शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नरेंद्र दामोदरदास मोदी असे मवाळ का झाले बुवा?

By संदीप प्रधान | Updated: January 3, 2019 14:23 IST

गुजरातमध्ये मुख्यमंत्री असल्यापासून मोदी पत्रकारांशी फटकून वागत होते. पत्रकार परिषद घेणे, मुलाखती देणे, हे तर त्यांना वर्ज्य होते.

- संदीप प्रधान

पाशवी बहुमत, सोशल मीडियावरील इमेज बिल्डिंग करणारी भलीमोठी टीम, लोकांना हिप्नॉटाइज करणारे वक्तृत्व, त्या वक्तृत्वाला कसदार अभिनयाची किनार, देशातील किमान १५ राज्यांमधील सत्तेचे पाठबळ, देशातील अनेक विचारवंत, लेखक, कलाकार पालखीचे भोई म्हणून तत्पर... या अशा अनेक बाबींमुळे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्याकरिता मीडिया, पत्रकार हे क्षुल्लक, क:पदार्थ होते. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असल्यापासून मोदी पत्रकारांशी फटकून वागत होते. पत्रकार परिषद घेणे, मुलाखती देणे, हे तर त्यांना वर्ज्य होते. मागे, मोदी यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली होती. मात्र, ती मुलाखत म्हणजे तुम्ही माझी पाठ खाजवा, या स्वरूपाची होती. दर १५ दिवसांनी एखादा देशात किंवा बऱ्याचदा विदेशात कार्यक्रम आयोजित करायचा आणि 'भक्तां'समोर दीडदीड तास भाषण करायचे, हाच काय तो मोदींचा मीडियाशी संवाद होता. याखेरीज, 'मन की बात' यासारखे तोंडी लावण्यापुरते कार्यक्रम होते. मात्र, राम मंदिरापासून राफेल खरेदी व्यवहारापर्यंत अनेक मुद्द्यांबाबत लोकांच्या मनात असलेल्या असंख्य प्रश्नांवर उत्तर द्यावे, असे मोदींना गेल्या चार वर्षांत वाटले नाही. त्यामुळे कधी पट्टीचे वकील अरुण जेटली, तर कधी घशाच्या शिरा ताणूनताणून बोलणाऱ्या निर्मला सीतारामन याच सरकारचा बचाव करताना दिसले. मोदींना आपण वेगवेगळ्या विषयांवर तोंड उघडावे, जनतेसमोर मीडियाच्या माध्यमातून काही बाबींचा खुलासा करावा, असे वाटले नाही. पाच राज्यांच्या निवडणुकांत मोदींनी प्रचार केला. मात्र, तरीही छत्तीसगढमध्ये भाजपाला अनपेक्षित पराभवाचा झटका बसला, तर राजस्थानमध्ये अपेक्षित झटका मिळाला. मध्य प्रदेशात जागा जरी बºयापैकी आल्या असल्या, तरी धूळ चारली गेली. पराभवाचे धक्के तर पंजाब, कर्नाटक व दिल्लीतही भाजपाला बसले होते. मात्र, आता मिळालेल्या दणक्याचे टायमिंग भाजपा व मोदी यांच्याकरिता घातक आहे.

सोनिया गांधी या प्रकृती अस्वास्थ्यामुळे, तर राहुल गांधी हे वकुब नसल्याने काँग्रेसला अच्छे दिन दाखवू शकत नाहीत, असा मोदी व भाजपाचा समज होता. त्या दृढ विश्वासाला निकालाने तडा गेला. शिवाय, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी उभी राहू शकते, याची जाणीव मोदींना झाली. जेव्हा मोदी विरुद्ध बाकीचे सगळे असा सामना होतो, तेव्हा मोदींची डाळ शिजत नाही, हे आता लक्षात आल्याने देशभरातील प्रादेशिक पक्षांचे नेते पर्यायाच्या शोधात होते. राहुल गांधी यांच्या रूपाने हा पर्याय उभा राहू शकतो, हेच दिसून आले. यापूर्वी राहुल यांच्या अपरिपक्वतेबद्दल बोटं मोडणारे शरद पवार यांच्यासारखे नेतेही अचानक राहुल यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करू लागल्याने मोदी यांना आपल्या पायाखालची वाळू सरकत असल्याची जाणीव झाली असावी. पर्यायी आघाडी आकाराला येत असताना रालोआचे मित्रपक्ष त्यांना दुरावत असल्याचे दिसू लागले. चंद्राबाबू नायडू दूर गेले, बिहारमध्ये पडझड सुरू झाली आणि महाराष्ट्रात भाजपाला लाखोली वाहिल्याखेरीज शिवसेनेचा दिवस मावळत नाही. त्यामुळेच की काय, सुईच्या अग्रावरील जमीन देण्यास तयार न होणाऱ्या अमित शहा यांनी बिहारमध्ये आपल्या पाच विद्यमान लोकसभेच्या जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेतला. मुंबईत येऊनही वांद्रे येथे मातोश्रीला टाळणाऱ्या अमित शहा यांना काही महिन्यांपूर्वी मातोश्रीची पायरी चढायला लागली होती. तात्पर्य काय, तर मोदी-शहा या जोडगोळीचा जमिनीपासून चार अंगुळे हवेतून उडणारा रथ जमिनीवर येण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात मोदी-शहा यांना मित्रपक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्याच लागतील. अपमान गिळावा लागेल. आपल्या छातीवर दगड ठेवून जागावाटपात तडजोडी कराव्या लागतील. याचबरोबर मीडिया, पत्रकार यांच्या टीकेचा सामना करावा लागेल. आपल्या सत्तेवरील सूर्य पुढील किमान २५ वर्षे मावळणार नाही, असा गंड या दोघांना होता. अमित शहा यांनी तर पुढील ५० वर्षे आम्हीच सत्ता करणार, असा राणाभीमदेवी थाटाचा दावा केला होता. मात्र, जेमतेम चार वर्षांत फासे असे पडले की, नाकदुऱ्या काढणे, मुलाखती देणे, स्वपक्षाच्या मंडळींकडून टोमणे ऐकून घेणे, या दोघांच्या नशिबी आले आहे.

मोदींची भीती त्यापुढेच आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला सत्ता स्थापन करण्याकरिता बरीच मोठी आघाडी करणे अपरिहार्य झाले, तर मोदी-शहा यांना त्यांची आतापर्यंतची ताठर भूमिका अडचणीची ठरू शकते. हिंदुत्व बाजूला ठेवून किमान समान कार्यक्रमावर मित्र जोडायचे झाले, तर मोदी-शहांची गुजरात दंगलीतील बेफिकिरी अडसर ठरू शकते. अशावेळी नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांच्यासारखे पर्याय नव्या मित्रांकडून पुढे आणले जाऊ शकतात. मध्यंतरी, गडकरी यांनी केलेली काही विधाने वेगळ्या संकेतांची निदर्शक होती. समजा, सत्ताबदल होऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर आली, तर मग मोदी-शहा यांच्याकरिता अधिक खडतर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपण जे पेरले तेच उगवले, याचा अनुभव त्यांना येऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकरणांच्या बंद करवलेल्या फायली खुल्या होऊ शकतात. नरसिंह राव सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर दिवसेंदिवस न्यायालयात एकटे बसून असायचे. अशा संकटाच्या प्रसंगी कुणीच पाठीशी उभे राहत नाही. त्यामुळे मोदी यांना मीडियापुढे जाण्याची गरज वाटली, असू शकते. भविष्यात, वधूपित्यासारखे कंबरेत वाकलेले मोदी-शहा देशाला पाहायला लागले, तर नवल वाटायला नको.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाहLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९