शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मनाचिये गुंथी - गाववाड्यातील लोकरंग

By admin | Updated: March 30, 2017 00:41 IST

भारतीय संस्कृती आणि लोकजीवनातील प्रत्येक सण हा एकीकडे आध्यात्मिक आणि धार्मिक तत्त्वाने जोडला आहे

भारतीय संस्कृती आणि लोकजीवनातील प्रत्येक सण हा एकीकडे आध्यात्मिक आणि धार्मिक तत्त्वाने जोडला आहे, तर दुसरीकडे मुक्त आनंदाचा लोकोत्सव म्हणून तो उत्साहात साजरा होतो आहे. उत्सवांचे नियोजनही ऋतुमानाप्रमाणे आणि निसर्ग घटकांच्या ऋतुचक्राप्रमाणे केले गेले आहे. चैत्रात वसंत ऋतू येतो तो चैतन्याची अनुभूती घेऊनच. या वसंत आगमनाच्या स्वागतासाठी ‘वसंत आगमनोत्सव’ म्हणून होळीचा सण साजरा होतो. या उत्सवाचे रूप पाहता हा सण मूलत: अगदी लौकिक पातळीवरचा असून, नंतर त्यात कालांतराने धार्मिक व सांस्कृतिक विधी विधानांची भर पडून त्याचे स्वरूप तयार झाले. होलिकोत्सव म्हणजे होळी, धुलिकोत्सव म्हणजे धुळवड आणि रंगोत्सव म्हणजे रंगपंचमी. या तिन्हीचे एकत्रिकरण होऊन या लोकोत्सवाच्या अंगाने होळी पौर्णिमेपासूनच रंग, ढंग आणि शृंगाराची उधळण होते. शेतातले पीकपाणी घरी आलेले असते. गावगाड्यातील उरुस, जत्रांना सुरुवात होते. होळी पेटल्यानंतर तर मनसोक्तपणे बोंब मारायला पूर्ण मुभा असते. गंभीर तत्त्वज्ञान, सात्त्विक आदर्शवाद या साऱ्यांना क्षणभर बाजूला ठेवून एक वेगळीच धुंदी गावगाड्यात अवतरते. राजस वृत्तीचे सारे खेळ, लीला, क्रीडा याला उधाण येते. सर्वसामान्यांना स्वभावधर्म ओळखून मनात दाबून ठेवलेल्या शृंगारवृत्तीला मुक्तपणे शब्दातून व्यक्त करण्याचा जणू धार्मिक परवानाच शिमग्याच्या निमित्ताने या कालावधीत लोकांना मिळतो. विनोदी कार्यक्रमांद्वारा विडंबनात्मक अश्लील बोलण्यातून लोकांना हसविणारे ‘भाव’ हे याच काळात गावगाड्यात हिंडू लागतात. दरवेशी, कोल्हाटी, शकुनी, बहुरूपी, पिंगळे, पांगूळ, बाळसंतोष, सरवडा या साऱ्या लोकभूमिका गावगाड्यात येऊन आपल्या आगमनाने रंग भरवतात. त्यांच्या वर्षाच्या फेराचा डेकार त्यांना शेतकऱ्यांच्या खळ्यावर मिळे आणि मग तृप्त होऊन या लोकभूमिका आपल्या पारंपरिक लोककलांमधून लोकांना रिझवित नाथमहाराजांनी भागवतात या भांडांचा संदर्भ दिला आहे. ‘‘का भांडांचे तोंडी भंडपुराण। त्यावरी आला शिमग्याचा सण। मग करिता वाग्विटंबन। आवरी कवण तयासी।’’ शिमग्याच्या पंधरवड्यात वाग्विटंबनेपासून समाजाच्या विकृतींवर मार्मिक शैलीने आघात करणाऱ्या भांडाच्या भंडपुराणाला उधाण येत असे. त्याच काळात गावगाड्यात बारा बलुतेदारांचा तमाशा होत असे. गावच्या उत्पन्नातून ‘देकार’ नावाची देणगी या खेळ-तमाशासाठी बाजूला काढून ठेवली जायची. गावकीच्या तमाशात तेली, न्हावी, महार, कुंभार, मुलाणी, सुतार, गुरव, परीट हे सारे भाग घ्यायचे. गावचा ब्राह्मणही कवने करून द्यायचा आणि बारा बलुतेदारांच्या चावडीवर तमाशातून लोकरंजनाचे एक थिएटर उभे राहायचे. भक्तिरसात रमलेला गावगाड्यातला भोळा भाव तमाशाच्या शृंगारातही तितकाच रंगायचा. खेळ, सण, उत्सवांच्या माध्यमातून जीवनाच्या विविध रंगांची उधळण करणारी मुक्त समाजव्यवस्था इतरत्र कोठे आढळणार?डॉ. रामचंद्र देखणे