शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

आर्थिक नियोजनासाठी कठोर उपायांची गरज

By admin | Updated: November 23, 2014 02:02 IST

योजनांना कट वगैरे जे काही सध्या म्हटले जात आहे ते काही नवीन नाही. मी सचिव होतो, त्या वेळीही असेच होत होते. महाराष्ट्राचे हे नेहमीचे दुखणो आहे.

योजनांना कट वगैरे जे काही सध्या म्हटले जात आहे ते काही नवीन नाही. मी सचिव होतो, त्या वेळीही असेच होत होते. महाराष्ट्राचे हे नेहमीचे दुखणो आहे. उपलब्ध साधनसामग्रीचा विचार न करता योजना जाहीर केल्या, की असेच होत असते. गेली अनेक वर्षे आपल्याकडे हे असेच सुरू आहे. याची अनेक कारणो आहेत व ती सर्व राजकीय निर्णयांमध्ये आहेत.
आर्थिक विचार न करता योजना जाहीर करणो हे राज्यकत्र्याचे वैशिष्टय़ झाले आहे. त्याचा अपरिहार्य परिणाम त्या योजना कोसळण्यात होतो. त्याकडे दुर्लक्ष करून अनपेक्षितपणो असंख्य पुरवणी मागण्या केल्या जातात व त्या मंजूरही होतात. त्याचा बोजा तिजोरीवर येतो व जाहीर केलेल्या योजनांना किंवा काही जुन्या योजनांना कट लावला जातो. अशा धरसोडीच्या धोरणामुळे एकही योजना धडपणो पूर्ण होताना दिसत नाही. फक्त काम सुरू होते किंवा अनेकदा सुरूही होत नाही! योजनांचे लाभार्थी मात्र त्याकडे डोळे लावून बसलेले असतात. पूर्वी राज्याने पंचवार्षिक योजना तयार केली की केंद्रीय नियोजन आयोगाकडून ती मंजूर होत असे. त्यांचे थोडे तरी नियंत्रण असे, आता मात्र नव्या केंद्र सरकारने नियोजन आयोगच गुंडाळला असल्याने व पुढे ते काय करणार, हे काहीच निश्चित नसल्याने नियोजनाच्या पातळीवर आणखी गोंधळ होणार हे नक्की आहे. तसा तो झाला की आर्थिक अवस्था अधिकच गंभीर होण्याची दाट शक्यता आहे. 
राज्य सरकारपुढचा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कर्जाचा भला मोठा डोंगर राज्याच्या माथ्यावर आहे. याची सुरुवात सन 1995 मध्ये आलेल्या भाजपा-सेना युतीच्या सरकारच्या वेळीच झाली पाहिजे याची आठवण आता पुन्हा सत्तेवर आलेल्या भाजपला करून द्यायलाच हवी. त्यावेळी भरमसाठ कर्ज काढून त्यांनी असंख्य योजना सुरू केल्या. त्याबाबत गंभीरपणो विचार न करता पुढे म्हणजे गेली 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या सरकारने ते कर्ज काढून योजना जाहीर करण्याचे धोरण तसेच सुरू ठेवले. त्यातूनच हा कर्जाचा डोंगर वाढला आहे.
आता राज्यावर खर्चाचा बोजा मोठा आहे तसेच कर्जाचा डोंगरही मोठाच आहे. केंद्र सरकारने अलीकडेच काही निकष लावले असून, त्यानुसार काम झाले नाही तर केंद्राकडून मिळणा:या अनुदानात कपात करण्याचा इशारा राज्य सरकारांना दिला आहे. असे असूनही राज्य सरकार गंभीरपणो काही उपाय योजायला तयार नाही. राज्याची महसूली तूट प्रचंड आहे. मोठय़ा प्रमाणावर विविध योजनांसाठी अनुदान दिले जाते, सवलती जाहीर केल्या जातात. गेल्या काही वर्षात सरकारी शाळांमधील पटसंख्या कितीतरी कमी झाली, मात्र शिक्षकांची पटसंख्या आहे तेवढीच आहे. त्यांच्या तसेच सरकारी कर्मचा:यांच्या वेतनावर राज्याचा फार मोठा खर्च होतो. आता सातवा वेतन आयोग येत आहे. त्यानंतर हा खर्च आणखीन वाढणार आहे. कजर्माफी, वीजबील माफी असे निर्णय सरकार घेत असते. त्याची भरपाई त्या त्या संस्थांना सरकारी तिजोरीतून करावी लागते. सार्वजनिक उद्योग आहेत़ त्यातील अनेक तोटय़ात असून आता त्यांची गरज उरलेली नसतानाही ते सुरू आहेत. सार्वजनिक आरोग्यावर सरकार प्रचंड खर्च करीत असते, मात्र तरीही सरकारी दवाखाने ओस पडलेले असतात. यातील प्रत्येक गोष्टीत सुधारणा करण्याची नितांत गरज आहे, मात्र सरकारकडे त्यासाठी तशी इच्छाशक्ती हवी. सार्वजनिक आरोग्यावर असे पैसे खर्च करण्याऐवजी गरिबांना विशिष्ट रकमेचे व्हाऊचर दिले व त्यांना हव्या त्या ठिकाणी उपचार करून घेण्याची मोकळीक दिली तर कितीतरी खर्च कमी होईल. शिक्षणाचेही तसेच आहे. कुटुंबाला त्याच्या पाल्याच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल तेवढे व्हाऊचर त्याला द्यायच़े मग ते कुटुंब त्यांना हव्या त्या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश घेईल. हा जबाबदारी टाळण्याचा किंवा लोककल्याणकारी राज्य या संकल्पनेपासून पळण्याचा प्रकार नाही, तर अधिक जबाबदारीने काम करण्याचा प्रयत्न आहे. ब्राझील देशात अशी व्हाऊचर पद्धत अमलात आणली गेली. त्यामुळे गरजू व्यक्तींनाच त्याचा लाभ झाला व सरकारचाही अतिरिक्त खर्च वाचला. पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशिप यासारखी संकल्पनाही राबवायला हवी. आवश्यक तिथे सरकार मदत करेल, व्यवस्थापन मात्र पूर्णत: खासगी राहील.
नव्या सरकारने मंत्रिमंडळासमोर हे सर्व विषय आणले पाहिजेत. त्यावर गंभीरपणो चर्चा केली पाहिजे. याला विरोध होणार, हे निश्चित आह़े मात्र कोणतीही सुधारणा करताना असा विरोध होतच असतो. अंतिम हित लक्षात घेऊन सरकारने कठोरपणो हे उपाय अमलात आणले, तर राज्याच्या ढासळत्या आर्थिक स्थितीला किमान आवर घालता येणो शक्य आहे.
(शब्दांकन : राजू इनामदार)
 
- माधव गोडबोले