शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी 

By किरण अग्रवाल | Updated: April 22, 2021 09:42 IST

Nashik Oxygen Leak: नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे.

- किरण अग्रवाल

एकीकडे कोरोनाच्या गंभीर स्वरुपातील बाधितांना रुग्णालयातील ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नसल्याची सार्वत्रिक ओरड होत असताना दुसरीकडे नाशकात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तब्बल 24 रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हे अत्यंत दुर्दैवी तर आहेच, परंतु मरण कसे स्वस्त होऊ पाहते आहे हेदेखील यातून स्पष्ट व्हावे.

नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे, कारण ही एक दुर्घटना तर आहेच परंतु त्याच सोबत यामध्ये व्यवस्थांच्या बेपर्वाईचा पदरही लाभुन गेलेला दिसतो आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन टॉकीत वायू भरला जात असताना त्या टाकीच्या व्हालमधून गळती होतेच कशी व गळती सुरू झाल्यानंतर ती रोखण्यासाठी दीड ते दोन तासांची यातायात करण्याची वेळ का आली, असे काही प्रश्न यातून समोर येऊन गेले आहेत ज्याची उत्तरे शोधली जाणे गरजेचे ठरले आहे.

नाशकातील ज्या डॉ जाकिर हुसेन रुग्णालयात ही दुर्घटना घडली ते हॉस्पिटल पूर्णतः कोरोना बाधितांसाठी वाहिलेले आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच तेथे ऑक्सिजन टाकीची उभारणी करण्यात आली आहे. या टाक्या खरेदी करून स्वतः बसविण्याऐवजी महापालिका प्रशासनाने त्या भाड्याने घेतल्या आहेत, त्यामुळे त्यासंबंधीची हाताळणी करण्याचा ठेका, त्यातील अटी शर्ती आणि ठेकेदारीची गणिते यानिमित्ताने चर्चेत येऊन गेली आहेत. व्यवस्थेची हाताळणी जर ठेकेदाराची जबाबदारी असेल तर या गळतीचा व त्यातून जीव गमावलेल्यांची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये. राज्य शासनाने व महापालिकेनेही जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या आहेत, परंतु पैशाने संबंधितांचा जीव परत येणार नाही. झालेली हानी भरून निघणे शक्य नाही, त्यामुळे या संदर्भातील बेपर्वाईची निरपेक्षपणे चौकशी होऊन यापुढे असे व्यवस्थेतील दोष टाळण्या बाबत लक्ष दिले जाणे अगत्याचे आहे. 

राहिला विषय राजकारणाचा, तर ही घटना दुर्घटनाच आहे यात शंका नाही; त्यामुळे त्यावर उगाच राजकारण करणे योग्य ठरू नये. पण एकीकडे एकेक जीव वाचवणे महत्त्वाचे ठरले असताना एकाच वेळी तांत्रिक दोषातून इतक्या मोठ्या प्रमाणात जीव गमावले जात असतील तर यात होणाऱ्या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करता येऊ नये. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ही दुर्घटना घडल्याने व महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने, उठसूट राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांनी यासंबंधीचे भान बाळगायला हवे. झाल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाकडून उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, तिचा अहवाल काय यायचा तो येईलच; परंतु वैद्यकीय तांत्रिक सज्जता व तज्ज्ञता याकडे यानिमित्ताने लक्ष देणे किती गरजेचे आहे ते लक्षात घेतले पाहिजे.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रुग्णालये, बेड्स, ऑक्सीजन, इंजेक्शन्स याची कमतरता अधिक भासण्याची लक्षणे पाहता किमान जी व्यवस्था उपलब्ध आहे त्यातील तांत्रिक दोष कसा टाळता येईल व तज्ज्ञांच्या सेवा घेऊन नाशकात घडल्यासारखी दुर्घटना कशी टाळता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे. तसे झाले व या दुर्घटनेतील हलगर्जीपणाला कारक ठरलेले घटक शोधले गेले तर यात बळी गेलेल्यांच्या जीवाला खरी श्रद्धांजली लाभेल. केवळ अश्रू ढाळून व आरोपांच्या पिचकाऱ्या मारून चालणार नाही, तर आपत्ती व्यवस्थापनाच्या सक्षमतेच्या दृष्टीनेही गांभीर्याने विचार करून निर्णय घेतले जाणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Nashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळतीNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या