शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

सुरू झालाय अर्थशास्त्रचा नव्याने विचार

By admin | Updated: November 23, 2014 02:00 IST

युरोपच्या औद्योगिक विकासानंतर देखील हीच स्थिती होती. इंग्रजांच्या लुटीमुळे आज देशाची ही दुर्दशा झाली आहे.

युरोपच्या औद्योगिक विकासानंतर देखील हीच स्थिती होती. इंग्रजांच्या लुटीमुळे आज देशाची ही दुर्दशा झाली आहे. आज जेव्हा जगाच्या स्तरावरच आर्थिक दुर्दशा आली आहे तेव्हा मार्गदर्शनाकरिता भारताच्या तत्त्वांचा अभ्यास करावा लागेल. ही पूर्ण प्रक्रि या दीर्घकालीन आहे. 
गोष्ट तर जुनीच आहे, बालपणी आईन सांगितलेली. पण आजच्या अ(न)र्थशास्त्नास अचूक लागू पडते. चंगू-मंगू दोन मित्न होते. गावात राहायचे. आळशी होते, काहीच कामधंदा करीत नव्हते. दोघांच्या बायका कष्टाळू होत्या. घरकामासोबतच कमाई पण त्याच करायच्या. पूर्ण घर चालवायच्या. एक दिवस चंगूच्या बायकोने त्याला खूप फैलावर घेतले. मटका भरून लिंबू-सरबत करून दिले आणि शेजारच्या गावात बाजारात जाऊन विकायला सांगितले. संयोगाने त्याच दिवशी मंगूच्या बायकोने पण मंगूला रागावले आणि संत्र्याचा रस भरून बाजारात पाठवले. दोघींनी ताकीद दिली की कोणालाही एक पेला पण फुकटात द्यायचा नाही. एक रु पया प्रति ग्लास घेऊनच द्यायचे. विशेष ताकीद होती की मंगूने चंगूला व चंगूने मंगूला बिलकुल फुकटात सरबत द्यायचे नाही. दोघे मित्न शेजारच्या गावाला निघाले. डोक्यावर भरलेले घडे, तापतं ऊन आणि कामाची कधी सवय नाही, लवकरच दोघेही थकले. झाडाखाली बसले. चंगू म्हणाला, तहान लागलीय. मंगू म्हणाला, ‘‘बायकोने स्पष्ट सांगितलंय, स्वत: प्यायचं नाही आणि फुकटात मंगूला द्यायचं नाही. मंगू - फुकटात कोण मागतय? हा घे एक रु पया आणि दे एक ग्लास सरबत.’’ आता रु पया मंगूकडे होता. एक ग्लास संत्ना रस त्याने घेतला. आता Aरुपया चंगूकडे. शेयर बाजारात पैसे गुंतवणा:या सुजाण वाचकांना कळलेच असेल की लवकरच दोन्ही घडे रिकामे झाले. एक रुपयाने इकडून तिकडे खूप चलन करून दोघांचाही टर्नओवर बराच वाढवला. मंगूने 2क्क् ग्लास रस विकला आणि चंगूने 2क्क् ग्लास सरबत. घरी गेल्यावर दोन्ही बॅलन्सशिटना अप्रतिम प्रतिसाद गृह मंत्नालयाकडून मिळालाच असणार. 
विकासाची अशीच अर्धवट कल्पना घेऊन गेली अनेक वर्षे पूर्ण जगच चंगू-मंगूचा खेळ खेळतंय. परिणामी  मंदीचे वैश्विक चक्र, जागतिक प्रदूषण अशा समस्यांनी मानवता ग्रासित झालेली दिसते. मूळ अडचण संतुलनाची आहे. पर्यावरणप्रेमी असाल तर विकासाला विरोध, विकासाकडे फक्त लक्ष दिले तर निसर्गाचं वाटोळं, व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचं म्हणाल तर समाजाकडे दुर्लक्ष, समाजवादाची अति झाली तर व्यक्तीकडे दुर्लक्ष़़़ सरकारचं नियंत्नण किती असावं आणि खाजगीकरण किती? पूर्ण जगच या द्वंद्वात फसलेलं दिसतंय. या सर्वावर शाश्वत उपाय म्हणून एक नवीन अर्थशास्त्नाचा विचार जगात सुरू झालाय. भारत अनेक सहस्रकं जगात सर्वात श्रीमंत व उत्पादक देश राहिलेला आहे. जगातील सध्याच्या श्रीमंत देशांची संघटना असलेल्या एका संघटनेने सहस्रकाच्या बदलाच्या वेळी इसवी सन 2क्क्क् मध्ये अंगास मेडिसन नावाच्या अर्थशास्त्र्याला जगाच्या आर्थिक इतिहासावर संशोधन करण्याचा ठेका दिला. इसवी सनाच्या सुरुवातीपासून 2क्क्क् वर्षाचा आर्थिक इतिहास अंगास मेडिसनने लिहिला. त्याने निर्विवादपणो सिद्ध केले की 14 व्या शतकार्पयत भारताने जगाचे नेतृत्व केले. जगाच्या सकल उत्पादनाच्या दोनतृतीयांश 66 टक्के भाग भारताचा होता. चीनच्या उदयानंतर 16व्या शतकात हा थोडा कमी होऊन 33 ते 4क् टक्क्यार्पयत आला. पण हे मात्न नक्की की 18व्या शतकात इंग्रजांचे राज्य भारतात रूढ होण्यापूर्वी भारत जगाचा निर्विवाद नेता होता. युरोपच्या औद्योगिक विकासानंतर देखील हीच स्थिती होती. इंग्रजांच्या लुटीमुळे आज देशाची ही दुर्दशा झाली आहे. आज जेव्हा जगाच्या स्तरावरच आर्थिक दुर्दशा आली आहे तेव्हा मार्गदर्शनाकरिता भारताच्या तत्त्वांचा अभ्यास करावा लागेल. ही पूर्ण प्रक्रिया दीर्घकालीन आहे. (लेखक अर्थतज्ज्ञ आहेत.)
 
विकास म्हणजे फक्त पैशाची प्रचुरता असा न होता शिक्षण, स्वास्थ्य, कला या सर्व अंगांचा विकास अपेक्षित आहे. 
विकासाची कल्पना भोगाच्या अतिरेकावर नसून आनंदाच्या प्राप्तीला महत्त्व देणारी आहे. आनंद नेहमी सामूहिकच असतो. 
व्यक्तीला स्वत: काही प्राप्त झाले, नवीन मिळाले तरी ते जोवर कोणाला सांगत नाही तोवर आनंद मिळत नाही. 
ही सामूहिक आनंदाची कल्पना विकासाचा केंद्रबिंदू झाली, तर सर्व योजनांचे लक्ष्य व्यक्ती होण्याऐवजी परिवार, गाव असे सामूहिक एकक असतात. 
 
- मुकुल कानेटकर