शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:32 IST

पक्षापेक्षा स्वत: मोठे होण्याची महत्त्वाकांक्षा आणि उच्चकोटीचा अहंकार, नागपुरातील काँग्रेस नेत्यांमधील या गुणांमुळे एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या नागपुरात आता पक्ष अखेरच्या घटका मोजतो आहे. काँग्रेसच्या हातून महापालिका हिसकत भाजपाने हॅट्ट्रिक मारली.

पक्षापेक्षा स्वत: मोठे होण्याची महत्त्वाकांक्षा आणि उच्चकोटीचा अहंकार, नागपुरातील काँग्रेस नेत्यांमधील या गुणांमुळे एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या नागपुरात आता पक्ष अखेरच्या घटका मोजतो आहे. काँग्रेसच्या हातून महापालिका हिसकत भाजपाने हॅट्ट्रिक मारली. पाठोपाठ लोकसभा अन् विधानसभेच्या सहाही जागा जिंकत काँग्रेसमुक्त नागपूरचे अभियान पूर्ण केले. ठेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही, असे म्हणतात. पण नागपुरात ही म्हणही लागू पडत नाही. येथील काँग्रेस नेत्यांना एकामागून एक ठेचा लागत गेल्या. ठेच लागण्याचा दु:खद अनुभव पदरी असतानाही ते दुस-यांच्या मार्गात दगड कसे रचता येतील यातच गुंग झाले आहेत. नागपुरात गेल्या काही वर्षांपासून भाजपा पहिल्या क्रमांकावर अबाधित आहे. दुस-या क्रमांकासाठी मात्र मुत्तेमवार काँग्रेस व चतुर्वेदी काँग्रेसमध्ये लढत सुरू असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या निवडणुकीत चतुर्वेदी गटाला तिकिटा मिळू नये म्हणून मुत्तेमवार गटाने ताकद पणाला लावली. मतभेद टोकाला गेले. प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकण्यापर्यंत काळा दिवस पाहण्याची वेळ आली. तेव्हा त्या काळात काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन गावोगाव फिरणा-या निष्ठावंतांच्या मनावर काय परिणाम झाला असेल, याचा विचार करायलाही कुणाला वेळ नाही. याला अडवा, त्याला जिरवा, असा एककलमी कार्यक्रम काँग्रेस नेत्यांनी आखला आहे. निवडणुकीनंतर मुत्तेमवार गटाने आग्रह धरल्याने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले. आता सर्व काही शांत होईल, गटबाजी संपेल असे हायकमांडला अपेक्षित होते. मात्र, झाले उलटेच. चतुर्वेदी समर्थक पुन्हा एकजूट होऊन समोर आले अन् कारवाईच चुकीची असल्याचा आलाप घेत दिल्लीत पोहचले. त्यांच्या पाठोपाठ मुत्तेमवार गटही चतुर्वेदींवरील कारवाई कशी योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी दिल्लीत पोहचला. त्यांनीही कौशल्य पणाला लावले. मागील दोन दिवस दोन्ही शिष्टमंडळं दिल्ली दरबारी एका नेत्याकडून दुस-या नेत्याकडे फिरत होती. गल्लीत गोंधळ घातल्यानंतर काँग्रेसनेते दिल्लीत हायकमांडसमोर मुजरा घालत होते. एकमेकांवर दोषारोप करीत होते. तर दुसरीकडे त्यांच्या या कृतीतून आधीच उतरती कळा लागलेली काँग्रेस आणखी कमकुवत होत होती. दोन्ही गट एकमेकांवर भाजपाचे हस्तक असल्याचा उघड आरोपही करीत होते. मात्र, कुणीही आजपासूनच भाजपाच्या विरोधात रान पेटवितो, असे म्हणत पक्षाची बीजं नव्याने पेरण्याचे आव्हान स्वीकारत नव्हते. ज्याची खरी आज गरज होती. नेत्यांच्या भांडणात काँग्रेसचे पीठ होतयं अन् त्या पीठाच्या भाकरी शेकण्याची आयती संधी भाजपाला मिळतेय. यावर काँग्रेस जनांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर