शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झाकोळलेल्या काँग्रेसचे जबरदस्त पुनरुज्जीवन!

By रवी टाले | Updated: June 5, 2024 09:42 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: ‘एकला चलो रे’ चा हट्ट न धरता काँग्रेसने राज्यात बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले!

 - रवी टाले(कार्यकारी संपादक, लोकमत, जळगाव)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संपूर्ण चर्चा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या अवतीभवती फिरत होती आणि प्रत्यक्ष निकालात मात्र फार चर्चेत नसलेल्या काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपला २३, एकत्रित शिवसेनेला १८, एकत्रित ‘राकाँ’ला चार, तर काँग्रेसला अवघी एकच जागा मिळाली होती. यावेळी शिवसेना व ‘राकाँ’ची उभी शकले करीत, उभय पक्षांचा प्रत्येकी एक गट सोबत घेऊनही, भाजपला राज्यात जबर फटका बसला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना मिळालेल्या जागांची बेरीज केली तरी, त्यांचीही कामगिरी २०१९ च्या तुलनेत घसरलेली दिसते. याउलट काँग्रेसच्या जागांची संख्या तब्बल १२ पटींनी वाढली आहे, तर ‘राकाँ’च्या शरद पवार गटाची ताकदही जवळपास दुपटीने वाढलेली दिसत आहे.

हा निकाल बाहेरच्या निरीक्षकाला आश्चर्यजनक वाटू शकतो. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाचा जवळून अभ्यास असलेले मात्र त्यामुळे अचंबित होणार नाहीत. गत काही वर्षांत शिवसेना व भाजपच्या कामगिरीमुळे महाराष्ट्रात काँग्रेस झाकोळली असली तरी, राज्यात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट रुजलेली आहेत. सतत धक्के बसूनही काँग्रेसने आपल्या मूळ विचारधारेपासून कधीच फारकत घेतली नाही.  ‘एकला चलो रे’ ही भूमिका यापुढे चालणार नसल्याचे लक्षात घेऊन, बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले. त्याचीच फळे पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या निकालात चाखली आहेत. शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष कधी एकत्र येतील, असा विचार काही वर्षांपूर्वी कोणाला स्वप्नातही शिवला नसता. पण, ते केवळ एकत्रच आले नाहीत, तर एकमेकांना आपापल्या मतपेढ्यांचा लाभ पोहोचविण्यातही कमालीचे यशस्वी झाले. त्याचे श्रेय उभय पक्षांच्या नेत्यांना, की मतदारांच्या सुज्ञपणाला, हा प्रश्न नक्कीच उपस्थित होऊ शकतो. पण, राज्यात काँग्रेसचे जबरदस्त पुनरुज्जीवन झाले आहे, हे मात्र निश्चित ! 

त्यामध्ये सर्वाधिक योगदान काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे आहे. हे यश टिकवून ठेवण्याची जबाबदारी मात्र प्रदेश नेतृत्वाची असेल. दुर्दैवाने एवढी वाताहत होऊनही काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीवरील लाथाळ्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही सुरूच होत्या. त्यातच राज्यात पक्षाकडे संपूर्ण राज्यात प्रभाव पडू शकणाऱ्या नेत्यांचा अभाव जाणवतो आणि पक्षाचा संघटनात्मक ढाचाही खिळखिळा झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश टिकवून ठेवायचे असल्यास, काँग्रेसला या सर्व आघाड्यांवर तातडीने काम करावे लागेल. काँग्रेसमधील लाथाळ्या बंद झाल्या, केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील एखाद्या युवा आणि कर्तबगार नेत्याकडे विश्वासाने जबाबदारी सोपवून त्याला बळ दिले आणि संघटनात्मक ढाचा मजबूत करण्यास प्राधान्य दिले, तर लोकसभा निवडणुकीत मिळविलेले क्रमांक एकचे स्थान भक्कम करता येईल. अन्यथा पुन्हा पहिले पाढे पंचावन्न आहेतच ! 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४