शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अन्नभेसळ रोखण्यासाठी फक्त फिरती प्रयोगशाळा नको; अधिकारी संख्या कधी वाढवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 15:03 IST

मुंबईकरांच्या हितासाठी प्रशासनाने अद्यावत तंत्रज्ञान असलेले वाहन आणले यासाठी त्यांचे कौतुकच करायला हवे, पण....

ठळक मुद्देमुंबईकरांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे म्हणून अन्न व औषध प्रशासनाने फिरती प्रयोगशाळा सुरू केली आहे.अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता ही सर्वच सरकारी कार्यालयांची समस्या आहे.

>> विनायक पात्रुडकर

कोणतीही कारवाई करायची असेल तर त्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज लागते. ही फौज निष्पक्ष असावी लागते, तरच तिच्याकडून पारदर्शक कारवाईची अपेक्षा केली जाऊ शकते. यातील दुसरी बाजू अशी की, लाखो जनतेसाठी तुटपुंजे अधिकारी काम करत असतील तर शिक्षेची तरतूद कितीही कठोर असली तरी कारवाई तुरळकच होणार हे निश्चित. कठोर कारवाईसाठी ताकदीचा कायदा व पुरेसे मनुष्यबळ आवश्यक असते. मुंबईकरांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे म्हणून अन्न व औषध प्रशासनाने फिरती प्रयोगशाळा सुरू केली आहे. हे वाहन मुंबईत गल्लोगल्लीत जाऊन अन्नाचे नमुने घेणार आहे. नमुन्यांचा तपासणी अहवाल अर्ध्या तासात मिळणार आहे. प्रशासनाच्या ज्या प्रयोगशाळा आहेत, तेथे नमुन्यांचा अहवाल सात दिवसांत मिळतो. नमुना अहवाल लगेच मिळत असल्याने भेसळयुक्त अन्न विकणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करता येईल, असा दावा प्रशासनाचे मंत्री व अधिकाऱ्यांनी केला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी प्रशासनाने अद्यावत तंत्रज्ञान असलेले वाहन आणले यासाठी त्यांचे कौतुकच करायला हवे. कौतुक करत असताना प्रशासनासाठी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या तपासायला हवी. 

मुंबईची लोकसंख्या सुमारे सव्वा कोटी आहे. या सव्वा कोटी जनतेला भेसळयुक्त अन्न व सौंदर्यप्रसाधने मिळू नये यासाठी ९२ निरीक्षक काम करत आहेत. मध्यतंरी अन्न व औषध निरीक्षक नोकरी भरती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यामुळे अद्ययावत तंत्र असूनही कारवाई प्रभावी होईल की नाही याची शाश्वती प्रशासनालाही देता येणार नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता ही सर्वच सरकारी कार्यालयांची समस्या आहे. आधीच ९ ते ५ या वेळेतच काम करण्याची सवय, त्यात मनुष्यबळ कमी, परिणामी सर्वसामान्यांची कामे वेळेत होतच नाही. त्यात कठोर कारवाईची अपेक्षा करणे योग्य नाही. मात्र सर्वसामन्यांशी थेट संबंध ठेवणाऱ्या विभाागाचे कामकाज तरी जलदगतीने होईल, अशी व्यवस्था करायला हवी. 

अन्न व औषध प्रशासनाने फिरत्या प्रयोगशाळेसोबतच मनुष्यबळ वाढवायला हवे. भेसळ करणाऱ्यांची दुकाने मुंबईत गल्लोगल्लीत आहेत. वारंवार कारवाई होऊनही ही दुकाने कायमची बंद होत नाहीत. अशी दुकाने कायमची बंद करण्यासाठी मनुष्यबळ तर लागणारच. दूधभेसळ रोखणे अशक्य आहे, अशी कबुली प्रशासनाने काही वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात दिली होती. दूधभेसळ रोखण्यासाठी टोल नाक्यांवर एक पथक तपासणीसाठी कार्यरत राहील, असेही प्रशासनाने न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. तरीही गेल्या दहा वर्षांत किमान दूधभेसळ तरी कमी झाली आहे, असे ठामपणे प्रशासन सांगू शकणार नाही. त्यामुळे काळानुसार बदलताना सर्व बाजूंचा विचार करायला हवा, तरच नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित अन्न मिळू शकेल, अन्यथा याआधीही यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि कालांतराने त्या उपाय योजना निष्क्रियही ठरल्या आहेत.

 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागMaharashtraमहाराष्ट्र