शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
4
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
5
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
6
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
7
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
8
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
9
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
12
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
13
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
14
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
15
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
16
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
17
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
18
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
19
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
20
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!

लग्न झाले, पण हनिमूनचा पत्ता नाही

By admin | Updated: January 26, 2015 03:38 IST

भाजपाच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी होऊन दीड महिना उलटला, तरी दोघांमध्ये अजून सुसंवाद दिसत नाही. एकतर शिवसेनेला दुय्यम खाती मिळालेली आहेत

 यदु जोशी - 

भाजपाच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी होऊन दीड महिना उलटला, तरी दोघांमध्ये अजून सुसंवाद दिसत नाही. एकतर शिवसेनेला दुय्यम खाती मिळालेली आहेत आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये शिवसेनेला भाजपा सहभागी करून घेत असल्याचे दिसत नाही. शिवसेनेशिवाय सरकारमध्ये भाजपाचे फारसे काही अडतदेखील नाही. याउलट शिवसेनेकडे असलेल्या खात्यांचे निर्णय मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या संमतीसाठी जातीलच. त्यामुळे शिवसेनेचा सत्तागाडा भाजपाच्या संमतीशिवाय चालणार नाही, हे स्पष्ट आहे. सरकारमध्ये भाजपाकडून शिवसेनेची कोंडी सहज केली जाऊ शकते. शिवसेनेला तशी फार संधी नाही. भाजपा आणि शिवसेनेचे आमदार, नेते विरोधी पक्षात असताना जेवढे एकमेकांना विचारत, चर्चा करत आणि रणनीती ठरवत त्याच्या दहा टक्केही सध्या होताना दिसत नाही. सरकारमध्ये आलेल्या शिवसेनेचे भाजपाबरोबर लग्न तर झाले पण हनिमूनचा पत्ता नाही, अशी स्थिती आहे. नवदांपत्य राहायला आलेल्या घरातून भांडे फेकण्याचा आवाज येणे अपेक्षित नसते. ‘भाजपा-शिवसेनेचे सरकार’ असा उल्लेख करण्याऐवजी भाजपाचे बहुतेक मंत्री ‘भाजपाचे सरकार’ असा उल्लेख करतात, तेव्हा भाजपाला मित्राचा किती ‘उमाळा’ आहे, हे दिसून येते. ‘बाळासाहेबांचे स्वप्न साकार, आले युतीचे सरकार’, असे होर्डिंग्ज शिवसेनेने शपथविधीच्या वेळी लावले होते, पण प्रत्यक्षात त्यांना तसा अनुभव येताना दिसत नाही. शिवसेनेचे मंत्री खासगीत या बाबत खंतही व्यक्त करीत असतात. कल्याण महापालिकेत नवीन आयुक्त देताना स्थानिक पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना साधी विचारणाही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेले शिंदे पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला निघाले होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नवीन उद्योगांना परवानगी देताना पर्यावरण मंजुरी शिथिल करण्याचे केंद्राचे धोरण राज्यात राबविण्याला विरोध करणारे खरमरीत पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले. मुंबई शहरात एलईडी दिवे बसविण्याच्या भाजपाच्या हट्टावरून सध्या भाजपा-शिवसेनेत खटके उडत आहेत. मरीन लाइन्सचा क्वीन्स नेकलेस आता सोनेरी दिवे जाऊन आलेल्या नव्या पांढऱ्या एलईडी दिव्यांमुळे रुपेरी बनला आहे. हळूहळू सगळे शहर तसेच होणार आहे. शिवसेनेच्या नाकावर टिच्चून भाजपाने केंद्राच्या आदेशाप्रमाणे हे रुपेरीकरण सुरू केले आहे. एलईडीमुळे विजेची ४० टक्के बचत होते, हे शिवसेनेलाही समजत असणारच; पण प्रश्न बचतीचा नाही. मुंबईबाबत होणारे निर्णय कोण घेणार याबाबतच्या वर्चस्वाचा आहे. शिवाय, हे दिवे लावण्यासाठीचे निर्णय दिल्लीत झाल्याने खाली काहीही झिरपलेले नाही हा मुद्दाही असू शकतो.दोघे एकत्र बसून १०० दिवसही झालेले नसताना तू-तू-मैं-मैं सुरू झाले आहे. आर्थिक बाबींचा समावेश असलेले मोठे धोरणात्मक निर्णय घेताना, महामंडळांवरील तसेच विविध समित्यांवरील नियुक्त्या करताना भविष्यात आणखी खटके उडू शकतात. हे सरकार स्थिर राहू नये याची काळजी घेण्याची ‘क्षमता’ असलेले नेते दोन्हींकडे आहेत. ‘सत्तेत सहभागी झालो म्हणजे आम्ही शेपूट घातलेले नाही’, हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विधान किंवा ‘सरकारमध्ये राहून टीका करण्यापेक्षा शिवसेनेने सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा’ हे महसूलमंत्री एकनाथ खडसेंचे वक्तव्य याच क्षमतेची ग्वाही देत असतात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमधील थंड हवा खाऊन परतत आहेत आणि इकडे युतीला मतभेदांचे चटके बसत आहेत. मुख्यमंत्री परतताना गुंतवणुकीची झोळी भरून आणतील कदाचित; पण युती म्हणून सरकारचा गाडा नीट चालावा यासाठी परस्पर विश्वासाची गुंतवणूक ते जितक्या लवकर करतील तितके ते राज्याच्या हिताचे असेल.