शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

मुक्ताई पावेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 12:05 IST

- मिलिंद कुलकर्णीचार वर्षांपासून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणाऱ्या राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यासाठी अखेर कारभारी गवसले. अ‍ॅड.रवींद्र पाटील हे पक्षाचे हुकुमी एक्के आहेत. जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने शरद पवार आणि पक्ष हे जी जबाबदारी सोपवतील, ती प्रामाणिकपणे निभावण्याचे व्रत पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाळलेले आहे. सुरेशदादा ...

- मिलिंद कुलकर्णीचार वर्षांपासून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणाऱ्या राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यासाठी अखेर कारभारी गवसले. अ‍ॅड.रवींद्र पाटील हे पक्षाचे हुकुमी एक्के आहेत. जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने शरद पवार आणि पक्ष हे जी जबाबदारी सोपवतील, ती प्रामाणिकपणे निभावण्याचे व्रत पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाळलेले आहे. सुरेशदादा जैन यांच्याविरुध्द जळगाव मतदारसंघाची निवडणूक असो की, मुक्ताईनगरात एकनाथराव खडसे यांच्याविरोधातील लढत असो, पक्षादेश पाळून पाटील रिंगणात उतरतात. जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचा अनुभव गाठीशी असलेल्या पाटील यांचा स्वभाव मवाळ, सौजन्यशील आणि समन्वयवादी आहे. संत मुक्ताई संस्थानची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असले तरी वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे पेलत आहेत. सातत्याने संत मुक्ताईचा गजर केला तरच आपण भक्त, वारकरी आहोत, असे न मानण्याची प्रगल्भता त्यांच्यात आहे. नवीन जबाबदारी निभावताना संत मुक्ताई त्यांना पावते काय, हे आता बघायचे. वडील एकनाथराव पाटील यांची पुण्याई पाठीशी असतानाही पाटील यांनी शरद पवार यांच्याशी कायम निष्ठा ठेवली. आमीषे, प्रलोभने त्यांना आली असतील, पण ती त्यांनी स्विकारली नाही, तसेच त्याची खाजगीतदेखील वाच्यता केलेली नाही. त्यांच्या याच गुणांमुळे पवार कुटुंबियांमधील सर्वच सदस्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. जळगावात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची शाखा स्थापन करण्याचा विषय आला तेव्हा पाटील यांचे नाव समितीत अग्रभागी होते. पाटील हे एक सज्जन राजकारणी आहेत. त्यामुळे निवड चांगली असली तरीही पक्षाला सद्य स्थितीत आक्रमक नेतृत्वाची आवश्यकता आहे, हे विसरुन चालणार नाही. पाटील यांची निवड का झाली असावी,याविषयी राजकीय वर्तुळात जे अंदाज व्यक्त केले जातात, ते पाहता पक्षात नेते खूप आहेत आणि सगळ्यांची तोंडे परस्परविरोधी आहेत. पक्षाला या नेत्यांमध्ये समन्वय साधणारे नेतृत्व हवे आहे, त्या निकषामध्ये रवींद्र पाटील बसतात. विलास भाऊलाल पाटील यांच्यारुपाने अभ्यासू आणि तळमळीचा कार्यकर्ता जिल्हाध्यक्षांना सहकारी म्हणून मिळाला आहे. मात्र जळगावच्या अध्यक्षाचा शोध अद्याप संपलेला नाही.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव