शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
3
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
4
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
5
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
6
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
7
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
8
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
10
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
11
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
12
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
13
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
14
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
15
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
16
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
17
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
18
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
19
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
20
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

राजाला सांगा, पोपट उपाशी आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 05:41 IST

उत्पन्न एक तर घटलं आहे किंवा वाढत नाहीये आणि भाववाढ मात्र मानगुटीवर बसलेली, अशा कात्रीत आपण सापडलो आहोत.

- पवन वर्मा, राजकीय विषयाचे विश्लेषकसध्या देशात सर्व छान-छान चालल्याचा उन्माद दिसतो, तो सगळा प्रभावी प्रचार, प्रसिद्धी, जाहिराती, माहितीत फेरफार करणे आणि काही वेळा चक्क खोटे बोलणे, या सगळ्याचा एकत्रित परिणाम! प्रसिद्धीवर होणारा खर्च पाहता भ्रम निर्माण होणार आणि जे घडावे असे वाटते ते सत्य म्हणून वारंवार सांगितले गेल्याने सारे उत्तम चालले आहे, या संतुष्टीत सगळे बुडून जाणार, मग वास्तव कितीही भीषण असो! वास्तवाशी कुणाला काय देणे-घेणे आहे? देशाची अर्थव्यवस्थाच पाहा. आर्थिक घडी लक्षणीय वेगाने पुन्हा बसते आहे आणि पृथ्वीवरील या स्वर्गात सारे आलबेल आहे, असे सरकार दाखवू इच्छिते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात तर जगात पहिला नंबर मिळवील, असे परस्पर-प्रशंसेचे सोहळे चालू आहेत. एकमेकांचे कसे उत्तम चाललेय हे  बिचाऱ्या जनतेसमोर रोज नवे आकडे समोर फेकून दोघे सांगत असतात;  परंतु वास्तव काय आहे?- जीएसटी घाईने लादणे आणि आणि मोठ्या नोटा चलनातून बाद केल्याने वापरातली ८६ टक्के रोकड  निघून गेली. त्यात कोविडची भर पडली. स्थलांतरित मजुरांचे हाल-हाल झाले. अर्थव्यवस्था रक्तबंबाळ झाली. सामान्य माणसांच्या नोकऱ्या गेल्या, किमती गगनाला भिडल्या, लोकांच्या हालअपेष्टांना पारावार राहिला नाही.

२०१७-१८ च्या उपलब्ध आकडेवारीनुसार ४५ वर्षांत प्रथमच बेकारी ६.१ टक्क्यांवर गेली होती, त्यानंतर आजअखेर  बेरोजगारांची संख्या दुपटीने वाढली. १५ ते २५ या वयोगटात ती तिप्पट म्हणजे ६ वरून १८ टक्क्यांवर गेली. परिणामी, ७.५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या खाली ढकलले गेले. मध्यमवर्गालाही जोरदार फटका बसला. ‘प्यू’ या संस्थेच्या पाहणीनुसार एकतृतीयांश मध्यमवर्ग पुन्हा गरिबीत गेला. लोकांना नोकरी मिळेनाशी झाली, होती त्यांची गेली.उत्पन्न एक तर घटले आहे किंवा वाढत नाहीये आणि भाववाढ मात्र मानगुटीवर बसलेली, अशा कात्रीत आपण सापडलो आहोत. खाद्यतेलांच्या किमती २०२० मध्ये ८० रुपये लिटर होत्या, त्या १८० वर गेल्या. गेल्या १३ वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. वर्षभरापूर्वी दिल्लीत पेट्रोल ८० रुपये लिटर होते आता ते १०० च्या पुढे गेले आहे. याच काळात डिझेल ८० वरून ८९ रुपयांवर गेले. नोव्हेंबरमध्ये स्वयंपाकाचा गॅस ५९४ रुपये होता, आज तो ८३४ रुपये आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने सर्वच वस्तू महागल्या आहेत. स्थूल आर्थिक लक्षणेही तितकीशी चांगली नाहीत. २०१४ साली मोदींचे राज्य आले तेव्हा देशांतर्गत एकंदर उत्पन्न ७ ते ८ टक्के होते. कोविड येण्यापूर्वीही हे उत्पन्न ३ टक्के घसरले आणि आज ते उणे ३.१ इतके घसरले आहे. ९१ पासून निर्यात कधीही घसरली नव्हती. आज ती २०१३- १४ च्या पातळीखाली गेली आहे. घरगुती बचत खालावली असून, खप वाढत नाहीये.
भारत ५ महापद्म डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट हा जुमला झाला आहे. २०२५ पर्यंत आपण कसेबसे २.६ महापद्म डॉलर्सपर्यंत जाऊ. म्हणजे जे ठरवले त्याच्या निम्मे!  शेतीचे उत्पन्नही दुप्पट झालेले नाही. उलट शेतकरी दिल्लीच्या सीमेवर महिनोन्‌महिने धरणे धरून बसले आहेत. आवश्यक ती चर्चा न करता आणलेले शेती सुधार कायदे रद्द करावेत, अशी त्यांची मागणी आहे. खाजगी क्षेत्रातही डरकाळ्या फोडणाऱ्या वाघांना मांजरे करून टाकले आहे.  जे ऐकत नाहीत त्यांच्यावर प्रवर्तन संचालनालय, आयकर, सीबीआय यांना सोडण्यात येत आहे. गुंतवणुकीतील गती मंदावणे हे भारतीय अर्थव्यवस्थेपुढील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास म्हणतात.  आर्थिक घसरण थांबेपर्यंत मोठे उद्योग टिकाव धरू शकतात; पण सर्वाधिक रोजगार पुरवणारे छोटे, मध्यम उद्योग डबघाईला आले असून, कसेबसे जगण्याची धडपड करीत आहेत. पायाभूत क्षेत्रात थोड्या आशादायी गोष्टी दिसतात. हमरस्ते तयार करण्याचे काम जोरात आहे. जन धन योजनेद्वारे डिजिटल पेमेंट च्या बाबतीत भारताने आघाडी घेतली आहे. लोकप्रिय योजना आणि पायाभूत क्षेत्रावर वाढता खर्च, कर तसेच निर्यातीत वाढ न होणे, यामुळे महसुली तूट वाढण्याची चिंता आहे. कोविड महामारी येऊनही सरकारचा आरोग्यावर होणारा खर्च जगात सर्वांत कमी आहे.- तात्पर्य इतकेच की, सरकारने प्रचार, प्रसिद्धी कितीही केली तरी सामान्य माणूस भरडला गेला आहे, हे कटू वास्तव होय. तुलसीदासाने रामराज्याचे वर्णन पुढील शब्दांत केले आहे. दैहिक दैविक भौतिक तापा। राम राज नहिं काहुहि ब्यापा।।-रामराज्यात आध्यात्मिक, भौतिक, शारीरिक कसल्याच यातना नाहीत. अर्थव्यवस्था  हा जर एक निकष  मानला, तर रामराज्यापासून आपण लाखो मैल दूर आहोत! म्हणून म्हणतो, राजाला सांगा, पोपट उपाशी आहे!