शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मनाचिये गुंथी - भावविश्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 00:18 IST

तुमचं अनुभवविश्व जेवढं जसं असतं तसंच तेवढंच तुम्ही लिहिता. तुमचा आवाका एवढाच आहे. म्हणजे हा विचार एकीकडे तुमचं भावविश्व अधोरेखित

 तुमचं अनुभवविश्व जेवढं जसं असतं तसंच तेवढंच तुम्ही लिहिता. तुमचा आवाका एवढाच आहे. म्हणजे हा विचार एकीकडे तुमचं भावविश्व अधोरेखित करतो आणि दुसरीकडे त्याच्या मर्यादाही! म्हणजे तुम्ही तुमचं एक विश्व बनवता. ते दुसऱ्याच्या दृष्टीने तोकडंही असतं पण ते तुमचं असतं. स्वत:चं असतं. विश्वाचा आकार केवढा! ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. माझं डोकं जेवढं मोठं तेवढा माझा आकार मोठा.पण हा आकार ठरवला कुणी? तर आपणच! एखादा माणूस फोटो काढतो, चित्र काढतो, रंग भरतो, कविता लिहितो, खेळतो. मला आठवतंय इंग्लंडचा एक क्रिकेटर. त्याच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ग्राउंडवर झालं होतं. असं सगळं काही करणारा हा माणूस सर्वश्रेष्ठ की एकाच जागी बसून एखाद्या विषयात संशोधन करणारा विचारवंत, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ श्रेष्ठ? हा ज्याचा त्याचा विचार आहे. आयुष्यभर सात्त्विक, शुचिर्भूत आचरण असणाऱ्याचा मित्र अट्टल दारुडा, भामटा असू शकतो का? आयुष्यभर एकाच साच्यात काम करीत राहणारी माणसं असत. ते सकाळी मंगल प्रभातने उठतात. चहापाणी आटोपतात. पेपर वाचतात. घरात कुणी असेल तर तावातावाने चर्चा करतात. मग, स्नान करून बायकोने दिलेला डबा घेऊन घरून निघतात. आॅफिसला जातात. काम करतात. दुपारी जेवणाच्या सुटीत डबा खातात. पुन्हा काम करतात. चहा पितात. नंतर संध्याकाळी घामेजल्या चेहऱ्याने घरी येतात. चहा घेऊन बाहेर जातात. पत्नीबरोबर भाजी आणतात. खाऊ आणतात. टीव्हीची सीरीयलची वेळ चुकवत नाहीत. सीरीयलमधली सगळी पात्रं आज काय करणार याची चर्चा करतात. त्यात एखादा विरुद्ध वागला तर ते त्याला आवडत नाही. तो चुकचुकतो. निषेध व्यक्त करतो. त्याला ते आवडत नाही. तो नाइलाजाने जेवतो. गप्पा मारत झोपी जातो. रात्री एकदोनदा उठतो. पुन्हा झोपतो. त्याला वयानुरूप आजार होतात. या सर्व रुटीनमध्ये डॉक्टरकडे जाणे, खरेदी करणे आलेच. पण पुस्तक वाचणे, एखाद्या कलात्मक चित्रपटावर, चित्रावर गप्पा मारणे त्याला पटत नाही. मग तो वेगळे विषय काढत नाही. अशी माणसं त्यांच्या दृष्टीने छान जगत असतात. त्यांना काळजी असते स्वत:च्या तब्येतीची, घरातल्यांच्या तब्येतीची, मुलांची, मुलींची, म्हणजे तो आदर्श पिता होऊ शकतो. भाऊ, मामा, काका होतो. त्याला हे सारे नियमितपणे करावे वाटते. मग त्याचा वेगळा रंग दिसत नाही. त्याला तो काटेकोर जीवन म्हणतो. घरातील व्यक्तीचा मोठा अपघात, मृत्यू, घटस्फोट किंवा मोठ्ठा आघात तो एकदम बदलू शकतो असा. म्हणजे एखादे आयुष्य खूप छान जात असते. त्याला एखाद्या घटनेने धक्का बसतो. तो नीट राहू शकत नाही. हा बदल म्हणजे यू-टर्न असतो. सुखात पोहता पोहता दु:खात बुडत जाणे हे भागधेय, नशीबच म्हणावे लागेल. त्याला नेहमी वाटते, असे प्रसंग कुणाच्याही वाट्यास येऊ नये. आपले भावविश्व बदलू नये. पण एखादा आपलंच भावविश्व तोडत तुटत पुढे जात राहतो. प्रचंड गोते खातो, संकटं झेलतो तोच खरा पठ्ठा, माणूस, झगडणारा, झगडत हसत राहणारा.- किशोर पाठक -