शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

ममतांचे बंड आणि घटनात्मक पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 01:00 IST

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर आहे. स्वायत्त संस्थांचे राजकीयकरण असेच होत राहिले तर भविष्यात अनागोंदी माजेल. कोणी कोणाचे ऐकायचे हा प्रश्न निर्माण होईल. म्हणूनच बंगालच्या प्रसंगातून देशात राजकारण झाले तर अधिक चिंता नाही मात्र घटनात्मक पेच निर्माण झाला तर संघराज्य व्यवस्थेला आव्हान ठरेल.

ठळक मुद्देकेंद्र सरकार, सीबीआय विरुद्ध ममता बॅनर्जी सरकार ही न्यायालयीन लढाई अटळ आहेलोकसभा निवडणूक डोळ्यासमोर आहे. स्वायत्त संस्थांचे राजकीयकरण असेच होत राहिले तर भविष्यात अनागोंदी माजेलबंगालच्या प्रसंगातून देशात राजकारण झाले तर अधिक चिंता नाही मात्र घटनात्मक पेच निर्माण झाला तर संघराज्य व्यवस्थेला आव्हान

- धर्मराज हल्लाळे

केंद्र सरकार, सीबीआय विरुद्ध ममता बॅनर्जी सरकार ही न्यायालयीन लढाई अटळ आहे. स्वायत्त संस्था असलेल्या सीबीआयला थेट आव्हान देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्याग्रह आरंभला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपा सरकारने  सीबीआयचा राजकीय वापर केल्याचा ममतांचा आरोप आहे. शारदा चिटफ़ंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीवकुमार यांची चौकशी करण्यासाठी सीबीआय पोहचली होती. त्यावेळी बंगाल पोलिसांनी न्यायालयाचे वारण्ट मागितले. ते सीबीआयकडे नव्हते. त्यावेळी सीबीआय आणि बंगाल पोलीस यांच्यात नेमके काय घडले ते सत्य समोर येईल. तिथे स्थानिक पोलिसांनी चौकशीला मज्जाव केल्यानंतर सीबीआयकडे न्यायालयात जाण्याचा पर्याय होता. मात्र तसे न झाल्याने पुढे जे घडले त्यातुनच वाद उदभवला असल्याचे समोर येत आहे. सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना अटक झाली. काही वेळात त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर थेट आरोप केला.  सीबीआयला पुढे करून राजकारण होत असल्याचा घणाघात देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी केला. एकीकडे ममता यांची भूमिका संघराज्य व्यवस्थेवरील हल्ला असल्याचे भाजपा नेते सांगत आहेत. याउलट सत्याग्रह करणाऱ्या ममता यांना अनेक प्रमुख पक्षांनी पाठिंबा दर्शवत पश्चिम बंगालला मोदीविरोधी केंद्र बनवले आहे. नरेंद्र मोदी यांनीच सीबीआयला काही तरी करा असे फर्मावल्यानंतर हालचाली सुरु झाल्या आहेत, असा थेट आरोप ममतांनी केला. मात्र कारवाईच्या भीतीने ममता यांचे धरणे सुरु असल्याचा पलटवार भाजपाचा आहे. हे आरोप  प्रत्यारोप होत राहतील, मात्र सरकार विरुद्ध सरकार ही लढाई घटनात्मक पेच निर्माण करणारी आहे. देशात संघराज्य व्यवस्था आहे. राज्याचे सार्वभौमत्व आहे. संसद सर्वोच्च आहे.   मात्र केंद्राची जशी सूची आहे, तशी राज्याची सूची आहे. विषय आणि अधिकार वाटून दिले आहेत. केंद्राचे नियंत्रण असले तरी राज्याचे स्वतंत्र अस्तित्वही आहे. त्यामुळे केंद्राच्या एका स्वायत्त  तपास यंत्रणेला राज्याच्या पोलिसांनी मज्जाव केला. त्याला न्यायालयात आव्हान देता येईल. परंतु कोणत्याही राज्यात कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर संरक्षकाच्या भूमिकेत त्याच राज्याची पोलीस लागेल. मात्र बंगालमध्ये सीबीआय कार्यालयाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाला पाचारण करावे लागले, हे दोन सरकारातील भेदाचे भयंकर लक्षण आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही एकमेकांवर घटनादत्त मूल्यांवर हल्ला केल्याचा आरोप करत आहेत. घटनात्मक पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यात अधिकची जबाबदारी केंद्र सरकारची येते. सर्व राज्यांना संघराज्य व्यवस्थेत बांधून ठेवणे, कोणत्याही स्थितीत बंडाची, दुहीची भावना पेरली जाणार नाही हे पाहणे केंद्राची जबाबदारीच नव्हे उत्तरदायित्व आहे. सत्याग्रह होईल, धरणे होईल, विरोधक एकवटलीत, सरकार राहील, जाईल परंतु कोणत्याही राज्यात संघराज्य व्यवस्थेला आव्हान देण्याचा विचार रुजणे वा तो रुजण्याची वेळ आणणे एकात्मतेला धोका निर्माण करण्यासारखे आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जनतेसमोर आले. सीबीआय प्रमुखांचा वाद झाला. आरबीआय, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग प्रमुखांचे राजीनामे झाले. आता एक राज्याची मुख्यमंत्री सत्याग्रह करत आहे. घटना वाचवा, देश वाचवा हा नारा सुरु आहे. त्यावर राजकारण होणार. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर आहे. स्वायत्त संस्थांचे राजकीयकरण असेच होत राहिले तर भविष्यात अनागोंदी माजेल. कोणी कोणाचे ऐकायचे हा प्रश्न निर्माण होईल. म्हणूनच बंगालच्या प्रसंगातून देशात राजकारण झाले तर अधिक चिंता नाही मात्र  घटनात्मक पेच निर्माण झाला तर संघराज्य व्यवस्थेला आव्हान ठरेल.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीCBIगुन्हा अन्वेषण विभागCentral Governmentकेंद्र सरकार