषाणूसदृश विषाणूपासून त्याच्या नैसर्गिक स्रोतात म्हणजेच वटवाघळात व मध्यंतरीच्या यजमानात (इंटरमिजीयेट होस्ट) म्हणजे एकप्रकारच्या मांजरात झालेली आहे, असे संशोधक सुसान पौटनेन उल्लेख करतात.जसे की सार्स उद्रेक हा २००३ मध्ये नियंत्रणात आला व विषाणूने पुन्हा डोके वर काढले नाही. नवीन कोरोना विषाणू २०१२ मध्ये मध्य पूर्व जगतात उदयास आला. त्याचे नाव ‘मर्स कोरोना विषाणू’. तो सौदी अरेबियात व इतर मध्य पूर्व देशात बऱ्याच श्वसनसंस्था संसर्गांना कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले. या संसार्गात मृत्युदर खूप जास्त (अंदाजे ५० टक्के; प्रारंभीच्या उद्रेकात) असला तरी काही तुरळक केसेस वगळता २०१३ पर्यंत उद्रेकाची गती जास्त नव्हती. २०१४ च्या आॅगस्टपर्यंत एकूण ८५० प्रकरणे (केसेस) आणि साधारण ३३० मृत्यू या मर्स कोरोना विषाणुमुळे झाले, असे फेहर व पर्लम्यान (२०१५) या संशोधकांनी लिहिले आहे.

सार्स व मर्सनंतर मानवी कोरोना विषाणू अजून वेगळ्या रूपात अवतरला. तो २०१९ डिसेंबरमध्ये जेव्हा काही अनिश्चित कारणामुळे उद्भवलेल्या न्युमोनियाचे रुग्ण चीनच्या वूहान शहरातील रुग्णालयात दाखल झाले. हे रुग्ण वूहानच्या सीफूड व वेट अ‍ॅनिमलव्होलसेल मार्केटशी संबंधित होते. प्रारंभीच्या तपासणी अहवालात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची संभावना वर्तविली. ११ फेब्रुवारी २०२० ला डब्ल्यूएचओने नव्या ‘मानवी कोरोना विषाणू आजार २०१९’चे ‘कोव्हिड-१९’ असे नामकरण केले. त्याच्या घटनाक्रमानुसार अभ्यास हसीन रोथान आणि इतर संशोधकांनी (२०२०) खालीलप्रमाणे मांडला आहे. पहिल्या केसेसची नोंदणी डिसेंबर २०१९ : पाच रुग्ण एआरडीएस (अक्यूट रेस्पीरेटरी डीस्टेस सिन्ड्रोम) या लक्षणांससह रुग्णालयात दाखल झाले व त्यात रुग्ण दगावला. २ जानेवारी २०२० पर्यंत ४१ रुग्ण दाखल व करोना विषाणू संसर्ग झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालात सिद्ध. २२ जानेवारी २०२० रोजी ५१७ रुग्णांची नोंद (चीनमधील २५ शहरातील); पहिले १७ मृत्यूंची नोंद. २५ जानेवारी २०२० रोजी १९७५ केसेसची नोंद व पुष्ठी. एकूण ५७ मृत्यू. ३० जानेवारी २०२० रोजी ७७३४ केसेसची चीनमध्ये पुष्टी व ९० इतर देशातल्या केसेसची नोंद. एकूण मृत्युदराची गणना २.२ टक्के.

आजतागायत (या लिखाणापर्यंत) ‘कोव्हिड-१९’ची जागतिक आकडेवारी अशी : एकूण केसेस ५,४२,३८५, त्यातले मृत्यूमुखी २४,३६८ आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,२५,४९०. मृत्युदर अंदाजे ४.४ टक्के. ‘कोव्हिड-१९’ची सामान्य लक्षणे आहेत ताप, खोकला, थकवा, त्यासोबत डोकेदुखी, थुंकी येणे, अतिसार, इ. यात असे पाहणे महत्त्वाचे ठरते की ‘कोव्हिड-१९’, सार्स, मर्स व इतर फ्लूसदृश आजारांच्या लक्षणांमध्ये बरेचसे साम्य आहे. प्रतीबंधात्मक उपाय करताना यामुळे गोंधळ होऊ शकतो. श्वसन निष्कासिते, थेंबे आणि श्वसनस्राव हे ‘कोव्हिड-१९’चे ज्ञात प्रेषण मार्ग आहेत. काही बाबतीत जसे की मूत्र वा मल मार्गाने होणारे प्रेषण - ज्यावर अजून अभ्यास गरजेचा आहे. फारसा विचार प्रतिबंधाच्या दृष्टिकोनातून होताना दिसत नाही. ‘कोव्हिड-१९’चा मृत्युदर कमी असला तरी सहज-सोपा प्रेषण मार्ग आणि संसर्गस्रोत परिसरातील संभाव्य प्राप्तकर्ता यांमुळे संसर्ग दर कळीचा आणि काळजीचा मुद्दा असून, त्याची उपाययोजनात विशेष दखल घेतली पाहिजे. म्हणूनच अलगीकरणाच्या निकषांची काटेकोर पालन व जनसामान्यात त्याबद्दल जागरुकता खूप जरुरी आहे. भारतासारख्या देशात जेथे एकूण लोकसंख्येसाठी असलेली वैद्यकीय सुविधांची स्थिती, वैद्यकीय, आहार, स्वच्छतेविषयी जागरुकता इ. पाहता कठोर उपाययोजनांचीच गरज आहे जे की आपण आता बघतो व करतो आहोत. शासनाने घोषित केलेल्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करूया आणि ‘कोव्हिड-१९’ला संपवू या.(लेखक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत, पुणे)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई