शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

नव्या शैक्षणिक धोरणाने दिशा योग्य धरली, पण आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 13:26 IST

देशाच्या आर्थिक तरतुदीमध्ये शिक्षण खात्याला कधीही अग्रक्रम मिळाला नाही. भारतातील शिक्षणाला व्यापक व अद्ययावत रूप देण्याचा प्रयत्न राजीव गांधी यांनी केला. नरसिंह रावांनी त्यावेळी मांडलेल्या शिक्षण धोरणाचे कौतुकही झाले.

ठळक मुद्देशिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती वाढविली आहे. मातृभाषेला महत्त्व देण्याबरोबर गणन आणि लेखन यावर प्राथमिक स्तरावर अधिक भर देण्यात आला आहे.

राष्ट्रघडणीत महत्त्वाचा पैलू शिक्षण असतो. राष्ट्राची आर्थिक क्षमता ही तंत्रनिर्मितीवर, तर सांस्कृतिक सुबत्ता शिक्षणावर अवलंबून असते. नीतीशिक्षणाबरोबर भौतिक समृद्धीसाठी अद्ययावत आणि उत्तम शिक्षण अत्यावश्यक असते. भारतातील शिक्षण कसे असावे, याचा विचार दीडशे वर्षे सुरू आहे. लोकमान्यांनी स्वातंत्र्यासाठी मांडलेल्या चतु:सूत्रीत राष्ट्रीय शिक्षणाचा समावेश होता. त्या काळातील राष्ट्रीय शाळांतून अनेक धुरंधर नेते व विद्वान पुढे आले. मात्र, स्वातंत्र्यानंतर शिक्षणाबाबतची तळमळ कमी झाली.

देशाच्या आर्थिक तरतुदीमध्ये शिक्षण खात्याला कधीही अग्रक्रम मिळाला नाही. भारतातील शिक्षणाला व्यापक व अद्ययावत रूप देण्याचा प्रयत्न राजीव गांधी यांनी केला. नरसिंह रावांनी त्यावेळी मांडलेल्या शिक्षण धोरणाचे कौतुकही झाले. मात्र, आता काळानुरूप नवे धोरण आखणे गरजेचे होते. मोदी सरकारने तसे धोरण आणले. या धोरणाचा व्याप मोठा आहे आणि त्यातील बारीकसारीक तपशिलांची विस्तृत चर्चा होणे गरजेचे आहे. तशी चर्चा बराच काळ चालत राहील. अशा चर्चेतून पुढे येणारे चांगले मुद्दे स्वीकारण्याचा उदारपणा सरकारने दाखविला पाहिजे. तपशिलाचा मुद्दा बाजूला ठेवला, तर सकृत्दर्शनी नवे धोरण स्वागतार्ह वाटते. तीव्र टीकेपासून दूर राहिलेले मोदी सरकारचे एक पहिलेच पाऊल असेल. या धोरणात विद्यार्थ्यांना अधिक शैक्षणिक स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शालेय शिक्षणात काही चांगले बदल आहेत.

शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती वाढविली आहे. मातृभाषेला महत्त्व देण्याबरोबर गणन आणि लेखन यावर प्राथमिक स्तरावर अधिक भर देण्यात आला आहे. प्राथमिक आकडेमोडही कित्येक विद्यार्थ्यांना जमत नाही, असे अनेक सर्वेक्षणातून दिसून आले. ही त्रुटी घालविण्यावर या धोरणात दिलेला भर स्वागतार्ह आहे. पदवी अभ्यासक्रमात विषय निवडीपासून पदवी मिळविण्याच्या कालखंडापर्यंत अनेक बाबतींत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य देण्यात आले आहे. विद्यापीठीय स्तरावरील अनेक सूचना या खोलात जाऊन विचार करण्यासारख्या आहेत. संघ विचारांचा प्रभाव मोदी सरकारने कधी लपवून ठेवलेला नाही. परंतु, शिक्षण धोरणावर या विचारांचा मोठा प्रभाव पडणार नाही, ही दक्षता सरकारने घेतली. बदलत्या जगात आत्मविश्वासाने जगण्याची क्षमता देणारे शिक्षण विद्यार्थ्यांना हवे. एका विशिष्ट परंपरेत जखडून ठेवणारे नको, हे भान धोरण मोदी सरकारने ठेवले.

धोरण स्वागतार्ह असले तरी मुख्य प्रश्न अंमलबजावणीचा व त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधांचा येतो. अंमलबजावणीत मनुष्यबळाची कार्यक्षमता महत्त्वाची असते. उत्तम शब्दयोजना असणाºया या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी लागणारे कार्यक्षम, कुशल शिक्षित मनुष्यबळ आपण निर्माण केले आहे का, याचा विचार सर्व राजकीय नेत्यांनी व समाजचिंतकांनी केला पाहिजे. यावेळी लोकमान्य टिळकांची आठवण येणे अपरिहार्य ठरते. लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीचा समारोप होत असतानाच हे धोरण जाहीर झाले आहे. १९०१-०२ मध्ये लिहिलेल्या अग्रलेखांत लोकमान्य म्हणाले होते की, सरकारी नोकर तयार करण्यापलीकडे आपल्या शिक्षणाची मजल जात नाही.

देशी भाषांचा अभ्यास, उद्योगांची नवी माहिती अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींबरोबर ‘विद्येची खरी अभिरूची निर्माण करण्यात शिक्षण कमी पडते’ हा लोकमान्यांचा मुख्य आक्षेप होता. पाणिनी, कणाद, भास्कराचार्य यांच्याप्रमाणेच पाश्चर, एडिसन, स्पेन्सर, मिल यांच्यासारखे संशोधक व विद्वान हिंदुस्थानात का निर्माण होत नाहीत, असा प्रश्न करून सरकारी हमालखाने असे खडखडीत विशेषण लोकमान्यांनी युनिव्हर्सिटीला लावले होते. जगाची कौतुकाने नजर जाईल असे संशोधक, विद्वान, साहित्यकार, कवी भारतात का निपजत नाहीत याचा विचार केला, तर धोरणे आखण्यात आपण हुशार असलो तरी विविध राजकीय, सामाजिक दबावामुळे अंमलबजावणीत कमी पडतो असे लक्षात येते. नवे शोध, नवे विचार देणाºया प्रतिष्ठित विश्वविद्यालयांमुळे अमेरिकेत समृद्धी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणाने दिशा बरोबर धरली, आता दशा सुधारायला पाहिजे.

टॅग्स :Educationशिक्षण