शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

हजेरीपटाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 05:37 IST

सरकारी कार्यालय म्हणजे सुस्त कारभार असे काहीसे चित्र गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील धावपळ, बढतीसाठी रस्सीखेच, कामगिरीचे मूल्यांकन व नोकरी टिकविण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा सरकारी नोकरीत नाही.

सरकारी कार्यालय म्हणजे सुस्त कारभार असे काहीसे चित्र गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील धावपळ, बढतीसाठी रस्सीखेच, कामगिरीचे मूल्यांकन व नोकरी टिकविण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा सरकारी नोकरीत नाही. पण निवांतपणे सुरू असलेल्या अशा सरकारी कारभाराला मुंबई महापालिका प्रशासनाने धक्का दिला. हजेरी असलेल्याच दिवसांचा पगार असे धोरण अवलंबित प्रशासनाने तब्बल ४० हजार कर्मचारी-अधिकाºयांचा फेब्रुवारी महिन्यातील पगार कापला. काही जणांच्या बँकेच्या खात्यात दोनशे ते चारशे रुपये पगार जमा झाल्याने कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली. ही पद्धत बंद पाडण्यासाठी दबावतंत्र सुरू आहे. पाणी, आरोग्य, शिक्षण, सफाई अशा मूलभूत नागरी सुविधांची जबाबदारी उचलणाºया महापालिकेच्या विविध कार्यालयांशी सर्वसामान्य नागरिकांचा दररोजचा संपर्क होत असतो. मात्र काही अपवाद वगळता या कार्यालयातील सरकारी कारभारामुळे मनस्ताप, गैरसोय व प्रतीक्षा मुंबईकरांच्या वाट्याला येते. अशा अनेक तक्रारी आल्या तरी कामचुकार कर्मचाºयांना शिस्तीचे धडे देण्याची तरतूद नव्हती. यामुळे दांडीबहाद्दर व हजेरी लावून पळ काढणाºया कामचुकार कर्मचाºयांचे फावले होते. मात्र कर्मचाºयांसाठी नियमावली, त्यांच्या कामाचे मूल्यांकन करण्याचे अनेक प्रस्ताव बारगळले. अखेर जुलै २०१७ पासून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली. यासाठी महापालिकेच्या कार्यालयांमध्ये ३९०० मशीन्स लावल्या. मात्र वारंवार ताकीद देऊनही बायोमेट्रिक हजेरी न नोंदविणाºया कर्मचाºयांवर आता पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे. वेळेआधी कार्यालय सोडणे, अर्ध्या दिवसाची रजा घेऊन त्याची नोंद न करणे, तसेच कामाचे तास व वेळ नोंद न केल्यामुळे या सर्व कर्मचाºयांच्या पगारातील त्या दिवसांची रक्कम कापली आहे. अभियंत्यांच्या कामाचे तास निश्चित नसल्याने त्यांना १६-१६ तासही काम करावे लागते. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी पद्धतीतून त्यांना वगळण्याची मागणी होत आहे. तर काहींनी ही पद्धतच रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बायोमेट्रिक पद्धतीतील त्रुटींबाबत वाद असू शकतो, पण ही पद्धत असल्यास त्यात गैर काय? कर्मचाºयांचा हा कम्फर्ट झोन काढून घेतल्यामुळे काही काळ ही अस्वस्था दिसून येणारच. बिगर शासकीय संस्थांचे अहवाल महापालिकेने कितीही नाकारले, तरी नागरी तक्रारींचे निवारण करण्यास लागणारा ७० ते ८० दिवसांचा कालावधी भूषणावह नाही. नागरी सेवांचा दर्जा राखण्यासाठी पालिका कारभारात शिस्त हवीच. बायोमेट्रिक पद्धतीमुळे ही शिस्त येणार असेल तर त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हायलाच हवी.