शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विकासाचं ताट अन् पहिला घास !

By राजा माने | Published: August 14, 2018 12:20 AM

एक राजबिंडा राजकारणी, दिलदार मित्र आणि सर्व स्तरातील लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या विलासरावांनी ज्या-ज्या वेळी त्यांच्यासमोर विकासाचे ताट आले, त्या-त्या वेळी त्यांनी पहिला घास...

विलासराव देशमुख यांचे अकाली जाणे उभ्या महाराष्टÑाला चटका लावून गेले. राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाला दिलदार मनाची जोड लाभणे, हे भाग्याचे मानले जाते. त्या अर्थाने ते किती भाग्यवान होते, याचा अनुभव त्यांचा सहवास लाभलेल्या आणि न लाभलेल्या देखील व्यक्तींना यायचा. १९७० च्या दशकात उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील विलास देशमुख बाभळगावकर हा तरुण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून धडपड करायचा. त्या धडपडीला पदाची जोड देण्याचे काम त्यावेळचे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष उल्हास पवार करतात आणि तो तरुण उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष बनतो ! त्या काळातही पुण्यातील शिक्षण व वास्तव्याने संस्कारित झालेले नव्या जमान्याची भाषा बोलू लागतो. ग्रामपंचायतीतून फक्त भाषाच नाही तर बदलत्या काळाची दिशा घेऊनच बाभळगावात काम करतो. बाभळगाव ते मुंबई आणि मुंबई ते राजधानी दिल्ली असा ऐतिहासिक प्रवास करणारा विलास देशमुख बाभळगावकर या तरुणाने संपूर्ण राज्यातील सामान्य माणसांच्या हृदयात ‘विलासराव देशमुख’ हे नाव कोरले !आज विलासरावजींच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या स्मृती जागवताना या इतिहासाची आठवण अनेकांना झाल्याशिवाय राहत नाही. उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या ऐतिहासिक कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला. केवळ जिल्हा निर्मितीनंतरच्या इमारती उभ्या करून समाधान मानणे हा त्यांचा पिंड नव्हताच! त्यामुळे विकासाचे प्रत्येक दालन खुले करताना त्यांनी लातूरच्या बाबतीत ‘जे नवे ते लातूरकरांना हवे’ हा मंत्र सदैव कृतीने जतन केला. तो करताना मिळालेल्या प्रत्येक पदाचा उपयोग त्यांनी लातूर जिल्ह्यासाठी काही तरी नवे देण्यासाठी केला. स्व. शंकरराव चव्हाण यांचे राजकारणातील मानसपुत्र म्हणून केवळ ते वावरलेच नाहीत तर स्व. शंकररावजींच्या कार्यपद्धतीचा अमल देखील त्यांनी पदोपदी केला.मराठवाड्याला वरदायिनी ठरलेल्या जगातील पहिले मातीचे धरण बांधण्याचा इतिहास स्व. शंकररावजींनी त्यांच्या नावावर नोंदला. अशा गुरूचे बोट धरून राजकारण केलेल्या विलासरावांनी तोच कित्ता गिरविला. बालाघाटच्या माळरानावर मांजरा सहकारी साखर कारखान्यासारख्या प्रकल्पाची उभारणी करून त्यांनी मराठवाड्यातील शेतकºयांच्या जीवनाला नवी दिशा दिली. त्याच दिशेने शिक्षण असो वा कला, प्रत्येक क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले.महाराष्टÑाच्या राजकारणात सर्व स्तरातील लोकसंपर्क आणि लोकप्रियता संपादन केलेल्या विलासरावांनी राज्याच्या उद्योग क्षेत्रापासून सिंचन क्षेत्रापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात नवा दृष्टिकोन निर्माण केला. त्याच कारणाने सिंचन क्षेत्रात फलदायी ठरलेला बॅरेजेस प्रकल्प आज त्यांच्याच नावाने ओळखला जातो. राजकारणातील अनेक वादळे अंगावर घेताना त्यांना १९९५ साली विधानसभा निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले. तरीही तो पराभवही त्यांनी राजकारणातील ‘एक अपघात’ म्हणून खिलाडूवृत्तीने स्वीकारला. लातूरकरांनीही पुन्हा विक्रमी मतांनी त्यांना विधानसभेत धाडले आणि ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री असो वा केंद्रीय मंत्री पद कुठलेही असेल ‘ज्या-ज्या वेळी विकासाचे ताट समोर आले, त्या-त्या वेळी त्यातील पहिला घास त्यांनी कधी लातूरसाठी, कधी मराठवाड्यासाठी तर बºयाच वेळा राज्यासाठी बाजूला काढून ठेवला...  

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र