शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झाकोळलेल्या काँग्रेसचे जबरदस्त पुनरुज्जीवन!

By रवी टाले | Updated: June 5, 2024 09:42 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: ‘एकला चलो रे’ चा हट्ट न धरता काँग्रेसने राज्यात बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले!

 - रवी टाले(कार्यकारी संपादक, लोकमत, जळगाव)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संपूर्ण चर्चा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या अवतीभवती फिरत होती आणि प्रत्यक्ष निकालात मात्र फार चर्चेत नसलेल्या काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपला २३, एकत्रित शिवसेनेला १८, एकत्रित ‘राकाँ’ला चार, तर काँग्रेसला अवघी एकच जागा मिळाली होती. यावेळी शिवसेना व ‘राकाँ’ची उभी शकले करीत, उभय पक्षांचा प्रत्येकी एक गट सोबत घेऊनही, भाजपला राज्यात जबर फटका बसला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना मिळालेल्या जागांची बेरीज केली तरी, त्यांचीही कामगिरी २०१९ च्या तुलनेत घसरलेली दिसते. याउलट काँग्रेसच्या जागांची संख्या तब्बल १२ पटींनी वाढली आहे, तर ‘राकाँ’च्या शरद पवार गटाची ताकदही जवळपास दुपटीने वाढलेली दिसत आहे.

हा निकाल बाहेरच्या निरीक्षकाला आश्चर्यजनक वाटू शकतो. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाचा जवळून अभ्यास असलेले मात्र त्यामुळे अचंबित होणार नाहीत. गत काही वर्षांत शिवसेना व भाजपच्या कामगिरीमुळे महाराष्ट्रात काँग्रेस झाकोळली असली तरी, राज्यात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट रुजलेली आहेत. सतत धक्के बसूनही काँग्रेसने आपल्या मूळ विचारधारेपासून कधीच फारकत घेतली नाही.  ‘एकला चलो रे’ ही भूमिका यापुढे चालणार नसल्याचे लक्षात घेऊन, बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले. त्याचीच फळे पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या निकालात चाखली आहेत. शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष कधी एकत्र येतील, असा विचार काही वर्षांपूर्वी कोणाला स्वप्नातही शिवला नसता. पण, ते केवळ एकत्रच आले नाहीत, तर एकमेकांना आपापल्या मतपेढ्यांचा लाभ पोहोचविण्यातही कमालीचे यशस्वी झाले. त्याचे श्रेय उभय पक्षांच्या नेत्यांना, की मतदारांच्या सुज्ञपणाला, हा प्रश्न नक्कीच उपस्थित होऊ शकतो. पण, राज्यात काँग्रेसचे जबरदस्त पुनरुज्जीवन झाले आहे, हे मात्र निश्चित ! 

त्यामध्ये सर्वाधिक योगदान काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे आहे. हे यश टिकवून ठेवण्याची जबाबदारी मात्र प्रदेश नेतृत्वाची असेल. दुर्दैवाने एवढी वाताहत होऊनही काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीवरील लाथाळ्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही सुरूच होत्या. त्यातच राज्यात पक्षाकडे संपूर्ण राज्यात प्रभाव पडू शकणाऱ्या नेत्यांचा अभाव जाणवतो आणि पक्षाचा संघटनात्मक ढाचाही खिळखिळा झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश टिकवून ठेवायचे असल्यास, काँग्रेसला या सर्व आघाड्यांवर तातडीने काम करावे लागेल. काँग्रेसमधील लाथाळ्या बंद झाल्या, केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील एखाद्या युवा आणि कर्तबगार नेत्याकडे विश्वासाने जबाबदारी सोपवून त्याला बळ दिले आणि संघटनात्मक ढाचा मजबूत करण्यास प्राधान्य दिले, तर लोकसभा निवडणुकीत मिळविलेले क्रमांक एकचे स्थान भक्कम करता येईल. अन्यथा पुन्हा पहिले पाढे पंचावन्न आहेतच ! 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४