शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोटीच्या कोटी उड्डाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:47 IST

एकीकडे जगभरात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील नोकºयांमध्ये कपात होत असताना, त्याच क्षेत्रातील राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या मुंबई आयआयटीयन्सला नोकºया देण्यासाठी रांगेत उभ्या आहेत, ही आपल्या देशासाठी अतिशय सकारात्मक बाब म्हणायला हवी.

एकीकडे जगभरात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील नोकºयांमध्ये कपात होत असताना, त्याच क्षेत्रातील राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या मुंबई आयआयटीयन्सला नोकºया देण्यासाठी रांगेत उभ्या आहेत, ही आपल्या देशासाठी अतिशय सकारात्मक बाब म्हणायला हवी. एकापाठोपाठ एक बंद पडणाºया खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमुळे या क्षेत्रात राम उरलेला नसल्याचे संस्थाचालक म्हणत आहेत. मात्र, दुसरीकडे आयआयटीयन्सला कोट्यवधी रुपये पगार देणाºया नोकºयांमुळे भारतीय गुणवत्तेला जगभर मागणी असल्याचे अधोरेखित होत आहे. भारतीय विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत मिळणाºया गलेलठ्ठ पगाराच्या नोकºयांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. दरवर्षी आयआयटीमध्ये भरणाºया नोकरी मेळ््या (प्लेसमेंट सीझन)मध्ये राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची रीघ दिसून येते. विशेष म्हणजे, दरवर्षी या कंपन्यांची संख्या वाढत आहे. मायक्रोसॉफ्ट, उबर, गोल्डमॅन सॅश, फेसबुक अशा नामांकित कंपन्यांकडून मिळणाºया आॅफरमुळे विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावल्याचेही शिक्कामोर्तब होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आयआयटीमधील प्रवेशासाठी बुद्धिमत्ता आणि गुणवत्तेच्या निकषांची चाचणीही तितकीच कठीण होत चालली आहे. त्यासाठी गेल्या वर्षीचेच उदाहरण पाहणे महत्त्वाचे ठरेल. गतवर्षी तब्बल सव्वाबारा लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा दिली. मात्र, त्यातील केवळ दीड लाख विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले. या एकूण विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्ष आयआयटीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ २६ हजार ४५६ इतकी होती. यावरूनच आयआयटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग किती खडतर आहे, हे लक्षात येऊ शकते. भारतीय शिक्षण पद्धतीवर चहुअंगाने चर्चा झडत असल्या तरी येथील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेबाबत जगभर आदर आहे. राष्ट्रीय कंपन्यांकडून मिळणाºया ४० ते ५० लाख रुपयांपासून बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मिळणाºया सव्वाकोटी रुपयांच्या नोकºया पाहता, भारतीय विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात येते. याआधीही फेसबुक, टिष्ट्वटर, गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांवर भारतीय वंशांच्या व्यक्तींनी उच्चपदे भूषवित ठसा उमटविला आहे. आयआयटीसारख्या संस्थेत दरवर्षी पदवी प्राप्त करण्यापूर्वीच हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या हाती नोकरी असते, हादेखील एक उच्चांक आहे. सुमारे २००हून अधिक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी तिष्ठत उभ्या असतात, हे चित्रही सुखावह असेच आहे.

टॅग्स :jobनोकरी