शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

कोटीच्या कोटी उड्डाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:47 IST

एकीकडे जगभरात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील नोकºयांमध्ये कपात होत असताना, त्याच क्षेत्रातील राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या मुंबई आयआयटीयन्सला नोकºया देण्यासाठी रांगेत उभ्या आहेत, ही आपल्या देशासाठी अतिशय सकारात्मक बाब म्हणायला हवी.

एकीकडे जगभरात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील नोकºयांमध्ये कपात होत असताना, त्याच क्षेत्रातील राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या मुंबई आयआयटीयन्सला नोकºया देण्यासाठी रांगेत उभ्या आहेत, ही आपल्या देशासाठी अतिशय सकारात्मक बाब म्हणायला हवी. एकापाठोपाठ एक बंद पडणाºया खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमुळे या क्षेत्रात राम उरलेला नसल्याचे संस्थाचालक म्हणत आहेत. मात्र, दुसरीकडे आयआयटीयन्सला कोट्यवधी रुपये पगार देणाºया नोकºयांमुळे भारतीय गुणवत्तेला जगभर मागणी असल्याचे अधोरेखित होत आहे. भारतीय विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत मिळणाºया गलेलठ्ठ पगाराच्या नोकºयांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. दरवर्षी आयआयटीमध्ये भरणाºया नोकरी मेळ््या (प्लेसमेंट सीझन)मध्ये राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची रीघ दिसून येते. विशेष म्हणजे, दरवर्षी या कंपन्यांची संख्या वाढत आहे. मायक्रोसॉफ्ट, उबर, गोल्डमॅन सॅश, फेसबुक अशा नामांकित कंपन्यांकडून मिळणाºया आॅफरमुळे विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावल्याचेही शिक्कामोर्तब होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आयआयटीमधील प्रवेशासाठी बुद्धिमत्ता आणि गुणवत्तेच्या निकषांची चाचणीही तितकीच कठीण होत चालली आहे. त्यासाठी गेल्या वर्षीचेच उदाहरण पाहणे महत्त्वाचे ठरेल. गतवर्षी तब्बल सव्वाबारा लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा दिली. मात्र, त्यातील केवळ दीड लाख विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले. या एकूण विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्ष आयआयटीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ २६ हजार ४५६ इतकी होती. यावरूनच आयआयटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग किती खडतर आहे, हे लक्षात येऊ शकते. भारतीय शिक्षण पद्धतीवर चहुअंगाने चर्चा झडत असल्या तरी येथील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेबाबत जगभर आदर आहे. राष्ट्रीय कंपन्यांकडून मिळणाºया ४० ते ५० लाख रुपयांपासून बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मिळणाºया सव्वाकोटी रुपयांच्या नोकºया पाहता, भारतीय विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात येते. याआधीही फेसबुक, टिष्ट्वटर, गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांवर भारतीय वंशांच्या व्यक्तींनी उच्चपदे भूषवित ठसा उमटविला आहे. आयआयटीसारख्या संस्थेत दरवर्षी पदवी प्राप्त करण्यापूर्वीच हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या हाती नोकरी असते, हादेखील एक उच्चांक आहे. सुमारे २००हून अधिक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी तिष्ठत उभ्या असतात, हे चित्रही सुखावह असेच आहे.

टॅग्स :jobनोकरी