शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

अशाने उत्पन्न दुप्पट होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:24 IST

मे महिन्याचा पहिला आठवडा संपला आहे. आणखी एक महिना उलटला, की पेरण्यांची लगबग सुरू होईल. तत्पूर्वी शेतकऱ्यांना मशागत पूर्ण करून बी-बियाण्याची सोय लावावी लागणार आहे. त्यासाठी हाती रोकड असणे गरजेचे आहे. बहुतांश शेतकरी त्यासाठी विसंबून असतात ते बँकांमार्फत मिळणा-या पीक कर्जावर! साधारणत: मे महिन्याच्या प्रारंभी पीक कर्ज वाटप पूर्ण झाल्यास शेतक-यांना मशागत आणि बी-बियाणे खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळतो. दुर्दैवाने यावर्षी पीक कर्ज वाटप लांबण्याची दाट शक्यता दिसू लागली आहे.

मे महिन्याचा पहिला आठवडा संपला आहे. आणखी एक महिना उलटला, की पेरण्यांची लगबग सुरू होईल. तत्पूर्वी शेतकऱ्यांना मशागत पूर्ण करून बी-बियाण्याची सोय लावावी लागणार आहे. त्यासाठी हाती रोकड असणे गरजेचे आहे. बहुतांश शेतकरी त्यासाठी विसंबून असतात ते बँकांमार्फत मिळणा-या पीक कर्जावर! साधारणत: मे महिन्याच्या प्रारंभी पीक कर्ज वाटप पूर्ण झाल्यास शेतक-यांना मशागत आणि बी-बियाणे खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळतो. दुर्दैवाने यावर्षी पीक कर्ज वाटप लांबण्याची दाट शक्यता दिसू लागली आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या दहा हजार शेतक-यांना पीक कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यातील शेतक-यांची एकूण संख्या विचारात घेतल्यास, कर्ज मिळालेल्या शेतक-यांची संख्या अवघी तीन ते चार टक्के भरते. अकोला जिल्ह्यात यावर्षी एकूण १,३३५ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे; मात्र आतापर्यंत त्यापैकी केवळ १०१ कोटी रुपयांचेच कर्ज वाटप झाले आहे. कर्जमाफीचा घोळात घोळही अद्याप सुरूच असल्यामुळे, अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठीचे आॅनलाईन अर्जच भरलेले नाहीत, तर सुमारे १५ हजार शेतकरी अर्ज भरल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरूनही, त्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. हा मजकूर लिहीत असताना, विदर्भातील इतर जिल्ह्यांची आकडेवारी उपलब्ध झालेली नव्हती; पण स्थितीमध्ये फार फरक असण्याची शक्यता क्षीण आहे. सावकारांच्या वा बँकांच्या कर्जाचा बोजा असह्य झाल्याच्या कारणास्तव, विदर्भात गत काही वर्षात हजारो शेतकºयांनी मृत्यूस कवटाळले आहे; पण याचा अर्थ शेतकºयांना कर्ज देऊ नये, असा होत नाही. उलटपक्षी, शेतकरी सावकारी कर्जाच्या कचाट्यात अडकू नये, यासाठी बँकांमार्फत पतपुरवठा वाढविण्याची गरज आहे. कृषी क्षेत्राचा विकास दर वाढविण्यासाठी पतपुरवठा वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असे मत अनेक ख्यातनाम अर्थतज्ज्ञांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या विकास दरावरच देशाचा विकास दर अवलंबून असतो. त्यापैकी उद्योग व सेवा या दोन क्षेत्रांच्या वाढीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे देशाच्या विकास दराचा आलेख चढा ठेवण्यासाठी कृषी क्षेत्राचा विकास दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही; मात्र त्या क्षेत्रास पतपुरवठा करण्यासंदर्भात एवढी उदासीनता असल्यास ते शक्य होणार नाही. ही उदासीनता शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या स्वप्नासही नक्कीच नख लावेल!

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीbankबँकMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार