शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

हजेरीपटाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 05:37 IST

सरकारी कार्यालय म्हणजे सुस्त कारभार असे काहीसे चित्र गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील धावपळ, बढतीसाठी रस्सीखेच, कामगिरीचे मूल्यांकन व नोकरी टिकविण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा सरकारी नोकरीत नाही.

सरकारी कार्यालय म्हणजे सुस्त कारभार असे काहीसे चित्र गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील धावपळ, बढतीसाठी रस्सीखेच, कामगिरीचे मूल्यांकन व नोकरी टिकविण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा सरकारी नोकरीत नाही. पण निवांतपणे सुरू असलेल्या अशा सरकारी कारभाराला मुंबई महापालिका प्रशासनाने धक्का दिला. हजेरी असलेल्याच दिवसांचा पगार असे धोरण अवलंबित प्रशासनाने तब्बल ४० हजार कर्मचारी-अधिकाºयांचा फेब्रुवारी महिन्यातील पगार कापला. काही जणांच्या बँकेच्या खात्यात दोनशे ते चारशे रुपये पगार जमा झाल्याने कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली. ही पद्धत बंद पाडण्यासाठी दबावतंत्र सुरू आहे. पाणी, आरोग्य, शिक्षण, सफाई अशा मूलभूत नागरी सुविधांची जबाबदारी उचलणाºया महापालिकेच्या विविध कार्यालयांशी सर्वसामान्य नागरिकांचा दररोजचा संपर्क होत असतो. मात्र काही अपवाद वगळता या कार्यालयातील सरकारी कारभारामुळे मनस्ताप, गैरसोय व प्रतीक्षा मुंबईकरांच्या वाट्याला येते. अशा अनेक तक्रारी आल्या तरी कामचुकार कर्मचाºयांना शिस्तीचे धडे देण्याची तरतूद नव्हती. यामुळे दांडीबहाद्दर व हजेरी लावून पळ काढणाºया कामचुकार कर्मचाºयांचे फावले होते. मात्र कर्मचाºयांसाठी नियमावली, त्यांच्या कामाचे मूल्यांकन करण्याचे अनेक प्रस्ताव बारगळले. अखेर जुलै २०१७ पासून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली. यासाठी महापालिकेच्या कार्यालयांमध्ये ३९०० मशीन्स लावल्या. मात्र वारंवार ताकीद देऊनही बायोमेट्रिक हजेरी न नोंदविणाºया कर्मचाºयांवर आता पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे. वेळेआधी कार्यालय सोडणे, अर्ध्या दिवसाची रजा घेऊन त्याची नोंद न करणे, तसेच कामाचे तास व वेळ नोंद न केल्यामुळे या सर्व कर्मचाºयांच्या पगारातील त्या दिवसांची रक्कम कापली आहे. अभियंत्यांच्या कामाचे तास निश्चित नसल्याने त्यांना १६-१६ तासही काम करावे लागते. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी पद्धतीतून त्यांना वगळण्याची मागणी होत आहे. तर काहींनी ही पद्धतच रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बायोमेट्रिक पद्धतीतील त्रुटींबाबत वाद असू शकतो, पण ही पद्धत असल्यास त्यात गैर काय? कर्मचाºयांचा हा कम्फर्ट झोन काढून घेतल्यामुळे काही काळ ही अस्वस्था दिसून येणारच. बिगर शासकीय संस्थांचे अहवाल महापालिकेने कितीही नाकारले, तरी नागरी तक्रारींचे निवारण करण्यास लागणारा ७० ते ८० दिवसांचा कालावधी भूषणावह नाही. नागरी सेवांचा दर्जा राखण्यासाठी पालिका कारभारात शिस्त हवीच. बायोमेट्रिक पद्धतीमुळे ही शिस्त येणार असेल तर त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हायलाच हवी.