शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

माणसाच्या श्वासासाठीची चळवळ

By गजानन दिवाण | Updated: February 13, 2020 08:12 IST

जशी समज येत गेली तसे कधी विकासाच्या नावाखाली, तर कधी अन्य कुठल्या कारणासाठी आम्ही याच झाडांवर कुºहाड चालविली.

झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, हे प्राथमिक धडे सर्वांनीच गिरवले. जशी समज येत गेली तसे कधी विकासाच्या नावाखाली, तर कधी अन्य कुठल्या कारणासाठी आम्ही याच झाडांवर कुºहाड चालविली. रुग्णालयात आॅक्सिजन लावल्यानंतर क्षणाक्षणाला वाढणारे बिल प्रत्येकाला माहीत असले तरी ‘ऑक्सिजन’ची खरी किंमत आम्ही ओळखलेलीच नाही. तसे नसते तर खुलेआम झाडांची कत्तल केली गेली नसती. यावर बोलण्याचीही सोय नाही. विकास हवा की पर्यावरण म्हणत हे विकासवादी पर्यावरणवाद्यांची तोंडे बंद करण्यासाठी सरसावतात. एकीकडे ३३ हजार कोटी झाडे लावण्याचा इव्हेंट साजरा करायचा आणि त्याच वेळी रस्त्यांच्या विस्तारीकरणासाठी पूर्णवाढ झालेली हजारो झाडे तोडायची, हा कुठला न्याय? अशा इव्हेंटप्रिय जगात मराठवाड्यासारख्या कायम दुष्काळ सहन करणाऱ्या भागात आशेचा एक किरण दिसत आहे. सह्याद्री देवराईचे निर्माते अभिनेते सयाजी शिंदे १३ आणि १४ फेब्रुवारी असे दोन दिवस वृक्षसंवर्धनाचा जागर करणार आहेत.

वृक्षसंवर्धनाचा जागर करण्यासाठी राज्यात मराठवाड्यासारखे दुसरे ठिकाण नसावे. वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका याच परिसराने सहन केला. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पूजलेला आहे. म्हणूनच सयाजी शिंदे यांनी बीडजवळील पालवनच्या उजाड माळरानावर हे वृक्षसंमेलन आयोजित केले आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ साली पालवन येथे अगदी बोडका असलेला डोंगर सयाजी शिंदे यांनी निवडला. प्रारंभी ३५ एकरांवरच वृक्ष लागवड केली. आज २०७ एकरांवर एक लाख ६७ हजार झाडे लावली असून अगदी बोडका असलेला हा डोंगर आता हिरवा शालू नेसून नटला आहे. बोडक्या डोंगराचे नटलेले हे रूप सर्वांसमोर आणण्यासाठी सयाजी शिंदे यांनी बीडजवळील याच डोंगरावर हे वृक्षसंमेलन आयोजित केले आहे. ‘३३ कोटी’ वृक्षारोपणाच्या इव्हेंटनंतर असे ठिकठिकाणी जंगल दाखवता आले तर त्याचे यश समजू शकले असते; पण मागच्याच वर्षीच्या खड्ड्यात पुन्हा-पुन्हा झाड लावले तर केवळ कागदांवरील झाडांची संख्या वाढते. म्हणूनच सयाजी यांनी केलेले हे काम वृक्षारोपणाचे इव्हेंट करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

भारतीय वनांची सद्य:स्थिती दर्शविणारा ‘इंडियाज स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ अलीकडेच समोर आला. त्यात महाराष्ट्र देशात सहाव्या स्थानाहून ११व्या स्थानावर फेकले गेले आहे. २०१७च्या अहवालानुसार राज्यात ८,७३६ चौ.कि.मी. घनदाट २०,६५२ चौ.कि.मी. मध्यम दाट व २१,२९१ चौ.कि.मी. विरळ जंगल होते. या तिन्ही प्रकारांत आता घट झाली. राज्यात केवळ विरळ जंगल वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये जे ‘अत्यंत घनदाट’ व ‘सर्वसाधारण दाट’ जंगल ७ डोंगराळ जिल्हे व १२ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये आहे. या आदिवासी जिल्ह्यांमध्येच घनदाट, मध्यम दाट व विरळ या तिन्ही जंगल प्रकारात घट नोंदविण्यात आली आहे. मग राज्यात २०१९ साली ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. ही झाडे गेली कुठे? यातली किती झाडे जगली? राज्य शासनाच्या वृक्षलागवडीच्या या इव्हेंटवर सयाजी यांनी टीका करताच मोठा गोंधळ उडाला. एका खड्ड्यात किती झाडे लावणार, हा त्यांचा सवाल चर्चेत खूप राहिला. तो गांभीर्याने कोणीच घेतला नाही. आम्हाला वृक्षारोपण करण्याची मोठी हौस जडली आहे. वेगवेगळ्या निमित्ताने ही हौस आम्ही भागवतो आणि सोशल मीडियातून व्हायरल करतो. लावलेली ही झाडे जगवायची कोणी? वृक्षारोपण महत्त्वाचे आहेच, त्याचे संवर्धनही तेवढेच महत्त्वाचे आहे.

जगाची लोकसंख्या १.६ अब्जांनी वाढली आहे. एवढ्या संख्येने असलेल्या लोकांचे पोट भरण्यासाठी आम्ही निसर्ग अक्षरश: ओरबाडून खात आहोत. परिणामी, हरितगृह वायूंचे उत्सर्जन ४८ टक्क्यांनी वाढले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत पृथ्वीच्या तापमानात झालेल्या वाढीपैकी ८५ टक्के तापमानवाढ एकट्या कार्बन डायआॅक्साइडमुळे झाली आहे. अधिकाधिक वाहनांचा आणि विजेचा वापर हे यामागचे मूळ कारण. यातून कार्बन डायआॅक्साईडची निर्मिती करीत आम्ही तापमानवाढीला हातभार लावत असतो. ही तापमानवाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली म्हणजेच वनांखाली असणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नाही. वृक्षलागवडीचे इव्हेंट वाढले असले तरी गेल्या २५ वर्षांत ३०० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील वने तोडण्यात आली, हे भयंकर वास्तव नाकारून कसे चालेल?

भारतामध्ये १९८० ते २००५ या कालावधीत १ लाख, ६४ हजार ६१० हेक्टर जंगलांचे खाणींमध्ये रूपांतर झाले आहे. खाणीसाठी रूपांतरित झालेल्या वनजमिनीपैकी निम्म्याहून अधिक जमिनीवर आज कोळशाच्या खाणी आहेत. हा देशाचा विकास समजायचा, की पर्यावरणाचा ºहास? अशा चिंताजनक स्थितीतून आम्ही जात असताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी हाती घेतलेले हे काम असामान्य आहे. हा सयाजी यांचा पडद्यावरचा अभिनय नाही. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी अभिनेत्याने हाती घेतलेली ही श्वासासाठीची लढाई आहे. या लढाईत त्यांना साथ कोण देणार?- गजानन दिवाण उपवृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण