शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

हे 'लाडके' आणि ते 'दोडके' असे किती दिवस चालणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 07:51 IST

आज राज्याचा ६६ वा स्थापना दिवस. मुंबई-पुण्यासारखी शहरे जागतिक व्यापार केंद्र म्हणून भरभराटीला येत असताना मराठवाडा, विदर्भ अविकसित का?

डॉ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. कशाचीही अपेक्षा न करता संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होण्याची भूमिका मराठवाड्याने दाखवली. त्याचप्रमाणे राजधानीचा दर्जा राहतो की नाही याची फारशी फिकीर न करता नागपूर विभाग आला आणि संयुक्त महाराष्ट्र प्रस्थापित झाले. काही वर्षांनी असे दिसून आले की, महाराष्ट्राचा विकास तर होत आहे पण तो असमतोल, मराठवाडा व विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्र सर्वच विकास क्षेत्रात अग्रेसर आहे. १९८३ साली शासनाने स्थापित केलेल्या दांडेकर समितीने आकडेवारीद्वारे ते दाखवून दिले. महाराष्ट्र विधानमंडळाने जुलै १९८४ मध्ये विकास मंडळे स्थापन व्हावीत, असा ठराव केला. प्रत्यक्षात विकास मंडळे त्यानंतर १० वर्षांनी विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी विकास मंडळे स्थापन झाली. १९९४ मध्ये स्थापित केलेल्या विकास मंडळांना ३० एप्रिल

२०२० नंतर मुदतवाढ देण्यात आली नाही. याचा अर्थ राज्याने विकासात समतोल साधला, असा घ्यायचा का?

आज राज्याचा ६६ वा स्थापना दिवस आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे सारखी शहरे जागतिक व्यापार केंद्र म्हणून भरभराटीला येत असताना मराठवाडा आणि विदर्भासारखे प्रदेश गरीब आणि अविकसित आहेत. या तीव्र प्रादेशिक असमतोलतेमुळे आर्थिक असमानता वाढली आहे. पश्चिम विदर्भ व मराठवाडचात कृषी क्षेत्राची अवस्था बिकट असल्याने येथे शेतकरी आत्महत्या होतात. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत विदर्भ आणि मराठवाडचातील तब्बल २,७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी आहे. म्हणजे सरासरीने दिवसाला ७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले, याला मुख्य कारण सिंचनाचा अभाव.

महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाच्या सिंचन स्थिती दर्शक अहवालानुसार (२०२१-२०२२) महाराष्ट्रात लागवडीयोग्य क्षेत्र हे २ कोटी १० लाख ६२ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ५४ लाख ९५ हजार ४८५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली. निर्मित महाराष्ट्र दिन सिंचन क्षेत्राची एकूण लागवड योग्य क्षेत्राशी टक्केवारी काढली तर ती २६.०९ टक्के होते. प्रत्यक्षात सिंचन क्षेत्र हे केवळ ४२ लाख ११ हजार ३११ हेक्टर एवढेच आहे. म्हणजे सिंचन क्षेत्राची एकूण लागवड योग्य क्षेत्राशी टक्केवारी १९.९९ टक्के भरते. पश्चिम विदर्भातील (अमरावती विभाग) एकूण लागवड क्षेत्राशी प्रत्यक्षात सिंचनाची सरासरी टक्केवारी केवळ ९.५ टक्के आहे. नागपूर विभागाची टक्केवारी २४.५७ आहे. मराठवाड्यात एकूण लागवड क्षेत्राशी प्रत्यक्षात सिंचनाची सरासरी टक्केवारी केवळ १२.४० टक्के आहे. या तुलनेत पुण्यात प्रत्यक्ष सिंचन ६२.१६ टक्के, कोल्हापूर ४६.३४ टक्के, सोलापूर ३३.७२ टक्के तर सांगली जिल्ह्यात ३५.२९ टक्के आहे. यावरून पश्चिम विदर्भातील व मराठवाड्यातील सिंचन संदर्भात भीषणता लक्षात येते.

हीच परिस्थिती उद्योगाची आहे. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात (२०२२-२०२३) एकूण विदर्भाचा हिस्सा १४.५ टक्के, मराठवाड्याचा वाटा ९.४ टक्के तर पश्चिम महाराष्ट्राचा वाटा ७६.१ टक्के आहे. सेवा क्षेत्रात (२०२२-२०२३) विदर्भाचा हिस्सा १४.५ टक्के, मराठवाड्याचा वाटा ९.८ टक्के तर पश्चिम महाराष्ट्राचा वाटा ७५.७ टक्के आहे. उद्योग व सेवा क्षेत्रात विशेष प्रगती न झाल्याने अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर विभागात नोकऱ्यांचे प्रमाण अल्प आहे. रोजगारासाठी तरुणांना पुणे, मुंबई किंवा नाशिक या विभागात जावे लागते.

महाराष्ट्र राज्याचे दरडोई उत्पन्न (२०२३-२०२४) हे २,७८,६८१ रुपये आहे. कोकण विभागाचे सरासरी दरडोई उत्पन्न ३,३७,३३५ रुपये, पुणे विभागाचे २,८१,९१३.६ रुपये, छत्रपती संभाजीनगर विभागाचे १,८४,८६०.६२५ रुपये तर नागपूर विभागाचे २,१४,६७२.६६७ रुपये आहे. आज विदर्भ व मराठवाड्यातील दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा फारच कमी आहे. पश्चिम समतोल विकासासाठी विदर्भ व मराठवाड्यात, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सिंचनाच्या सोयी प्राधान्याने उपलब्ध करून देणे आवश्यक ठरते. उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास होण्यासाठी उद्योगांना सवलतीच्या दरात जमीन, विजेच्या सोयी आणि कर सवलतींची गरज आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेला ६५ वर्षे होत असताना हा दुजाभाव दूर करण्याच्या हालचालींची गती वाढली पाहिजे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र