शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

खोडकर मोदी?

By admin | Updated: August 20, 2015 22:46 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात जे आणि जसे झाले, तसेच बिहार विधानसभेच्या निवडणूक प्रचाराबाबतही बहुधा होईल अशी लक्षणे दिसू लागली आहेत

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात जे आणि जसे झाले, तसेच बिहार विधानसभेच्या निवडणूक प्रचाराबाबतही बहुधा होईल अशी लक्षणे दिसू लागली आहेत. नरेन्द्र मोदी यांनी एखादा वादग्रस्त मुद्दा मांडायचा आणि सर्व पक्षांनी त्याचीच चर्चा करीत राहायचे, असे तेव्हां घडले होते. त्यातून होत होते ते असे की, मोदी हे एकमात्र नाव सार्वजनिक चर्चेत गाजत राहिले. याच सप्ताहात मोदींनी बिहारात दोन जाहीर सभा घेऊन त्या राज्यातील भाजपाच्या प्रचाराचा आरंभ केला. पैकी एका सभेत त्यांनी अत्यंत नाटकी अभिनिवेश धारण करुन बिहारसाठी तब्बल सव्वा लाख हजार कोटी रुपयांचे घसघशीत संपुट (पॅकेज) जाहीर केले. ते करताना बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांना उद्धट असे विशेषण बहाल केले व त्यांनी संपुआ सरकारकडे बिहारसाठी अवघे बारा हजार कोटी रुपयांचे संपुट मागितले होते असे सांगून त्यांची खिल्ली उडवली. बिमारु राज्यांच्या संकल्पनेत आघाडीवर असलेल्या त्या राज्यातील किती जनतेपर्यंत मोदींचे ठसठशीत संपुट पोहोचले असेल याची शंकाच आहे. पण ते आता पोहोचते करण्याचे काम नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प्रामाणिकपणे करीत आहेत. या तिघांचा स्वर आणि सूर मोदींच्या विरोधातला असला आणि मोदी खोटी आश्वासने देण्यात पटाईत असल्याचा आरोप हे तिघेही करीत असले तरी त्यांनी सव्वालाख हजार कोटींचे संपुट जाहीर केल्याचे अनायासे बिहारी जनतेपुढे मांडले जात आहे. अशी संपुटे जाहीर करण्याची अलीकडच्या काळात टूमच निघाली आहे. त्याला कोणताही पक्ष, कोणताही नेता आणि कोणतेही राज्य अपवाद नाही. बऱ्याचदा एखाद्या राज्यासाठी अगोदरच जाहीर झालेल्या वा आधीच तरतूद केल्या गेलेल्या योजनांचा कालाकित्ता करुन त्याला पॅकेज असे गोंडस नाव दिले जाते. त्यातून मोदी यांनी जाहीर केलेल्या पॅकेजसाठी बहुधा काही व्यापारी संस्थांच्या जाहिरातींप्रमाणे ‘अटी लागू’ असा प्रकार असणारच. म्हणजे मोदींच्या पक्षाला बिहारी जनतेने सत्ता प्रदान केली तरच पॅकेज दिले जाईल, अशी काहीतरी अट असणारच. मोदींनी तिचा उच्चार केला नाही कारण त्यांनी लोक आपल्या मागेच येतील असे गृहीत धरले असणार. आता ते काम वरील नेते करीत असल्याने त्यांना कामाला लावणारे मोदी खोडकर नव्हेत तर काय?