शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:51 AM

राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाने खान्देशात निवडणूकपूर्व वातावरण तापवले

राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाने खान्देशात निवडणूकपूर्व वातावरण तापवले आणि कार्यकर्त्यांसोबत सामान्य जनतेला आम्ही समर्थ पर्याय देऊ शकतो, असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अस्वस्थ सभोवतालाचा लाभ या आंदोलनाला मिळाला आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांना चांगली गर्दी झाली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पंचवार्षिक कारकिर्दीचा शेवटचा टप्पा सुरु केला आहे; पण जनसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात दोन्ही सरकारे अपयशी ठरत असल्याने समाजातील सर्वच घटकांमध्ये तीव्र स्वरुपाचा असंतोष आहे. या असंतोषाला वाट करुन देण्याचे काम राष्टÑवादी काँग्रेसने या आंदोलनाच्या माध्यमातून केले. यापूर्वी दोन्ही काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली होती. परंतु त्यापेक्षा अधिक प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला. समस्यांनी ग्रस्त असलेली मंडळी विरोधी पक्षाकडे मोठ्या संख्येने निवेदने घेऊन आल्याचे चित्र भाजपाच्या सत्ताकाळात प्रथमच यावेळी दिसून आले. राष्टÑीय महामार्ग चौपदरीकरण कामात जमीन घेऊनही योग्य मोबदला मिळाला नसल्याची विसरवाडी (जि.नंदुरबार) येथील ग्रामस्थांची तक्रार, माझे बाबा चिंताग्रस्त असतात, अशी बलवाडी (जि.जळगाव) येथील केळी उत्पादक शेतकºयाच्या चिमुरडीने मांडलेली कैफीयत, दोंडाईचा येथील विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेल्या अत्याचारासंबंधी दाद मागणारे भडगावातील महिलांचे निवेदन...हे सरकारकडून न्याय मिळत नसल्याची व राष्टÑवादीने हा प्रश्न धसास लावण्याची अपेक्षा व्यक्त करणाºया या घटना आहेत. ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंत शतप्रतिशत भाजपाचा नारा देणाºया सत्ताधारी मंडळींना या आंदोलनाने धोक्याची सूचना दिलेली आहे. जनता नाखूश आहे, असे नाडीपरीक्षण विरोधी पक्षाने जनतेत जाऊन जाणून घेतले. त्याचा परिणाम संसद व विधिमंडळ अधिवेशनात निश्चित दिसून येईल. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, भास्कर जाधव ही नेते मंडळी सहभागी झाली होती. पण सर्वाधिक प्रतिसाद हा सुळे आणि मुंडे यांच्या भाषणांना मिळाला. शिवजयंतीला फागणे (जि.धुळे) ते अमळनेर (जि.जळगाव) दरम्यान काढलेली दुचाकी रॅली, मुक्तार्इंनगरच्या संत मुक्ताई मंदिरात जाऊन घेतलेले दर्शन, विखरण (जि.धुळे) येथे धर्मा पाटील यांच्या शोकग्रस्त कुटुंबियांची घेतलेली भेट यातून राष्टÑवादीच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक जनसामान्यांशी असलेली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न केला. संघर्ष यात्रेदरम्यान भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांच्या घरी भेट देणाºया नेत्यांनी यावेळी मात्र खडसे यांच्यावर त्यांच्या मतदारसंघात टीका केली. ४० वर्षे निवडून येऊन पाण्याची समस्या सोडविता आली नाही, असा जाब भास्कर जाधव यांनी विचारला. तर जामनेरात जाऊन गिरीश महाजन यांची हुकूमशाही चालू देणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला. भाजपाच्या असंतुष्ट वा निष्ठावंत अशा कोणत्याही नेत्याशी सलगी ठेवायची नाही, असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला. राष्टÑवादी कार्यकर्त्यांचा उत्साह या आंदोलनातून दुणावला आहे, हे मात्र खरे.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस