शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - गाववाड्यातील लोकरंग

By admin | Updated: March 30, 2017 00:41 IST

भारतीय संस्कृती आणि लोकजीवनातील प्रत्येक सण हा एकीकडे आध्यात्मिक आणि धार्मिक तत्त्वाने जोडला आहे

भारतीय संस्कृती आणि लोकजीवनातील प्रत्येक सण हा एकीकडे आध्यात्मिक आणि धार्मिक तत्त्वाने जोडला आहे, तर दुसरीकडे मुक्त आनंदाचा लोकोत्सव म्हणून तो उत्साहात साजरा होतो आहे. उत्सवांचे नियोजनही ऋतुमानाप्रमाणे आणि निसर्ग घटकांच्या ऋतुचक्राप्रमाणे केले गेले आहे. चैत्रात वसंत ऋतू येतो तो चैतन्याची अनुभूती घेऊनच. या वसंत आगमनाच्या स्वागतासाठी ‘वसंत आगमनोत्सव’ म्हणून होळीचा सण साजरा होतो. या उत्सवाचे रूप पाहता हा सण मूलत: अगदी लौकिक पातळीवरचा असून, नंतर त्यात कालांतराने धार्मिक व सांस्कृतिक विधी विधानांची भर पडून त्याचे स्वरूप तयार झाले. होलिकोत्सव म्हणजे होळी, धुलिकोत्सव म्हणजे धुळवड आणि रंगोत्सव म्हणजे रंगपंचमी. या तिन्हीचे एकत्रिकरण होऊन या लोकोत्सवाच्या अंगाने होळी पौर्णिमेपासूनच रंग, ढंग आणि शृंगाराची उधळण होते. शेतातले पीकपाणी घरी आलेले असते. गावगाड्यातील उरुस, जत्रांना सुरुवात होते. होळी पेटल्यानंतर तर मनसोक्तपणे बोंब मारायला पूर्ण मुभा असते. गंभीर तत्त्वज्ञान, सात्त्विक आदर्शवाद या साऱ्यांना क्षणभर बाजूला ठेवून एक वेगळीच धुंदी गावगाड्यात अवतरते. राजस वृत्तीचे सारे खेळ, लीला, क्रीडा याला उधाण येते. सर्वसामान्यांना स्वभावधर्म ओळखून मनात दाबून ठेवलेल्या शृंगारवृत्तीला मुक्तपणे शब्दातून व्यक्त करण्याचा जणू धार्मिक परवानाच शिमग्याच्या निमित्ताने या कालावधीत लोकांना मिळतो. विनोदी कार्यक्रमांद्वारा विडंबनात्मक अश्लील बोलण्यातून लोकांना हसविणारे ‘भाव’ हे याच काळात गावगाड्यात हिंडू लागतात. दरवेशी, कोल्हाटी, शकुनी, बहुरूपी, पिंगळे, पांगूळ, बाळसंतोष, सरवडा या साऱ्या लोकभूमिका गावगाड्यात येऊन आपल्या आगमनाने रंग भरवतात. त्यांच्या वर्षाच्या फेराचा डेकार त्यांना शेतकऱ्यांच्या खळ्यावर मिळे आणि मग तृप्त होऊन या लोकभूमिका आपल्या पारंपरिक लोककलांमधून लोकांना रिझवित नाथमहाराजांनी भागवतात या भांडांचा संदर्भ दिला आहे. ‘‘का भांडांचे तोंडी भंडपुराण। त्यावरी आला शिमग्याचा सण। मग करिता वाग्विटंबन। आवरी कवण तयासी।’’ शिमग्याच्या पंधरवड्यात वाग्विटंबनेपासून समाजाच्या विकृतींवर मार्मिक शैलीने आघात करणाऱ्या भांडाच्या भंडपुराणाला उधाण येत असे. त्याच काळात गावगाड्यात बारा बलुतेदारांचा तमाशा होत असे. गावच्या उत्पन्नातून ‘देकार’ नावाची देणगी या खेळ-तमाशासाठी बाजूला काढून ठेवली जायची. गावकीच्या तमाशात तेली, न्हावी, महार, कुंभार, मुलाणी, सुतार, गुरव, परीट हे सारे भाग घ्यायचे. गावचा ब्राह्मणही कवने करून द्यायचा आणि बारा बलुतेदारांच्या चावडीवर तमाशातून लोकरंजनाचे एक थिएटर उभे राहायचे. भक्तिरसात रमलेला गावगाड्यातला भोळा भाव तमाशाच्या शृंगारातही तितकाच रंगायचा. खेळ, सण, उत्सवांच्या माध्यमातून जीवनाच्या विविध रंगांची उधळण करणारी मुक्त समाजव्यवस्था इतरत्र कोठे आढळणार?डॉ. रामचंद्र देखणे