शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

National Inter Religious Conference: नागपूरचा शांतीसांगावा, राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत धर्मगुरूंची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 08:57 IST

National Inter Religious Conference : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाची मातृसंस्था, ‘लोकमत’ची नागपूर आवृत्ती यंदा ‘सुवर्णमहोत्सव’ साजरा करत आहे. त्यानिमित्ताने आयोजित राष्ट्रीय स्तरावरच्या आंतरधर्मीय परिषदेच्या निमित्ताने ही धर्मगुरूंची मांदियाळी जमली.

विविध पंथ, संप्रदाय, उपासनापद्धतींचा पुरस्कार करणारे, सोबतच माणसांच्या सुखासाठी, त्यांच्या मानसिक व भावनिक शांततेसाठी योग, ध्यानधारणा वगैरेंच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष्य वाहून घेतलेले जागतिक कीर्तीचे आध्यात्मिक गुरु रविवारी नागपुरात एकत्र आले. धर्म एकच, तो मानवतेचा. भेद आहे तो पंथ, संप्रदाय, पूजा-अर्चनेत, हे स्पष्ट केले. धर्मांधतेमुळे जगभर सुरू असलेल्या हिंसेच्या थैमानावर महामंथन केले. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असली तरी हे ऐतिहासिक शहर भारताच्या हृदयस्थानी, मध्यवर्ती आहे.

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाची मातृसंस्था, ‘लोकमत’ची नागपूर आवृत्ती यंदा ‘सुवर्णमहोत्सव’ साजरा करत आहे. त्यानिमित्ताने आयोजित राष्ट्रीय स्तरावरच्या आंतरधर्मीय परिषदेच्या निमित्ताने ही धर्मगुरूंची मांदियाळी जमली. ज्यांना ऐकण्यासाठी, आशीर्वचनासाठी लाखोंच्या संख्येने लोक जमतात. कानांत प्राण आणून त्यांना ऐकतात. जीवनमूल्ये समजून घेतात, असे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर, बीएपीएस स्वामीनारायण संप्रदायाचे ब्रह्मविहारी स्वामी, अहिंसा विश्वभारतीचे डॉ. लोकेशमुनी, जीवनसाधना मिशनचे प्रल्हाद वामनराव पै, मुंबईचे आर्च बिशप कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियस, योगगुरु बाबा रामदेव, लडाखमधील महाबोधी इंटरनॅशनल तपसाधना केंद्राचे भिक्खू संघसेना, अजमेरच्या मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याचे गद्दीनशीन हाजी सैयद सलमान चिश्ती हे सगळे दिग्गज धर्मगुरू एका मंचावर येणे, हाच मुळात दैवदुर्लभ योग.

देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच अगदी देशाबाहेरूनही केवळ या परिषदेसाठी हे नागपुरात आले. पुढे सर्वांनी प्रेमाचा प्रसार व मानवी जीवनाचे अमूल्य महत्त्व म्हणजे धर्म ही द्वाही फिरविणे, आम्ही हे समाजाला व जगाला जाऊन सांगू याची ग्वाही देणे, हा अवर्णनीय असा दुग्धशर्करा योग. एरव्ही, रस्ते, हमरस्ते, सागरमाला, इथेनॉल वगैरे साऱ्या भौतिक विषयांवर बोलणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या परिषदेच्या उद्घाटन सत्राचे पाहुणे होते. पूर्णवेळ उपस्थित राहून त्यांनी भारतीय संस्कृती, सहिष्णू परंपरेवर दिलेले व्याख्यानदेखील पठडीबाहेरचे होते. या धर्मपरिषदेने देशाला तसेच पृथ्वीतलावरच्या समस्त मानवी समुदायाला विश्वबंधुत्वाचे साकडे घातले. प्रेम व शांतीशिवाय अन्य कशानेही, येणाऱ्या पिढ्या विद्वेष व हिंसाचारापासून मुक्त होणार नाहीत, हा संदेश दिला. सविस्तर विवेचन केले की, धर्म माणसांना जोडण्यासाठी आहेत, तोडण्यासाठी नाही.

धार्मिक, राजकीय, आर्थिक कारणांनी देश एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात, हल्ले-प्रतिहल्ले, बचावाच्या निमित्ताने निष्पाप, निरपराधांचे जीव जातात. द्वेषाच्या आगीत मानवता होरपळून निघते. हे थांबायला हवे. जग धर्माधर्मांत दुभंगलेले असताना त्या अंधारात प्रकाशाचा कवडसा आहे तो अनेक प्रमुख धर्मांची जन्मभूमी असलेला भारत. भीतीदायक अशा धार्मिक उन्मादाचा, भेदाभेदाचा सामना हजारो वर्षे करणारा, हिंदू व इस्लाम हे दोन वरवर परस्परविरोधी वाटणारे धर्मही जिथे बारा-तेराशे वर्षे एकत्र नांदताहेत, असा ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्त्व जगाला देणारा भारतच या विद्वेषाविरोधातील विचारांच्या, विश्वबंधुता व प्रेमाच्या आघाडीवर जगाचे नेतृत्व करू शकेल, विश्वगुरू बनेल. किंबहुना, अधिक खोलात विचार केला तर हे आध्यात्मिक विश्वगुरूपद भविष्य अथवा कविकल्पना नाही तर वर्तमान आहे, असा विश्वास या परिषदेने दिला.

या मार्गावर प्रेम हा पहिला थांबा आहे. विद्वेष रोखण्यासाठी कायद्यांचा व कडक शिक्षेचा आधार घेण्याची वेळ आली आहे आणि माणसांच्या जीवापेक्षा अन्य कशालाही अधिक मूल्य नाही, याचे भान ठेवायला हवे. अगदी सामान्यांनाही समजेल, असे एक सोपे परंतु महत्त्वाचे सूत्र या परिषदेने दिले. ते म्हणजे, ज्या निसर्गातून माणूस घडत गेला, त्या सृष्टीशी तादात्म्य अथवा अद्वैत. निसर्ग माणसामाणसांमध्ये भेदाभेद करत नाही. आग, पाणी, जमीन आदी पंचमहाभूतांच्या लेखी माणसामाणसांमध्ये फरक नाही, तर मग माणसांनीच तयार केलेली धर्म नावाची व्यवस्था  हा हिंदू, हा मुस्लिम, हा शीख, हा ख्रिश्चन असा भेद का करते, हा प्रश्नदेखील सगळ्या धर्मगुरूंनी एका सुरात उपस्थित केला. काही मान्यवरांनी ठणकावून सांगितले की, अशा धर्म परिषदांमध्ये सगळे धर्मगुरू असेच एकीची भाषा बोलतात, मात्र आपल्या अनुयायांना तसे सांगत नाहीत. परमेश्वर एकच आहे, हे ते अनुयायी सामान्य अज्ञजनांना सांगत नाहीत. त्यामुळे माणसांमध्ये धर्माच्या भिंती उभ्या राहतात. तसे होऊ न देण्यासाठी जे व्यासपीठावर तेच उपदेशात असायला हवे.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद