शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झाकोळलेल्या काँग्रेसचे जबरदस्त पुनरुज्जीवन!

By रवी टाले | Updated: June 5, 2024 09:42 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: ‘एकला चलो रे’ चा हट्ट न धरता काँग्रेसने राज्यात बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले!

 - रवी टाले(कार्यकारी संपादक, लोकमत, जळगाव)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संपूर्ण चर्चा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या अवतीभवती फिरत होती आणि प्रत्यक्ष निकालात मात्र फार चर्चेत नसलेल्या काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपला २३, एकत्रित शिवसेनेला १८, एकत्रित ‘राकाँ’ला चार, तर काँग्रेसला अवघी एकच जागा मिळाली होती. यावेळी शिवसेना व ‘राकाँ’ची उभी शकले करीत, उभय पक्षांचा प्रत्येकी एक गट सोबत घेऊनही, भाजपला राज्यात जबर फटका बसला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना मिळालेल्या जागांची बेरीज केली तरी, त्यांचीही कामगिरी २०१९ च्या तुलनेत घसरलेली दिसते. याउलट काँग्रेसच्या जागांची संख्या तब्बल १२ पटींनी वाढली आहे, तर ‘राकाँ’च्या शरद पवार गटाची ताकदही जवळपास दुपटीने वाढलेली दिसत आहे.

हा निकाल बाहेरच्या निरीक्षकाला आश्चर्यजनक वाटू शकतो. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाचा जवळून अभ्यास असलेले मात्र त्यामुळे अचंबित होणार नाहीत. गत काही वर्षांत शिवसेना व भाजपच्या कामगिरीमुळे महाराष्ट्रात काँग्रेस झाकोळली असली तरी, राज्यात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट रुजलेली आहेत. सतत धक्के बसूनही काँग्रेसने आपल्या मूळ विचारधारेपासून कधीच फारकत घेतली नाही.  ‘एकला चलो रे’ ही भूमिका यापुढे चालणार नसल्याचे लक्षात घेऊन, बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले. त्याचीच फळे पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या निकालात चाखली आहेत. शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष कधी एकत्र येतील, असा विचार काही वर्षांपूर्वी कोणाला स्वप्नातही शिवला नसता. पण, ते केवळ एकत्रच आले नाहीत, तर एकमेकांना आपापल्या मतपेढ्यांचा लाभ पोहोचविण्यातही कमालीचे यशस्वी झाले. त्याचे श्रेय उभय पक्षांच्या नेत्यांना, की मतदारांच्या सुज्ञपणाला, हा प्रश्न नक्कीच उपस्थित होऊ शकतो. पण, राज्यात काँग्रेसचे जबरदस्त पुनरुज्जीवन झाले आहे, हे मात्र निश्चित ! 

त्यामध्ये सर्वाधिक योगदान काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे आहे. हे यश टिकवून ठेवण्याची जबाबदारी मात्र प्रदेश नेतृत्वाची असेल. दुर्दैवाने एवढी वाताहत होऊनही काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीवरील लाथाळ्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही सुरूच होत्या. त्यातच राज्यात पक्षाकडे संपूर्ण राज्यात प्रभाव पडू शकणाऱ्या नेत्यांचा अभाव जाणवतो आणि पक्षाचा संघटनात्मक ढाचाही खिळखिळा झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश टिकवून ठेवायचे असल्यास, काँग्रेसला या सर्व आघाड्यांवर तातडीने काम करावे लागेल. काँग्रेसमधील लाथाळ्या बंद झाल्या, केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील एखाद्या युवा आणि कर्तबगार नेत्याकडे विश्वासाने जबाबदारी सोपवून त्याला बळ दिले आणि संघटनात्मक ढाचा मजबूत करण्यास प्राधान्य दिले, तर लोकसभा निवडणुकीत मिळविलेले क्रमांक एकचे स्थान भक्कम करता येईल. अन्यथा पुन्हा पहिले पाढे पंचावन्न आहेतच ! 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४