शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

लग्न झाले, पण हनिमूनचा पत्ता नाही

By admin | Updated: January 26, 2015 03:38 IST

भाजपाच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी होऊन दीड महिना उलटला, तरी दोघांमध्ये अजून सुसंवाद दिसत नाही. एकतर शिवसेनेला दुय्यम खाती मिळालेली आहेत

 यदु जोशी - 

भाजपाच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी होऊन दीड महिना उलटला, तरी दोघांमध्ये अजून सुसंवाद दिसत नाही. एकतर शिवसेनेला दुय्यम खाती मिळालेली आहेत आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये शिवसेनेला भाजपा सहभागी करून घेत असल्याचे दिसत नाही. शिवसेनेशिवाय सरकारमध्ये भाजपाचे फारसे काही अडतदेखील नाही. याउलट शिवसेनेकडे असलेल्या खात्यांचे निर्णय मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या संमतीसाठी जातीलच. त्यामुळे शिवसेनेचा सत्तागाडा भाजपाच्या संमतीशिवाय चालणार नाही, हे स्पष्ट आहे. सरकारमध्ये भाजपाकडून शिवसेनेची कोंडी सहज केली जाऊ शकते. शिवसेनेला तशी फार संधी नाही. भाजपा आणि शिवसेनेचे आमदार, नेते विरोधी पक्षात असताना जेवढे एकमेकांना विचारत, चर्चा करत आणि रणनीती ठरवत त्याच्या दहा टक्केही सध्या होताना दिसत नाही. सरकारमध्ये आलेल्या शिवसेनेचे भाजपाबरोबर लग्न तर झाले पण हनिमूनचा पत्ता नाही, अशी स्थिती आहे. नवदांपत्य राहायला आलेल्या घरातून भांडे फेकण्याचा आवाज येणे अपेक्षित नसते. ‘भाजपा-शिवसेनेचे सरकार’ असा उल्लेख करण्याऐवजी भाजपाचे बहुतेक मंत्री ‘भाजपाचे सरकार’ असा उल्लेख करतात, तेव्हा भाजपाला मित्राचा किती ‘उमाळा’ आहे, हे दिसून येते. ‘बाळासाहेबांचे स्वप्न साकार, आले युतीचे सरकार’, असे होर्डिंग्ज शिवसेनेने शपथविधीच्या वेळी लावले होते, पण प्रत्यक्षात त्यांना तसा अनुभव येताना दिसत नाही. शिवसेनेचे मंत्री खासगीत या बाबत खंतही व्यक्त करीत असतात. कल्याण महापालिकेत नवीन आयुक्त देताना स्थानिक पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना साधी विचारणाही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेले शिंदे पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला निघाले होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नवीन उद्योगांना परवानगी देताना पर्यावरण मंजुरी शिथिल करण्याचे केंद्राचे धोरण राज्यात राबविण्याला विरोध करणारे खरमरीत पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले. मुंबई शहरात एलईडी दिवे बसविण्याच्या भाजपाच्या हट्टावरून सध्या भाजपा-शिवसेनेत खटके उडत आहेत. मरीन लाइन्सचा क्वीन्स नेकलेस आता सोनेरी दिवे जाऊन आलेल्या नव्या पांढऱ्या एलईडी दिव्यांमुळे रुपेरी बनला आहे. हळूहळू सगळे शहर तसेच होणार आहे. शिवसेनेच्या नाकावर टिच्चून भाजपाने केंद्राच्या आदेशाप्रमाणे हे रुपेरीकरण सुरू केले आहे. एलईडीमुळे विजेची ४० टक्के बचत होते, हे शिवसेनेलाही समजत असणारच; पण प्रश्न बचतीचा नाही. मुंबईबाबत होणारे निर्णय कोण घेणार याबाबतच्या वर्चस्वाचा आहे. शिवाय, हे दिवे लावण्यासाठीचे निर्णय दिल्लीत झाल्याने खाली काहीही झिरपलेले नाही हा मुद्दाही असू शकतो.दोघे एकत्र बसून १०० दिवसही झालेले नसताना तू-तू-मैं-मैं सुरू झाले आहे. आर्थिक बाबींचा समावेश असलेले मोठे धोरणात्मक निर्णय घेताना, महामंडळांवरील तसेच विविध समित्यांवरील नियुक्त्या करताना भविष्यात आणखी खटके उडू शकतात. हे सरकार स्थिर राहू नये याची काळजी घेण्याची ‘क्षमता’ असलेले नेते दोन्हींकडे आहेत. ‘सत्तेत सहभागी झालो म्हणजे आम्ही शेपूट घातलेले नाही’, हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विधान किंवा ‘सरकारमध्ये राहून टीका करण्यापेक्षा शिवसेनेने सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा’ हे महसूलमंत्री एकनाथ खडसेंचे वक्तव्य याच क्षमतेची ग्वाही देत असतात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमधील थंड हवा खाऊन परतत आहेत आणि इकडे युतीला मतभेदांचे चटके बसत आहेत. मुख्यमंत्री परतताना गुंतवणुकीची झोळी भरून आणतील कदाचित; पण युती म्हणून सरकारचा गाडा नीट चालावा यासाठी परस्पर विश्वासाची गुंतवणूक ते जितक्या लवकर करतील तितके ते राज्याच्या हिताचे असेल.