शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मनोहर पर्रीकरांच्या स्मारकावरून उफाळला नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 20:11 IST

मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथे उभारल्या जाणा-या स्मारकावरून गोव्यात नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- राजू नायकमनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथे उभारल्या जाणा-या स्मारकावरून गोव्यात नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.‘स्मृतिस्थळ’ या नावाने हे स्मारक मिरामार किना-यावर- जेथे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचेही स्मारक आहे- उभारले जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईस्थित यूसीजे आर्किटेर अॅँड एन्वायरोन्मेंट या संस्थेचे डिझाइन या प्रकल्पासाठी निवडण्यात आले आहे.या प्रकल्पाचा खर्च अद्याप सरकारने जाहीर केलेला नाही; परंतु राज्य सरकारच्याच पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे ते बांधले जाणार आहे.सूत्रांच्या मते, प्रकल्पाचा खर्च नऊ कोटींपेक्षा जादा असेल. तो पर्रीकरांच्या जीवनासंदर्भात एका संग्रहालयाच्या स्वरूपातच असण्याची शक्यता असेल. सरकारच्या मते, ते जनतेसाठी स्फूर्तिदायी ठरावे अशी अपेक्षा आहे.दरम्यान, पर्रीकरांचे एकेकाळचे सहकारी व त्यानंतरचे राजकीय वैरी सुभाष वेलिंगकर यांनी स्व. बांदोडकरांच्या स्मारकाचे नूतनीकरण सर्वात आधी हाती घेण्याची सूचना करताना पर्रीकरांच्या स्मारकापूर्वी हे काम हाती घेण्याचे आवाहन केलेय. वेलिंगकरांना पर्रीकरांसाठी एवढे मोठे स्मारक असावे, हा निर्णय फारसा रुचलेला दिसला नाही. स्वाभाविक आहे, पर्रीकर सरकारच्या भाषा माध्यम प्रश्नावरूनच रा. स्व. संघाशी फारकत घेऊन वेलिंगकरांनी आपली वेगळी चूल मांडली होती. पर्रीकरांचे स्मारक उभारल्यावर बांदोडकरांचे स्मारक दुर्लक्षित वाटू नये, तेही अद्ययावत बनविण्यात यावे, असे वेलिंगकरांनी म्हटले आहे.दुसरीही काही मते आहेत, जी या खर्चासंदर्भात कटू प्रतिक्रिया व्यक्त करतात. भाजपाने स्वत:च्या हिकमतीवर पैसा उभारून हे स्मारक निर्माण करावे, अशा असंख्य प्रतिक्रिया समाज माध्यमांतून व्यक्त झाल्या आहेत.एक गोष्ट खरी आहे की राज्यात जी काही स्मारके आहेत, त्यांच्यावर खर्च बराच होतो; परंतु कालांतराने त्यांची हेळसांड होते. बांदोडकरांच्या स्मारकाकडेही दुर्लक्ष झाले आहे. ते वर्षभर बंद असते व बांदोडकरांच्या स्मृतिदिनीच खुले केले जाते. वेलिंगकर यांनी म्हटले आहे, पर्रीकरांनंतर मिरामार येथे आणखी कोणाचेही स्मारक उभारले जाणार नाही याची तरतूद करावी. मिरामार किना-यावर सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून नवी बांधकामे उभी केली जाऊ नयेत, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.पर्रीकरांनी आपल्या शेवटच्या कारकिर्दीत बरेच वाद ओढवून घेतले होते. त्यामुळे त्यांच्यावर सध्याचे भाजपा नेतेही नाखुश होते. त्यांचे अनेक निर्णय सध्या फिरवले जात आहेत. त्यांच्या शेवटच्या कारकिर्दीत भाजपावर अन्याय झाला व त्यांनी स्वत:ची ‘कोटरी’ निर्माण केली होती, असा आरोप होतो. एक गोष्ट राजकीय निरीक्षक मान्य करतात की पर्रीकरांमुळेच गोव्यात भाजपा सत्तेवर येऊ शकली. परंतु सध्या त्यांच्या बाबतीत त्यांचे सहकारीच नाखुश असता स्मारक उभारून त्यांना विस्मृतीत ढकलण्याचा तर सरकारचा प्रय} नाही ना, असा सवाल केला जातो. सरकारने त्यांचे कुटुंबीय व हितचिंतकांची सतावणूक चालविल्याचा आरोप माजी अॅडव्होकेट जनरल व पर्रीकरांचे जवळचे स्नेही आत्माराम नाडकर्णी यांनी अलीकडेच केला आहे.(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा