शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी 

By किरण अग्रवाल | Updated: April 22, 2021 09:42 IST

Nashik Oxygen Leak: नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे.

- किरण अग्रवाल

एकीकडे कोरोनाच्या गंभीर स्वरुपातील बाधितांना रुग्णालयातील ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नसल्याची सार्वत्रिक ओरड होत असताना दुसरीकडे नाशकात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तब्बल 24 रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हे अत्यंत दुर्दैवी तर आहेच, परंतु मरण कसे स्वस्त होऊ पाहते आहे हेदेखील यातून स्पष्ट व्हावे.

नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे, कारण ही एक दुर्घटना तर आहेच परंतु त्याच सोबत यामध्ये व्यवस्थांच्या बेपर्वाईचा पदरही लाभुन गेलेला दिसतो आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन टॉकीत वायू भरला जात असताना त्या टाकीच्या व्हालमधून गळती होतेच कशी व गळती सुरू झाल्यानंतर ती रोखण्यासाठी दीड ते दोन तासांची यातायात करण्याची वेळ का आली, असे काही प्रश्न यातून समोर येऊन गेले आहेत ज्याची उत्तरे शोधली जाणे गरजेचे ठरले आहे.

नाशकातील ज्या डॉ जाकिर हुसेन रुग्णालयात ही दुर्घटना घडली ते हॉस्पिटल पूर्णतः कोरोना बाधितांसाठी वाहिलेले आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच तेथे ऑक्सिजन टाकीची उभारणी करण्यात आली आहे. या टाक्या खरेदी करून स्वतः बसविण्याऐवजी महापालिका प्रशासनाने त्या भाड्याने घेतल्या आहेत, त्यामुळे त्यासंबंधीची हाताळणी करण्याचा ठेका, त्यातील अटी शर्ती आणि ठेकेदारीची गणिते यानिमित्ताने चर्चेत येऊन गेली आहेत. व्यवस्थेची हाताळणी जर ठेकेदाराची जबाबदारी असेल तर या गळतीचा व त्यातून जीव गमावलेल्यांची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये. राज्य शासनाने व महापालिकेनेही जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या आहेत, परंतु पैशाने संबंधितांचा जीव परत येणार नाही. झालेली हानी भरून निघणे शक्य नाही, त्यामुळे या संदर्भातील बेपर्वाईची निरपेक्षपणे चौकशी होऊन यापुढे असे व्यवस्थेतील दोष टाळण्या बाबत लक्ष दिले जाणे अगत्याचे आहे. 

राहिला विषय राजकारणाचा, तर ही घटना दुर्घटनाच आहे यात शंका नाही; त्यामुळे त्यावर उगाच राजकारण करणे योग्य ठरू नये. पण एकीकडे एकेक जीव वाचवणे महत्त्वाचे ठरले असताना एकाच वेळी तांत्रिक दोषातून इतक्या मोठ्या प्रमाणात जीव गमावले जात असतील तर यात होणाऱ्या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करता येऊ नये. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ही दुर्घटना घडल्याने व महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने, उठसूट राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांनी यासंबंधीचे भान बाळगायला हवे. झाल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाकडून उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, तिचा अहवाल काय यायचा तो येईलच; परंतु वैद्यकीय तांत्रिक सज्जता व तज्ज्ञता याकडे यानिमित्ताने लक्ष देणे किती गरजेचे आहे ते लक्षात घेतले पाहिजे.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रुग्णालये, बेड्स, ऑक्सीजन, इंजेक्शन्स याची कमतरता अधिक भासण्याची लक्षणे पाहता किमान जी व्यवस्था उपलब्ध आहे त्यातील तांत्रिक दोष कसा टाळता येईल व तज्ज्ञांच्या सेवा घेऊन नाशकात घडल्यासारखी दुर्घटना कशी टाळता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे. तसे झाले व या दुर्घटनेतील हलगर्जीपणाला कारक ठरलेले घटक शोधले गेले तर यात बळी गेलेल्यांच्या जीवाला खरी श्रद्धांजली लाभेल. केवळ अश्रू ढाळून व आरोपांच्या पिचकाऱ्या मारून चालणार नाही, तर आपत्ती व्यवस्थापनाच्या सक्षमतेच्या दृष्टीनेही गांभीर्याने विचार करून निर्णय घेतले जाणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Nashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळतीNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या