शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:32 IST

पक्षापेक्षा स्वत: मोठे होण्याची महत्त्वाकांक्षा आणि उच्चकोटीचा अहंकार, नागपुरातील काँग्रेस नेत्यांमधील या गुणांमुळे एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या नागपुरात आता पक्ष अखेरच्या घटका मोजतो आहे. काँग्रेसच्या हातून महापालिका हिसकत भाजपाने हॅट्ट्रिक मारली.

पक्षापेक्षा स्वत: मोठे होण्याची महत्त्वाकांक्षा आणि उच्चकोटीचा अहंकार, नागपुरातील काँग्रेस नेत्यांमधील या गुणांमुळे एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या नागपुरात आता पक्ष अखेरच्या घटका मोजतो आहे. काँग्रेसच्या हातून महापालिका हिसकत भाजपाने हॅट्ट्रिक मारली. पाठोपाठ लोकसभा अन् विधानसभेच्या सहाही जागा जिंकत काँग्रेसमुक्त नागपूरचे अभियान पूर्ण केले. ठेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही, असे म्हणतात. पण नागपुरात ही म्हणही लागू पडत नाही. येथील काँग्रेस नेत्यांना एकामागून एक ठेचा लागत गेल्या. ठेच लागण्याचा दु:खद अनुभव पदरी असतानाही ते दुस-यांच्या मार्गात दगड कसे रचता येतील यातच गुंग झाले आहेत. नागपुरात गेल्या काही वर्षांपासून भाजपा पहिल्या क्रमांकावर अबाधित आहे. दुस-या क्रमांकासाठी मात्र मुत्तेमवार काँग्रेस व चतुर्वेदी काँग्रेसमध्ये लढत सुरू असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या निवडणुकीत चतुर्वेदी गटाला तिकिटा मिळू नये म्हणून मुत्तेमवार गटाने ताकद पणाला लावली. मतभेद टोकाला गेले. प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकण्यापर्यंत काळा दिवस पाहण्याची वेळ आली. तेव्हा त्या काळात काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन गावोगाव फिरणा-या निष्ठावंतांच्या मनावर काय परिणाम झाला असेल, याचा विचार करायलाही कुणाला वेळ नाही. याला अडवा, त्याला जिरवा, असा एककलमी कार्यक्रम काँग्रेस नेत्यांनी आखला आहे. निवडणुकीनंतर मुत्तेमवार गटाने आग्रह धरल्याने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले. आता सर्व काही शांत होईल, गटबाजी संपेल असे हायकमांडला अपेक्षित होते. मात्र, झाले उलटेच. चतुर्वेदी समर्थक पुन्हा एकजूट होऊन समोर आले अन् कारवाईच चुकीची असल्याचा आलाप घेत दिल्लीत पोहचले. त्यांच्या पाठोपाठ मुत्तेमवार गटही चतुर्वेदींवरील कारवाई कशी योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी दिल्लीत पोहचला. त्यांनीही कौशल्य पणाला लावले. मागील दोन दिवस दोन्ही शिष्टमंडळं दिल्ली दरबारी एका नेत्याकडून दुस-या नेत्याकडे फिरत होती. गल्लीत गोंधळ घातल्यानंतर काँग्रेसनेते दिल्लीत हायकमांडसमोर मुजरा घालत होते. एकमेकांवर दोषारोप करीत होते. तर दुसरीकडे त्यांच्या या कृतीतून आधीच उतरती कळा लागलेली काँग्रेस आणखी कमकुवत होत होती. दोन्ही गट एकमेकांवर भाजपाचे हस्तक असल्याचा उघड आरोपही करीत होते. मात्र, कुणीही आजपासूनच भाजपाच्या विरोधात रान पेटवितो, असे म्हणत पक्षाची बीजं नव्याने पेरण्याचे आव्हान स्वीकारत नव्हते. ज्याची खरी आज गरज होती. नेत्यांच्या भांडणात काँग्रेसचे पीठ होतयं अन् त्या पीठाच्या भाकरी शेकण्याची आयती संधी भाजपाला मिळतेय. यावर काँग्रेस जनांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर