शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

माझ्या देशावर माझे प्रेम आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 23:53 IST

पुलवामानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

- धर्मराज हल्लाळेपुलवामानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. जवानांच्या शौर्याचा भारतीयांनी जल्लोष केला. तिरंगा फडकला, दुसऱ्या दिवशीही विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या धाडसी कारवाईने पाकिस्तानचे विमान कोसळले. परंतु अभिनंदन पाकिस्तानी हद्दीत शत्रूंच्या तावडीत सापडले. त्यावेळी प्रत्येक भारतीयाला अभिनंदनच्या सुटकेची प्रतीक्षा होती. दबावापुढे पाकिस्तान नरमले. अभिनंदन वाघा सीमेवरून मायभूमीत परतले. तो क्षणही भारतभर देशप्रेमाचा उत्सवाचा होता. अभिनंदन यांनी दाखविलेले धाडस आणि शत्रूच्या तावडीत राहून राखलेला स्वाभिमान स्फुरण आणणारा होता. ज्या- ज्या वेळी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. सैन्य कारवाई झाली, त्या- त्यावेळी भारतभर देशप्रेमाचे उत्स्फूर्त दर्शन घडते. अलिकडच्या काळात कारगिल घडले होते. त्याही वेळी आपण शत्रूला पाणी पाजले. ज्यावेळी कारगील घडत होते आणि एखादा जवान, अधिकारी शहीद होत होता, त्यावेळी हजारो तरुण आम्ही सैन्यात भरती होऊ असे ठणकावून सांगत होते. एक प्रसंग आठवतो कारगिल लढाईत लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील जवान आणि उदगीर येथील अधिकारी शहीद झाले. त्या दोन्ही शहिदांच्या अंत्ययात्रेला हजारो तरुण जमले होते. तिरंगा ध्वज हाती घेऊन सर्वजण पानगावच्या दिशेने धावत होते. भारत मातेचा जयघोष, शहीद जवानांचा गौरव आणि देशभक्तीने उसळलेला जनसागर सर्वत्र पाहायला मिळत होता. हीच स्थिती पुलवामानंतरही देशाच्या कानाकोपऱ्यात आपण पाहिली.शहीद झालेले कोलकाता येथील सीआरपीएफचे जवान बबलू संतारा, सीमाभागात दुर्घटनेत शहीद झालेले वायूदलातील अधिकारी निनाद मांडवगणे यांच्या वीरपत्नी जे काही बोलल्या ते अंतर्मुख करणारे आहे. बबलू संतारा यांच्या पत्नीने युद्ध नको शांतताच हवी, हे ठणकावून सांगितले. त्यापुढे जाऊन निनाद यांच्या वीरपत्नीने सोशल मिडियावर युध्द- युध्द करणाऱ्यांना सांगितलेले शब्द मोलाचे आहेत. दहशवादाविरुध्द युध्द करावेच लागेल. परंतु, प्रत्येकाने आपल्या परिवारातील एकाला सैन्यात पाठविण्याची तयारी ठेवली पाहिजे. ते कोणत्याही कारणामुळे शक्य नसेल तर स्वत:ला देशसेवेत झोकून दिले पाहिजे. छोट्या- छोट्या कामांमधूनही आपण देशप्रेम व्यक्त करु शकतो. नक्कीच, देशप्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वांनीच सीमेवर जाऊन लढले पाहिजे, असे नाही. आपल्या अवती-भवतीचे प्रश्न घेऊन आपण आपल्या देशावर प्रेम करु शकतो.युध्द काळात राष्ट्रभावना अधिक सजग असते. प्रत्येकाला आपले देशप्रेम व्यक्त करायचे असते आणि ते स्वाभाविकही आहे. परंतु, केवळ युध्दाची भाषा करुन देशप्रेम व्यक्त होते असे नाही. आपले सैन्य समर्थ आहे. त्यांच्या कारवाईला आपण पाठिंबा दिला पाहिजे. मात्र, त्याचबरोबर शांततेच्या काळातही आमचे आमच्या देशावरील प्रेम व्यक्त करताना आम्ही तसूभरही मागे नसले पाहिजे. थोर समाजसेवक, विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी प्रतिज्ञा नावाचे एक सुरेख पुस्तक लिहिले आहे. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक वाक्याचे निरुपण करणारे ते पुस्तक आहे. जेव्हा आपण माझे माझ्या देशावर प्रेम आहे असे म्हणतो तेव्हा मी नेमके काय केले पाहिजे, याचा विचार अंतर्मनात आला पाहिजे. नानाविध जात, धर्म, पंथाची माणसे या देशात गुण्या- गोविंदाने नांदतात. आम्ही इथले सौहार्द टिकले पाहिजे, यासाठी सदोदित सतर्क असले पाहिजे. सामाजिक सलोखा कायम राखला पाहिजे. दशतवाद्यांना समर्थन देणारे राष्ट्र जितके घातक, तितकेच आपल्याच अवती- भोवती राहून दहशवादी विचार आणि कृत्यांना समर्थन देणारेही घातक आहेत. विवेकी विचार संपविण्यासाठी माणसे मारणारा विचार गाडला पाहिजे. अर्थात आमची देशभक्ती ही प्रासंगिक ठरू नये. हा मोलाचा विचार निनादच्या वीरपत्नीने दिला आहे.दहशवादाचा बिमोड केला पाहिजे. एकदाची कटकट मिटविली पाहिजे. युध्दातून प्रश्न मार्गी लावला पाहिजे, हा विचार येणे स्वाभाविक आहे. परंतु, लष्करी कारवाई केल्यानंतरही आतंकवाद्यांचा गोळीबार सुरुच राहिला आहे. एकीकडे अभिनंदन सुखरुप आले, त्याचवेळी दहशतवाद्यांच्या चकमकीत पाच जवान शहीद झाले. स्वातंत्र्यापासून आजतागायत आपण युध्दही केले आणि शांततेची चर्चाही केली. एकीकडे शांततेची वार्ता सुरु असताना दहशतवाद्यांनी हल्ले केले, ही वस्तुस्थिती आहे. तरीही केवळ युध्द हा अंतिम पर्याय नाही, हे सांगणारा मोठा वर्ग आहे. सैन्यातील निवृत्त वरिष्ठ अधिका-यांनी दहशतवादाविरुध्दच्या कारवाईचे समर्थन करताना चर्चेचा मार्गही सांगितला. नक्कीच आज तातडीने ती वेळ नाही. पाकिस्तानला ठोस भूमिका घ्यावी लागेल. दहशतवादी कारवायांना जन्म देणारी ठिकाणे नेस्तनाबूत करावी लागतील. शेवटी आपले सैन्य ताकदीने लढेल आणि कायम जिंकेलही. त्यासाठी जयजयकार करताना माझे माझ्या देशावर प्रेम आहे आणि त्यासाठी मी युध्दजन्य स्थितीतच नव्हे तर कायम कटिबध्द आहे, ही ग्वाही छोट्या- छोट्या कृतीतून द्यावी लागणार आहे.

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान