शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

दीदींविरुध्द मोदी ; संघर्ष टिपेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 23:50 IST

मिलिंद कुलकर्णीएएकीकडे संपूर्ण देशात कोरोनाचा प्रकोप वाढला असताना पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चरमसीमा गाठली आहे. आसाममध्ये मंगळवारी तिसऱ्या ...

मिलिंद कुलकर्णीएएकीकडे

संपूर्ण देशात कोरोनाचा प्रकोप वाढला असताना पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चरमसीमा गाठली आहे. आसाममध्ये मंगळवारी तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान होत असताना त्याच दिवशी तामिळनाडू, केरळ व पुद्दुचेरीमध्ये एका टप्प्यात सर्व जागांसाठी मतदान होत आहे. प.बंगालमध्ये आठपैकी तिसऱ्या टप्प्यातील ३१ जागांसाठी मतदान होत आहे. एकूण २९४ जागांपैकी आतापर्यंत ९१ जागांसाठी मतदान मंगळवारी आटोपेल. तरीही चर्चा आहे ती, केवळ बंगालचीच. ममता बॅनर्जीविरुध्द नरेंद्र मोदी अशी लढत दिसून येत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष केवळ या राज्याच्या निवडणुकीकडे लागलेले आहे. अर्थात त्याला कारणेदेखील अनेक आहेत, तरीही दीदी आणि मोदी या दोन वलयांकित नेत्यांभोवती सगळी निवडणूक केंद्रित झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये साम्यस्थळे आणि विरोधाभासदेखील मोठ्या प्रमाणात आहे. नरेंद्र मोदी हे संघटनात्मक कार्यातून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलेले नेते आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर विकासाचे मॉडेल जसे आहे तसा गोध्राचा डागदेखील आहे. २०१४ नंतर ते पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आले आणि २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभेच्या निवडणुका त्यांच्या नावावर भाजप जिंकला. प्रथमच भाजपने लोकसभेत बहुमत मिळविले. मोदींच्या करिष्म्यामुळे १६ राज्यांत भाजपची सत्ता आली. मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांमधील कौल स्वत:कडे वळविण्यासाठी घोडेबाजारदेखील झाला. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीतून भाजपचे निवडणूक तंत्र यशस्वी होताना दिसून आले. प्रत्येक राज्याची निवडणूक भाजप स्वतंत्र पध्दतीने लढवत असल्याचे दिसून आले. तेथील स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आणि समीकरण आखले जाते. प.बंगालमध्ये २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. परंतु, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल १८ जागा मिळाल्या. एकूण ४०.६ टक्के मतदान भाजपला झाले. त्यामुळे भाजपला या राज्यात संधी असल्याचे जाणवले. बिहार निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी गृहमंत्री अमित शहा हे बंगालमध्ये प्रचारयात्रेत सहभागी झाले होते. यावरून भाजपचे नियोजन दिसून येते.

लढाऊ नेत्याची प्रतिमाममता बॅनर्जी यांची प्रतिमा लढाऊ, संघर्षशील नेत्या अशी आहे. युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केलेल्या ममता बॅंनर्जी यांनी बंगालमधील डाव्या पक्षांच्या राजवटीविरुध्द कायम संघर्ष केला. मुख्यमंत्री कार्यालय असलेल्या रॉयटर्स बिल्डिंगमध्ये आंदोलनादरम्यान प्रवेश करताना त्यांना पोलिसांनी रोखले, तेथे संघर्ष झाला. त्यानंतर तेथे कधीही न जाण्याची प्रतिज्ञा केलेल्या ममतादीदी थेट मुख्यमंत्री म्हणून तेथे प्रवेश करताना दिसून आल्या. अर्थात दरम्यानच्या काळात त्यांनी कॉंग्रेसची साथ सोडली. तृणमूल कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. डाव्यांविरुध्द संघर्षाचा पवित्रा स्वीकारताना भाजपशी मैत्री केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समाविष्ट झाल्या. ज्या कॉंग्रेसला सोडले, त्यांच्यासोबत २०११ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडी केली. पुढे त्यांचे निम्मे आमदार फोडून आपला पक्ष मजबूत केला. सिंगूर व नंदीग्राम येथील भूसंपादन आंदोलनातून ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व सबल व सक्षम झाले. माँ, माती आणि माणूसचा नारा देत तृणमूल कॉंग्रेसने तब्बल १० वर्षे सत्ता राबवली. भुलते पारी शोबार नाम, भुलबो नाको नंदीग्राम (मी प्रत्येकाचे नाव विसरू शकते, पण नंदीग्रामला कधीच विसरू शकत नाही) असा नारा त्यांनी यावेळी दिला. केंद्र ते राज्य असा ममता बॅनर्जी यांचा प्रवास झाला. जनतेची नस ओळखण्यात दीदी आणि मोदी हे दोघे माहीर आहेत. ‘सोनार बांगला’ म्हणत बंगालमध्ये आलेल्या मोदी आणि भाजपला ‘परके’ ठरवत दीदींनी बंगाली अस्मितेला हात घातला आहे. रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, ईश्वरचंद्र विद्यासागर या महापुरुषांविषयी दोघेही बोलत आहेत. मुस्लिम मतांच्या तुष्टीकरणाचा आरोप होत असताना नंदीग्राममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जायबंदी पायासह व्हीलचेअरवर बसून दीदी राज्यभर प्रचार करीत आहेत. चंडीपाठ करणाऱ्या दीदी, स्वत:ला शांडिल्य गोत्री हिंदू ब्राह्मण म्हणवून घेणाऱ्या दीदी, नंदीग्राममध्ये एका मतदान केंद्रावर दीड तास ठिय्या मांडून बसलेल्या दीदी, राज्यपाल, निवडणूक आयोग, केंद्रीय तपास यंत्रणा या सगळ्यांवर हल्लाबोल करणाऱ्या दीदी असे वेगळे रूप या काळात दिसून आले. शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, हेमंत सोरेन, भाकपा (माले)चे महासचिव दीपांकर भट्टाचार्य या सगळ्या नेत्यांनी दीदींना पाठिंबा देऊ केला आहे. केरळमध्ये डाव्यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी प्रचाराचे रान उठविणारे काँग्रेस नेते राहुल गांधी बंगालमध्ये डाव्यांसोबत आघाडी करीत असताना अद्याप प्रचाराला गेलेले नाही. यातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसारखी स्थिती उद्भवल्यास भाजपला दूर ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता तयार होत आहे. एकंदरीत दोन्ही नेत्यांमधील संघर्ष केवळ बंगालपुरता न राहता तो देशव्यापी बनला आहे, हे मात्र निश्चित.(लेखक ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.) 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव