शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

स्मृती आणि प्रज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:02 IST

मानवाला अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त आहेत. मुख्यत्वे आपण या शक्तींची तीन प्रकारामध्ये विभागणी करू शकतो- शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. शरीरासंबंधी सगळ्या शक्ती मानवाची भौतिक प्रगती करतात. मानसिक शक्ती ही मानवाला भौतिक प्रगतीबरोबरच तीव्र वैचारिक आणि विवेकशील बनविते. आध्यात्मिक शक्ती अशी शक्ती आहे की जी मानवाला अंतर्मुख करून त्याच्या चेतनेमध्ये परमानंदाचा अनुभव करून देते.

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (भा.पो.से.)मानवाला अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त आहेत. मुख्यत्वे आपण या शक्तींची तीन प्रकारामध्ये विभागणी करू शकतो- शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. शरीरासंबंधी सगळ्या शक्ती मानवाची भौतिक प्रगती करतात. मानसिक शक्ती ही मानवाला भौतिक प्रगतीबरोबरच तीव्र वैचारिक आणि विवेकशील बनविते. आध्यात्मिक शक्ती अशी शक्ती आहे की जी मानवाला अंतर्मुख करून त्याच्या चेतनेमध्ये परमानंदाचा अनुभव करून देते.भारतीय विचारवंताच्या मते शारीरिक आणि मानसिक शक्तीच्या मागे जे साधन काम करते, ती आहे स्मृती. ज्या सूचना बाहेरून येतात, त्या सूचना आपल्या मेंदूमध्ये साठून राहतात. या साठलेल्या सूचनांना आपण स्मृती हे नाव दिले आहे. आपल्या शरीर व मनाला या स्मृती संचालित करतात. या स्मृती बाहेरच्या जगातून आलेल्या असल्याने सीमित आणि क्षणिक असतात कारण त्यांचे उत्पत्ती स्थान ‘बाहेरील जग’ हेदेखील सीमित आणि क्षणभंगुर आहे. शेवटी या स्मृतींपासून निर्माण झालेले ज्ञानसुद्धा नेहमी बदलत जाते. जगामध्ये जेवढे विषय आहेत, ते सतत बदलत असतात. आजचा विषय उद्या पूर्णपणे बदलला जातो. प्रत्येक क्षणाला बदलत जाणाऱ्या या जगाकरिता बदलत जाणारे विषय असणे देखील आवश्यक आहे. अन्यथा या जगाचे कालक्र मण चालणे कठीण होईल.या स्मृतींच्या पलीकडेदेखील मानवामध्ये ज्ञान प्राप्त करण्याची जी शक्ती आहे, ती प्रज्ञेपासून निर्माण होते. प्रज्ञेपासून निर्माण झालेले ज्ञान कधीही बदलत नाही आणि या प्रकारच्या ज्ञानाला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रमाणाची आवश्यकता राहत नाही. अशा प्रकारचे ज्ञान स्वयंसिद्ध असते. ऋ षी आणि अनेक महान वैज्ञानिकांनी विविध प्रकारच्या प्रज्ञाजन्य ज्ञानाला अविष्कृत केले आहे. श्रीमद्भगवतगीता, कुराण, बायबल, धम्मपद, कल्पसूत्र इत्यादी ग्रंथ हे प्रज्ञाजन्य ज्ञानाची उदाहरणे आहेत. अनेक महान वैज्ञानिकांनी जे मोठ-मोठे शोध लावले, ते कोणत्याही प्रयोगशाळेमध्ये लावले नाहीत. परंतु अचानक त्यांच्या मेंदूमध्ये ती बाब विजेसारखी प्रकटली आणि एका सार्वभौम सिद्धांताचा जन्म झाला. गतीचा सिद्धांत, सापेक्षवादाचा सिद्धांत, आकर्षणाचा सिद्धांत इत्यादी प्रज्ञाजन्य सिद्धांत ही त्याची उदाहरणे आहेत.प्रज्ञाजन्य ज्ञान हे मनाच्या खोलवरच्या एकाग्रतेतून निर्माण होते. अत्यंत खोलवर एकाग्र मनाची द्वंद्वावस्था पूर्णपणे समाप्त होते आणि निर्मळ जलाप्रमाणे सर्व स्वच्छ दिसू लागते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या