शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

मुलखावेगळी माणसे: युवराज माने : कुतूहल जपणारा गुरुजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 10:46 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खूप उपक्रमशील शिक्षक आहेत, पण युवराज माने यांची प्रयोगशीलता वेगळी आहे. मुलांप्रमाणे शाळेने बदलायला हवे किंवा काही लेकरे हीच शिक्षकांची गुरू बनतात किंवा लेकरांच्या बदलांचा स्रोत 'शिक्षक' असतो, ही माने यांची वचने...

दिनकर गांगल

शाळा म्हणजे आनंद, शाळा म्हणजे नवल, शाळा म्हणजे कुतूहल ! हे तत्त्वज्ञान आहे युवराज माने या शिक्षकाचे. ते गेली एकोणीस वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत - प्रथम गोंदिया जिल्ह्यात आणि आता परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील पारडी या बाराशे लोकवस्तीच्या गावात. गोंदियाच्या शाळेतील प्रसंग आहे. माने यांनी काही कारणाने शाळेत येणे बंद केले, तर गावकऱ्यांनी पाच दिवस शाळेवर बहिष्कार घातला! पारडी येथील केंद्र शाळेत तांड्यावरील एकशे पस्तीस मुले आहेत. माने यांच्याकडे गेली सहा वर्षे दरवर्षी पुढे जाणारा एकच वर्ग दिला आहे. त्यांच्या वर्गात बत्तीस मुले आहेत. माने अभिमानाने सांगतात, की त्या मुलांना आधुनिक शिक्षण संकल्पनेच्या कोणत्याही कसोटीला बसवा, ती उच्च दर्जाने पास होतील. कारण प्रत्येक मूल माझ्या वर्गात आले तेव्हा आनंदाची डहाळी होती; आता ते आनंदाचे झाड होऊन दरवर्षी अधिकाधिक बहरत आहे!

माने यांचा दावा फुकाचा नाही, त्यांनी अवलंबलेल्या उपक्रमांची संख्या चौतीस आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांचे नाते पर्यावरणाशी आहे आणि ती स्वतःचे मनः सामर्थ्य जाणतात. माने यांचे उपक्रम खूप वेगळे नाहीत, मुलांना सभोवतालाशी जोडून घेणे, त्यांच्यातील कुतूहल जागे करणे, वाचणे-लिहिणे-चितारणे-फिरणे असेच ते प्रयोग आहेत, पण त्यातील माने यांची मनःपूर्वकता महत्त्वाची. ते म्हणतात, "मी मला माझ्या बालपणात हवा असलेला गुरुजी स्वतःच होण्याचा प्रयत्न गेली सतरा वर्षे करत आहे. टॉलस्टॉय हा कुतूहल जपणारा गुरुजी म्हणून माझा आदर्श आहे."

महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांत खूप उपक्रमशील शिक्षक आहेत, पण युवराज माने यांची प्रयोगशीलता वेगळी जाणवते. तशी त्यांची वचने आहेत. उदाहरणार्थ- "लेकरांच्या प्रभावी व महत्त्वाच्या बदलांचा स्रोत 'शिक्षक' हा असतो." - "मुलांप्रमाणे शाळेने बदलायला हवे." -"काही लेकरे हीच शिक्षकांची गुरू बनतात." - "शिक्षकांना पुन्हा एकदा बालपणात जाण्याची संधी मिळते." युवराज माने स्वतः बहुविध वाचतात आणि मुलांना वाचण्यास प्रवृत्त करतात; माने लिहितात, त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते मुलांना लिहिण्यास लावतात आणि त्यांचे लेखन प्रसिद्ध करतात. माने कल्पक तर आहेतच. एकदा त्यांनी पाहिले की, गुलमोहराची आणि बाहवाची झाडे एकत्र बहरली-फुलली आहेत. तर ते म्हणाले, की हे तर निसर्गाचे हळदीकुंकू झाले ! त्यांचे एक पुस्तक आहे- 'गुरुजी, तू मला आवडला ।' ते वाक्य त्यांच्या विद्यार्थ्यांचे आहे. त्यांच्या त्या पुस्तकाची चित्रसजावट त्यांची पत्नी पूनम आणि मुले- तन्मय व प्रयास यांनी केली आहे. माने स्वतःच्या गुरुजी असण्यात इतके मग्न आहेत, की त्यांना तंत्रज्ञानाने समाजात येणारे मानसिक परिवर्तन बाधक वाटत नाही; उलट, ते मुलांबरोबर त्यातही नवनवीन प्रयोग करतात. 

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळा