शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

हंगाम निवडणुकीचा..अशावेळी सगळं विसरावं लागतं

By सुधीर महाजन | Updated: October 9, 2019 11:36 IST

निवडणूक म्हणजे आणीबाणीच्या प्रसंग. अशावेळी सगळं विसरावं लागतं

- सुधीर महाजन

खिल्लारे गुरुजी वैतागले होते. प्रचंड निराशेच्या गर्तेत ते सापडले होते. परिस्थितीसमोर हतबल झाले होते. ही अवस्था त्यांची एकट्याची नव्हती, तर नवजीवन शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचारी, भवानीमाता साखर कारखान्याचे नोकरदार, बाळराजे पतसंस्थेतील कर्मचारी, संग्रामराजे महाविद्यालयातील सर्वांचीच ही अवस्था होती. खिल्लारे गुरुजींची झोप उडाली होती, जेवण जात नव्हते. एकूण जगण्यावरची वासनाच उडाली होती. कारणही तसेच होते. पोरगा पुण्यात शिकत होता. मुलगी शाळेत होती. घरी आजारी आई, बेरोजगार भाऊ, असा कुटुंबाचा गाडा एकट्याच्या पगारावर ओढत असतानाच आदेश निघाला. या महिन्याचा पगार मिळणार नाही. आपले साहेब निवडणुकीला उभे असल्याने त्यांना मदत करण्यासाठी एक महिन्याचा पगार देण्याचा हा फतवा होता. दसरा, दिवाळी तोंडावर होते. पोराला पैसे पाठवायचे होते. आजारी आईची तब्येत खालावली होती. शिवाय कर्जाचा हप्ता, हातउचल, अशी तोंडमिळवणी करताना ते आधीच घायकुतीला आलेले. हे कमी की काय, तर साहेबांच्या मदतीसाठी पतसंस्थेतून प्रत्येकाच्या नावावर दोन-दोन लाखांचे कर्ज उचलले होते. त्या फॉर्मवर सह्या करताना त्यांच्या डोळ्यासमोर अंधारीच आली; पण उपाय नव्हता. पंधरा वर्षे विनाअनुदान काम केल्यानंतर आता कुठे हाती पगार पडायला सुरुवात झाली होती. कमी-अधिक प्रमाणात तालुक्यातल्या नोकरदारांची हीच अवस्था होती.

सविताबार्इंचा जीव टांगणीला लागला होता. बाई पतसंस्थेत कामाला होत्या. नवरा संस्थेच्या शाळेत २५ कि़मी.वर होता. घरात दोन चिल्ली-पिल्ली निवडणुकीची धमाल उडाली आणि साहेबांनी सगळ्यांनाच कामाला लावले. बाईच्या नवऱ्यावर तिकडेच पाच-गावांच्या प्रचाराची व बंदोबस्ताची जबाबदारी टाकली. मतदान झाल्याशिवाय गाव सोडायचे नाही, अशी सूचना दिली. इकडे बाईकडे नवरात्रामुळे गावागावांत हळदी-कुंकवाचे आणि ओटी भरण्याचे कार्यक्रम आखून ते पार पाडण्याची जबाबदारी टाकली. दिवसभरातल्या एका कार्यक्रमाला बाईसाहेब किंवा वहिनीसाहेब हजेरी लावत होत्या, म्हणून प्रत्येक कार्यक्रमात गर्दी जमवावी लागत होती. पार सकाळी जीप आली की, दिवसभरात पास-सात गावांत हळदी-कुंकू करून याव लागे. बायकांना हाता-पाया पडून गोळा करावे लागे. घरात आबाळ सुरू झाली. लहान पोरांकडे दुर्लक्ष व्हायला लागले. त्यांना सांभाळायला बाई ठेवली; पण रोजचा उशीर ठरलेला तशात पोरगी आजारी पडली; पण ओटी भरण्याचे काम थांबवता येत नव्हते आणि पोरगी आजारी पडली, अशी सबब सांगण्याची हिंमत नव्हती. कारण प्रश्न नोकरीचा होता. सिरसगावचा कार्यक्रम संपायला ४ वाजले. आता देशगव्हाण आणि बोरामणीचे हळदी-कुंकू आटोपूनच घरी जायचे होते. रात्री उशीर होणार. तापाने फणफणलेली पोरगी, वाट पाहून दमून झोपलेला पोरगा आणि वैतागलेली सांभाळणारी बाई, हे चित्र सविताबार्इंच्या डोळ्यासमोर आले आणि त्यांचा जीव गलबलला. डोळे भरून आले. मोठ्या कसोशीने त्यांनी हुंदका रोखला; पण रामू शिपायाच्या नजरेतून बार्इंची अवस्था लपली नाही. ‘आपण काय करू शकतो ताई; आपले भोग आपणच भोगले पाहिजेत.’ साहेबांची नाराजी काय असते, याची सर्वांना कल्पना होती. हळूच डोळे टिपत त्या जीपमध्ये बसल्या आणि देशगव्हाणकडे रवाना झाल्या.———————-संपतराव बँकेचे मॅनेजर; पण सगळीकडे भाऊसाहेब नावाने ओळखले जातात. रमेश शिरपे हा क्लार्क त्यांना विनवणी करीत होता. साहेब. ‘बाप सिरिअस आहे.’ दोन दिवस दवाखान्यात जाऊन येतो. भाऊसाहेबांनाही त्याची अवस्था पाहून भरून आले; पण नाइलाज होता. रमेशला सुटी देता येत नव्हती. कार्यकर्त्यांच्या रोजच्या खर्चाचा हिशेब ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी रमेशवर होती. निवडणूक म्हणजे आणीबाणीच्या प्रसंग. अशावेळी सगळं विसरावं लागतं बाबा, असे ते मनातल्या मनात म्हणत होते; पण बोलण्याची हिंमत नव्हती. ‘रजा मिळणार नाही.’ हे तीन शब्द अतिशय कोडरेपणाने त्यांनी कसेबसे उच्चारले आणि तेथून उठले.————————स्टाफरूममध्ये प्रत्येक जण अडचणीचा पाढा वाचत होता. आजूबाजूला कोणी नाही ना. याचा कानोसा घेत घाटगे, कांबळे, शिंदे, सोनवणे, राजपूत बाई यांचे बोलणे चालले होते. प्रत्येक निवडणुकीत गड्यासारखं राबावं लागतं आणि एक महिन्याचा पगारही द्यावा लागतो, अशी दबक्या आवाजातील चर्चा सुरू होती. तिकडे कोपऱ्यात जोशी गुरुजी खाली मान घालून गृहपाठाच्या वह्या तपासत होते. ‘जोशा, तू काहीच बोलत नाही?’ कांबळेच्या या प्रश्नावर जोशी म्हणाले ‘तुमचं ठीक आहे, माझ्या मागे आहे कोण?’ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PoliticsराजकारणElectionनिवडणूकEmployeeकर्मचारी