शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

नवी मुंबई डायरी | विशेष लेख : वनमंत्री गणेश नाईक पाणथळींना न्याय देतील का?

By नारायण जाधव | Updated: January 6, 2025 10:52 IST

नवी मुंबईत महापालिकेनेच विकास आराखड्यात पाणथळींचे आरक्षण बदलून ते बिल्डरांना खुले केले आहे. या विरोधात विद्यमान वनमंत्री गणेश नाईक हे स्वत: मैदानात उतरले होते.

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक

नवी मुंबईतील नेरूळचे डीपीएस आणि टीएस चाणक्य परिसरातील ३५.५५ हेक्टर जमीन पाणथळीचीच असल्याचे शिक्कामोर्तब ठाण्याच्या नायब तहसीलदारांनी पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीवरून पाहणी करून केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे. यापूर्वी गेल्यावर्षी जानेवारीत झालेल्या फ्लेमिंगोंच्या मृत्यूनंतर विधिमंडळात यावर चर्चा झाली होती. तेव्हा तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीनेही आपल्या अहवालात त्यात डीपीएस फ्लेमिंगो तलाव आता संरक्षित क्षेत्र म्हणून जतन करण्याची शिफारस केली आहे. त्यानंतर आता तहसीलदारांनीच हे ३५.५५ हेक्टर क्षेत्र पाणथळीचे असल्यावर शिक्कामोर्तब केल्याने पर्यावरणप्रेमींचा आत्मविश्वास वाढला आहे.

या दोन्ही पाणथळींवर सिडको, नवी मुंबई महापालिकेसह बिल्डर आणि खासगी व्यक्तींनी अतिक्रमण करून त्या नष्ट करण्याचे सत्र सुरू केले होते. पर्यावरणप्रेमींच्या तक्रारींवरून खारफुटी, वन, पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांसह ठाण्याच्या नायब तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन हा अहवाल सादर केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर एक वर्षापूर्वी कांदळवनाची अंदाजे १०० ते १२५ झाडांची कत्तल केल्याचेही स्पष्ट करून याप्रकरणी बेलापूरच्या मंडळ अधिकाऱ्यांनी एनआरआय पोलिसात गुन्हा दाखल करूनही कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. याशिवाय एनआरआय तलावाच्या पाणथळ जागेत येण्या-जाण्यासाठी असलेला रस्ता गेट लावून बंद करण्याचा प्रयत्न करून विकासकाने फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना फोटो काढण्यास अडथळा आणून परिसरात फिरण्यास मनाई केल्याचे म्हटले आहे. तसेच या पाणथळींची शासनाचीच असून, ती वाचविण्यासाठी शासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचेही पंचनाम्यात नमूद केले आहे.

गेल्या काही वर्षांत महामुंबईतील शासन, वन विभागासह पाणथळ जमिनींवर होणाऱ्या अतिक्रमणांचा मुद्दा सातत्याने गाजत आहे. मुंबई महानगर प्रदेशात आणि विशेषत: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पाणथळ जमिनी निवासी संकुलांसाठी खुल्या केल्याच्या पर्यावरणप्रेमींच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. नवी मुंबईत तर महापालिकेनेच विकास आराखड्यात पाणथळींचे आरक्षण बदलून ते बिल्डरांना खुले केले आहे. याविरोधात विद्यमान वनमंत्री गणेश नाईक हे स्वत: मैदानात उतरले होते.

पाणथळींवरील अतिक्रमणांच्या तक्रारी वाढल्याने त्यांचे जिल्हानिहाय नकाशे व सविस्तर माहितीची कागदपत्रे तयार करण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने चेन्नईस्थित दि नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेची नेमणूक केली होती. या संस्थेने  सर्वेक्षण केलेल्या ५६४ पाणथळींचे भवितव्य नव्या सरकारच्या हाती आहे. यात डीपीएस आणि टीएस चाणक्यचाही समावेश आहे. वनमंत्री गणेश नाईक डीपीएस आणि टीएस चाणक्यसह पाणजे, फुंडेसह खारघर परिसरातील पाणथळींना न्याय देतील, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींना आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNavi Mumbaiनवी मुंबई