शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

मोसमी पावसाचा घोर, त्यात बनावट बियाणांचे चोर!

By वसंत भोसले | Updated: June 20, 2023 07:46 IST

मोसमी पावसाने शेतकऱ्यांना घोर लावला आहे. त्यात बोगस बियाणांमुळे शेती आणि शेतकरी भरडले जात आहेत. या दुहेरी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढले पाहिजे.

- डाॅ. वसंत भोसले(संपादक, लोकमत, कोल्हापूर)

मोसमी  पावसाने साऱ्यांची झोप उडवल्याची चर्चा चालू असली तरी खरीप हंगाम हातून गेला आहे, असा निष्कर्ष तातडीने काढण्याची गरज नाही. मोसमी पावसाचे आगमन आता कोठे होणार आहे. त्याला सोळापैकी दोन आठवड्यांचा उशीर झाला आहे. संपूर्ण देशभरात पोहोचण्यासाठीदेखील तेवढाच उशीर होणार आहे. गेल्या काही वर्षांतील हवामान बदल पाहिले तर इतका उशीर समजून घेता येईल.महाराष्ट्रात पहिल्या दोन आठवड्यांत सरासरी ११५ मिलिमीटर पाऊस पडतो, असे अनेक वर्षांच्या आकडेवारीवरून सांगण्यात येते.

सध्या तरी दहा टक्केच पाऊस झाला आहे. सुमारे शंभर मिलिमीटरने उणे पाऊस झाला आहे. ही गती अशीच राहील, असे मानण्याचे कारण नाही. खरीप हंगामातील पिकांची पेरणी १५ जून ते १५ जुलैपर्यंत होत राहते. अद्याप तीन आठवडे आहेत. त्यानंतरही पेरण्या होतील. त्यास थोडा उशीर झालेला असेल. खरीप हंगामावर गेल्या वर्षी जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्याने परिणाम झाला होता आणि खरीप पिकांच्या कापणीच्या वेळी जोरदार पाऊस झाल्याने साधलेले पीकही हातचे गेले होते. गतवर्षीच्या हंगामात नुकसानीचे तीन वेळा पंचनामे करावे लागले होते, त्याच्या आधारावर नुकसानभरपाई देण्याची घोषणा वारंवार करावी लागली होती. ही अवस्था दरवर्षी उद्भवणार आहे. त्याची तयारी सरकारच्या पातळीवर होताना दिसत नाही. निसर्गानेही आता पाठ फिरविली आहे! बाजारपेठेतील चढ-उताराने शेतकरी हैराण होतोय. आता मोसमी पाऊस संधी घेऊन न येता संकट घेऊन येऊ लागला आहे. 

दुसऱ्या बाजूला उत्पादित मालाच्या आधारे चढ-उतार करून गैरफायदा घेणारी बाजारपेठ तयारच असते. बनावट खते आणि बियाणी तयार करून विकणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. शेतमालाच्या उत्पादनावर या देशाची आर्थिक व्यवस्था चालते. तरीदेखील या शेतीची निगा राखणारी खते, औषधे अणि बियाणे तयार करणाऱ्या बनावट कंपन्यांचा सुळसुळाट आहे. वास्तविक, हा फार मोठा गुन्हा आहे. समाजद्रोह आहे. देशाची आर्थिक स्थिती बिघडविण्यास कारणीभूत ठरणारी ही साखळी आहे. महाराष्ट्रात कृषी खात्याची महाकाय यंत्रणा आहे. सुमारे तीस हजार कर्मचारी, अधिकारी वर्ग या खात्याकडे आहेत. त्यांनी प्रत्यक्षात शेती करायची नाही तर शेती करणाऱ्या शेतकऱ्यास मदत करायची आहे. मार्गदर्शन करायचे आहे.

शेतकऱ्यांना उत्तम बियाणे दिल्यास मोसमी पावसाने साथ दिली तर सर्वोत्तम उत्पादन भरघोस येऊ शकते, हा तांदूळ आणि गव्हाच्या बाबतीत आलेला अनुभव आहे. त्यासाठी मोसमी पावसातील बदलाची गांभीर्याने नोंद घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे. त्यापेक्षा अधिक सतर्कता बनावट खते आणि बियाणांविषयी बाळगणे महत्त्वाचे आहे. मराठवाडा तसेच खान्देशातून अशा बनावट बियाणांच्या सुळसुळाटाच्या बातम्या येत आहेत. त्यांच्यावर समाजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. दरम्यान, मोसमी पावसाच्या आगमनास उशीर होतो आहे, याचा परिणाम कडधान्ये उत्पादनावर होईल, अशी अफवा पसरविणे चालू झाले आहे. परिणामी, कडधान्याचे दर वाढत राहतील. महागाई वाढेल, अशी अर्धवट माहिती दिली जाऊ लागली आहे.

अशा वातावरणात सरकारने अधिक आणि खरी माहिती देण्याचे काम केले पाहिजे. बदलत्या हवामानाचा परिणाम होतच राहणार आहे. त्यातील चढ- उतार वाढतील तसे शेतीवर परिणाम होणारच आहे. तो गृहीत धरून नियोजन करावे लागणार आहे. पीक पद्धतीत अचानक बदल करता येत नाहीत. ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वानुसार बाजारपेठेची गरज पाहूनच शेतीचे नियोजन करावे लागणार आहे. याबाबत सरकार गंभीर नाही. येत्या पंधरा दिवसांत मोसमी पाऊस सर्वदूर पसरला तर खरीप हंगामावरील संकट टळेल. विदर्भ आणि मराठवाडा वगळता बहुतांश भागात उन्हाळी पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याचा वापर अधिकाधिक झाला आहे.

आता त्याचा साठा जेमतेम दोन-तीन आठवडे पुरेल इतका शिल्लक आहे. याचाच अर्थ सर्व काही मोसमी पावसावर अवलंबून आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल झाला असताना पेरलेले बियाणे बनावट निघाले तर शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान होईल. अधिक उत्पादनासाठी सकल बियाणे, उत्तम खते आणि परिणामकारण औषधांचा पुरवठा कसा होईल, याची तरी जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. अशा दुहेरी संकटातून शेती-शेतकऱ्यांना सोडविले पाहिजे.

टॅग्स :Farmerशेतकरी