शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी 

By किरण अग्रवाल | Updated: April 22, 2021 09:42 IST

Nashik Oxygen Leak: नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे.

- किरण अग्रवाल

एकीकडे कोरोनाच्या गंभीर स्वरुपातील बाधितांना रुग्णालयातील ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नसल्याची सार्वत्रिक ओरड होत असताना दुसरीकडे नाशकात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तब्बल 24 रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हे अत्यंत दुर्दैवी तर आहेच, परंतु मरण कसे स्वस्त होऊ पाहते आहे हेदेखील यातून स्पष्ट व्हावे.

नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे, कारण ही एक दुर्घटना तर आहेच परंतु त्याच सोबत यामध्ये व्यवस्थांच्या बेपर्वाईचा पदरही लाभुन गेलेला दिसतो आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन टॉकीत वायू भरला जात असताना त्या टाकीच्या व्हालमधून गळती होतेच कशी व गळती सुरू झाल्यानंतर ती रोखण्यासाठी दीड ते दोन तासांची यातायात करण्याची वेळ का आली, असे काही प्रश्न यातून समोर येऊन गेले आहेत ज्याची उत्तरे शोधली जाणे गरजेचे ठरले आहे.

नाशकातील ज्या डॉ जाकिर हुसेन रुग्णालयात ही दुर्घटना घडली ते हॉस्पिटल पूर्णतः कोरोना बाधितांसाठी वाहिलेले आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच तेथे ऑक्सिजन टाकीची उभारणी करण्यात आली आहे. या टाक्या खरेदी करून स्वतः बसविण्याऐवजी महापालिका प्रशासनाने त्या भाड्याने घेतल्या आहेत, त्यामुळे त्यासंबंधीची हाताळणी करण्याचा ठेका, त्यातील अटी शर्ती आणि ठेकेदारीची गणिते यानिमित्ताने चर्चेत येऊन गेली आहेत. व्यवस्थेची हाताळणी जर ठेकेदाराची जबाबदारी असेल तर या गळतीचा व त्यातून जीव गमावलेल्यांची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये. राज्य शासनाने व महापालिकेनेही जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या आहेत, परंतु पैशाने संबंधितांचा जीव परत येणार नाही. झालेली हानी भरून निघणे शक्य नाही, त्यामुळे या संदर्भातील बेपर्वाईची निरपेक्षपणे चौकशी होऊन यापुढे असे व्यवस्थेतील दोष टाळण्या बाबत लक्ष दिले जाणे अगत्याचे आहे. 

राहिला विषय राजकारणाचा, तर ही घटना दुर्घटनाच आहे यात शंका नाही; त्यामुळे त्यावर उगाच राजकारण करणे योग्य ठरू नये. पण एकीकडे एकेक जीव वाचवणे महत्त्वाचे ठरले असताना एकाच वेळी तांत्रिक दोषातून इतक्या मोठ्या प्रमाणात जीव गमावले जात असतील तर यात होणाऱ्या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करता येऊ नये. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ही दुर्घटना घडल्याने व महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने, उठसूट राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांनी यासंबंधीचे भान बाळगायला हवे. झाल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाकडून उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, तिचा अहवाल काय यायचा तो येईलच; परंतु वैद्यकीय तांत्रिक सज्जता व तज्ज्ञता याकडे यानिमित्ताने लक्ष देणे किती गरजेचे आहे ते लक्षात घेतले पाहिजे.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रुग्णालये, बेड्स, ऑक्सीजन, इंजेक्शन्स याची कमतरता अधिक भासण्याची लक्षणे पाहता किमान जी व्यवस्था उपलब्ध आहे त्यातील तांत्रिक दोष कसा टाळता येईल व तज्ज्ञांच्या सेवा घेऊन नाशकात घडल्यासारखी दुर्घटना कशी टाळता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे. तसे झाले व या दुर्घटनेतील हलगर्जीपणाला कारक ठरलेले घटक शोधले गेले तर यात बळी गेलेल्यांच्या जीवाला खरी श्रद्धांजली लाभेल. केवळ अश्रू ढाळून व आरोपांच्या पिचकाऱ्या मारून चालणार नाही, तर आपत्ती व्यवस्थापनाच्या सक्षमतेच्या दृष्टीनेही गांभीर्याने विचार करून निर्णय घेतले जाणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Nashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळतीNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या