शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Bandh: फडणवीस जागे व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 11:29 IST

Mumbai Bandh: राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा अन्वयार्थ प्रत्येकजण स्वत:च्या सोईने काढताना दिसतो.

सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या घटना-घडामोडी या महाराष्ट्राच्या परंपरेला अन् प्रतिष्ठेला शोभा देणाऱ्या नाहीत. आपल्या मागण्या व भावना राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सकल मराठा समाजाने याच राज्यात संयम, शिस्त आणि विराटतेचे दर्शन घडविले होते. त्याच राज्यात मागील काही दिवसात मराठा समाजाच्या विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी वारीच्या महापूजेला रोखण्यापासून ते महाराष्ट्र बंद करण्यापर्यंतचे मार्ग या आंदोलनात अवलंबिले जात आहेत. आंदोलनाच्या याच प्रवासात काकासाहेब शिंदे या मराठवाड्यातील तरुणाचा बळी गेला. राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा अन्वयार्थ प्रत्येकजण स्वत:च्या सोईने काढताना दिसतो. कोण काय अर्थ काढतो, यात आम्हाला रस नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्य घटनेतील कायद्याच्या चौकटीतील कोणत्याही जातीच्या आरक्षणाचे आम्ही नेहमीच ठोस समर्थन केलेले आहे. त्याच चौकटीत आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचे देखील समर्थनच करतो. पण सध्या राज्यात ज्या घटनांची मालिका चालू आहे, त्याकडे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

केवळ विधिमंडळ आणि उपलब्ध होणाऱ्या व्यासपीठावरून मराठा आरक्षण समर्थनाची शाब्दिक उधळण करणे किंवा कागदी घोडे नाचविणे आता देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी थांबविले पाहिजे. सर्वच राजकीय मंडळी आणि राज्यकर्ते वर्षानुवर्षे मराठा आरक्षणाचे समर्थन करीत आलेले आहेतच! सर्वांची भाषा समर्थनाची पण समाजाच्या पदरात मात्र काहीच नाही, ही भावना मराठा समाजात वाढीस लागल्यामुळेच आज परिस्थिती चिघळली आहे. केवळ तांत्रिक मुद्दे उपस्थित करून चालढकल केली जात असल्याचा संदेश मराठा समाजात रुजतो आहे. अशा परिस्थितीत विश्वासार्ह संवाद आणि त्याला अनुसरून कृती एवढा एकच मार्ग उरतो !

मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, भाजपाचे खासदार संभाजीराजे छत्रपती तसेच मराठा समाजाबरोबरच सर्वच घटकांना संंयमाचे आवाहन करणाऱ्या विविध मराठा संघटनांच्या नेत्यांचे आम्ही राज्यातील जनतेच्यावतीने आभार मानू. त्यांचे संयम व शांततेचे आवाहन सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यास बळकटी देणारे आहे. राज्यातील सर्व पक्षांच्या मराठा नेत्यांना एकत्र करून मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधावा, अशी खा.संभाजीराजे यांची भूमिका निश्चितच चांगली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने नेमलेल्या ‘राणे समिती’चे प्रमुख व विद्यमान खा. नारायण राणे यांनीही संयम व समन्वयवादी भूमिका घेऊन समाजापुढे यायला हवे. मराठा क्रांती मूकमोर्चानंतर फडणवीस सरकारने त्या समाजाला दिलेल्या अभिवचनांचा केवळ पाढा न वाचता केलेल्या कृतींचा लेखा-जोखा मांडला जावा. राज्यात होणाऱ्या ७२ हजार जागांच्या मेगा नोकर भरतीत मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जाहीर केलेला मराठा समाजासाठीचा १६ टक्के ‘बॅकलॉग’ कायद्याच्या कसोटीवर घासून-पुसून जनतेपुढे मांडावा. खरे तर मराठा समाजाच्या तुळजापूरला सुरू झालेल्या आंदोलनापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य परिस्थितीचा अंदाज घ्यायला हवा होता. आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध संघटनांच्या नेत्यांना सन्मानपूर्वक बोलावून संवाद साधायला हवा होता. तसे घडले नाही. आता ती चूक सुधारून संवादाची मोहीम सुरू करावी. त्यातूनच शांततेचा व सामजंस्याचा सर्वमान्य मार्ग सापडेल. वेळकाढूपणा परवडणारा नाही. पुरोगामी महाराष्ट्रातील केवळ मराठाच नव्हे तर तमाम जनतेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तशी अपेक्षा आहे. म्हणूनच... फडणवीस जागे व्हा!

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMumbai Bandhमुंबई बंदMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBJPभाजपा