शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ओढवून घेतलेले मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 13:11 IST

मृत्यू, मग तो कुणाचाही असो, ती वाईट घटनाच असते.  अपघाती किंवा अचानक झालेल्या मृत्यूच्या अपघातानंतर त्यांच्या नातेवाईकांवर प्रचंड संकट ...

मृत्यू, मग तो कुणाचाही असो, ती वाईट घटनाच असते. अपघाती किंवा अचानक झालेल्या मृत्यूच्या अपघातानंतर त्यांच्या नातेवाईकांवर प्रचंड संकट कोसळलेले आपण नेहमी पाहतोच. मुंबई किंवा बड्या महानगरांमध्ये हे आता नित्याचे झाले आहे, तरीही मृत्यूची संवेदना हेलावून टाकते हे नक्कीच. आपल्याकडे मैला वाहून नेणारी पद्धत अमानवी म्हणून बंद करण्यात आली. ते योग्यच झाले. मात्र वाढत्या शहरांचे वाढते ड्रेनेज, त्यासाठी सातत्याने होणारी दुरूस्ती याकरिता माणसे लागतातच. अशा मॅनहोलमध्ये काम करताना परवा डोंबिवलीत तीनजणांचा गुदमरून मृत्यू झाला. यातील एकजण गुदमरत असताना, इतर दोघेजण त्याला वाचवण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरले आणि तिघेही मृत्यूच्या दाढेत ओढले गेले. या तिघांकडे मास्क आणि सेफ्टी बेल्ट नव्हता, अशी प्राथमिक माहिती आहे. याचा अर्थ आज आपण कोट्यवधी रूपयांचे अर्थसंकल्प आखतो. हजारो कोटी रूपये स्वच्छतेसाठी बाजूला काढून ठेवतो. मात्र, आजही सफाईसाठी आपल्याकडे अद्यावत तंत्रज्ञान आलेले नाही. ब्रिटीशांनी नियोजन केलेली कार्यपद्धती अजूनही आपण सोडलेली नाही. नगरसेवक, आमदार, मंत्री व प्रशासकीय अधिकारी परदेशी दौरा करतात, कशासाठी तर परदेशात कशाप्रकारे शहरे स्वच्छ ठेवली जातात हे बघण्यासाठी. या दौऱ्यांवरही कोट्यवधी रूपये खर्च होतात. असे शेकडो दौरे झाले असतील. या दौऱ्यातून काय निष्पन्न होते हे दौऱ्यावर गेलेले नेते व अधिकारीच सांगू शकतील. पण मृत्यूच्या खाईत ओढणारी कार्यपद्धती तरी किमान आपण बदलायला हवी. कारण डोंबिवलीत घडलेली घटना मुंबई, ठाणे, नवी मुंबई व अन्य प्रगतशील शहरात घडतच असते. प्रत्येक शहरात सांडपाणी वाहून नेणारी मार्गिका आहे व त्याची सफाई करावीच लागते. ही सफाईची कामे रात्रीच्या वेळेतही होतात. रात्रीच्या वेळेत काम करणारे बाल कामगारही असतात. गरीब कुटुंबातील मुले हे काम करायला तयार होतात. कारण पैसा ही त्यांची गरज असते. लहान असल्याने ही मुले सहज मॅनहोलमध्ये उतरू शकतात. या समस्याकडे प्रशासन सर्रास काणाडोळा करते. याचा परिणाम भविष्यात मोठी घटना घडू शकते. यातील दुसरी बाजू म्हणजे या कामगारांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष केले जातात. मुळात हे कामगार कंत्राटी असतात. ते रोजंदारीवर काम करत असतात. मद्यपान केल्याशिवाय मॅनहोलमध्ये उतरणे शक्यच नाही. त्यामुळे हे कामगार नशेच्या आहारी गेलेले असतात. नशेमुळे त्यांचे आरोग्य व त्यांचे कुटुंब दोन्ही उद्धवस्त होत असते. तरीही गरज म्हणून प्रशासन त्यांचा वापर करते. या कामगारांप्रमाणेच मानवी विष्ठा वाहून नेणाºया कामगारांची समस्या होती. मानवी विष्ठा वाहून नेणे कसे बेकायदा आहे हे पटवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावावे लागले. अखेर न्यायालयाने कान उपटल्यानंतर ही प्रथाच बंद करण्यात आली. मेनहोलमध्ये मृत्यू होणाऱ्या कामगारांचे प्रमाण शेकडोंच्या घरात असेल. पण अजूनही प्रशासनाला जाग आलेली नाही अथवा ते झोपेचे सोंग करत आहे. किंवा न्यायालयाचे दार ठोठावल्याशिवाय या पद्धतीवर तोडगा निघणार नाही. डोंबिवलीची घटना देशातील प्रत्येक शहराला धोक्याची घंटा आहे. मुंबईतही मेनहोलमध्ये उतरून सफाईचे काम चालते. ही प्रथा आता बदलायलाच हवी. कारण गुदमरून होणारे हे मरण प्रशासनाने अगदी स्वस्त करून ठेवले आहे.

टॅग्स :Accidentअपघात