शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

मुक्ताई पावेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 12:05 IST

- मिलिंद कुलकर्णीचार वर्षांपासून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणाऱ्या राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यासाठी अखेर कारभारी गवसले. अ‍ॅड.रवींद्र पाटील हे पक्षाचे हुकुमी एक्के आहेत. जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने शरद पवार आणि पक्ष हे जी जबाबदारी सोपवतील, ती प्रामाणिकपणे निभावण्याचे व्रत पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाळलेले आहे. सुरेशदादा ...

- मिलिंद कुलकर्णीचार वर्षांपासून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणाऱ्या राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यासाठी अखेर कारभारी गवसले. अ‍ॅड.रवींद्र पाटील हे पक्षाचे हुकुमी एक्के आहेत. जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने शरद पवार आणि पक्ष हे जी जबाबदारी सोपवतील, ती प्रामाणिकपणे निभावण्याचे व्रत पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाळलेले आहे. सुरेशदादा जैन यांच्याविरुध्द जळगाव मतदारसंघाची निवडणूक असो की, मुक्ताईनगरात एकनाथराव खडसे यांच्याविरोधातील लढत असो, पक्षादेश पाळून पाटील रिंगणात उतरतात. जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचा अनुभव गाठीशी असलेल्या पाटील यांचा स्वभाव मवाळ, सौजन्यशील आणि समन्वयवादी आहे. संत मुक्ताई संस्थानची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असले तरी वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे पेलत आहेत. सातत्याने संत मुक्ताईचा गजर केला तरच आपण भक्त, वारकरी आहोत, असे न मानण्याची प्रगल्भता त्यांच्यात आहे. नवीन जबाबदारी निभावताना संत मुक्ताई त्यांना पावते काय, हे आता बघायचे. वडील एकनाथराव पाटील यांची पुण्याई पाठीशी असतानाही पाटील यांनी शरद पवार यांच्याशी कायम निष्ठा ठेवली. आमीषे, प्रलोभने त्यांना आली असतील, पण ती त्यांनी स्विकारली नाही, तसेच त्याची खाजगीतदेखील वाच्यता केलेली नाही. त्यांच्या याच गुणांमुळे पवार कुटुंबियांमधील सर्वच सदस्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. जळगावात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची शाखा स्थापन करण्याचा विषय आला तेव्हा पाटील यांचे नाव समितीत अग्रभागी होते. पाटील हे एक सज्जन राजकारणी आहेत. त्यामुळे निवड चांगली असली तरीही पक्षाला सद्य स्थितीत आक्रमक नेतृत्वाची आवश्यकता आहे, हे विसरुन चालणार नाही. पाटील यांची निवड का झाली असावी,याविषयी राजकीय वर्तुळात जे अंदाज व्यक्त केले जातात, ते पाहता पक्षात नेते खूप आहेत आणि सगळ्यांची तोंडे परस्परविरोधी आहेत. पक्षाला या नेत्यांमध्ये समन्वय साधणारे नेतृत्व हवे आहे, त्या निकषामध्ये रवींद्र पाटील बसतात. विलास भाऊलाल पाटील यांच्यारुपाने अभ्यासू आणि तळमळीचा कार्यकर्ता जिल्हाध्यक्षांना सहकारी म्हणून मिळाला आहे. मात्र जळगावच्या अध्यक्षाचा शोध अद्याप संपलेला नाही.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव