शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

महाराष्ट्र बेकीकरण समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:35 IST

मराठी माणसाला घोड्यांची रेस, शेअर बाजार, मटका वगैरेंमध्ये फारशी गती नसते, असा समज होता.

- संदीप प्रधानमराठी माणसाला घोड्यांची रेस, शेअर बाजार, मटका वगैरेंमध्ये फारशी गती नसते, असा समज होता. (अर्थात, आपल्याला सर्वच गोष्टींमध्ये गती असल्याचा मराठी माणसाचा समज असतो, हा भाग अलाहिदा) मात्र, राजकारणात मराठी माणसाला १०० टक्के गती असते, असा ठाम समज होता. मात्र, कर्नाटकातील निवडणुकीत महाराष्ट्र बेकीकरण समितीने (निक्कालाकरिता सीमा भागातील मंडळींमध्ये दुहीच्या विचाराबाबत जे एकीकरण दिसले, त्यामुळे हे नामकरण) आपल्या हाताने पायावर पाडलेला धोंडा पाहिल्यावर मराठी माणसाला राजकारणात तरी धड गती आहे किंवा कसे, हेच समजेनासे झाले आहे. कर्नाटकातील २२४ जागांपैकी सीमावर्ती बेळगावात १८ जागा व त्यापैकी जेमतेम १० जागांवर या बेकीकरणवाल्यांचा वरचष्मा. मागील निवडणुकीत जेमतेम दोन जागांवर विजय मिळवलेला. मात्र, यंदा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच एकीकरणावर विस्तव ठेवून मरहट्ट्यांनी खेकड्यांचे नांगे परस्परांविरुद्ध परजले. सीमावासीयांचे आधारस्तंभ असलेले उद्धव ठाकरे हे जपानमध्ये बुलेट ट्रेन याचि देही, याचि डोळा पाहण्याकरिता गेले असताना शरद पवार बेळगावी पोहोचले. त्यांनी नांग्या नाचवणाऱ्या बेकीकरांना ‘एकत्र राहा’, असा संदेश दिला. (पवार वरकरणी देत असलेल्या संदेशाच्या विपरीत घडते, हा निव्वळ योगायोग असतो) त्यानंतर, नितीनभाऊ गडकरी तेथे दाखल झाले. बेळगावी कुंद्याचा भलामोठा घास अलगद तोंडात टाकून त्यांनी भरभर आकड्यांचा खेळ सुरू केला. एक तासात पाच किलोमीटर रस्ता, एकही रुपया न टाकता सीमावर्ती भागात अमूक लाख कोटी रुपयांची विकासकामे, शाळा, महाविद्यालये, विमानतळ, पंचतारांकित हॉटेल वगैरे वगैरे... मराठी माणसाचे डोळे पांढरे पडले आणि जीभ हातभर लांब लोंबू लागली. (येल्लूरच्या महाराष्ट्र स्कूलला नावात महाराष्ट्र असल्याने कर्नाटक सरकारचे अनुदान मिळाले नाही व एमएच स्कूल असे नामकरण केल्यावर मिळाले, या वास्तव्याचा चक्क आकड्यांच्या महापुरात विसर पडला) त्यामुळे मराठी मतांचे आपणच ‘ठाकूर’ असल्याचा दावा करणाºयांना भाजपात आशेचा ‘किरण’ दिसला, तर सीमावर्ती पाटलांनी ‘मराठा तितुका मेळवावा’, या पवारांच्या आवाहनाला साद घातली. मग, सुरू झाले परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांचे घमासान. सीमावर्ती मराठी बेकीकरण समितीच्या सदस्यांच्या वाकफैरी पाहत साहित्य संमेलनातील अखंड महाराष्ट्राच्या ठरावांनी वारा घेत सुस्कारे सोडत होता. यंदा ‘नोटा’चा पर्याय स्वीकारण्याचा विचार करत होता. अखेरीस, मतदानाच्या दिवशी बेकीकरणवाल्यांना खड्यासारखं बाजूला सारून त्यानं चक्क राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना मतं दिली. आता कन्नडिगांची नाराजी पत्करून कुठला राष्ट्रीय पक्ष सीमावर्ती भागातील मंडळींच्या बाजूनं उभा राहणार आहे? दहा वर्षांपूर्वी बेकीनं एकीकरणवाल्यांच्या पदरात टाकलेला भोपळा पुन्हा पडल्यानं कन्नड रक्षण वेदिकेच्या मंडळींना हर्षवायू व्हायचा तेवढे बाकी आहे. यापुढं साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव करून शिळ्या कढीला ऊत आणायला नको किंवा राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेखाची औपचारिकता तरी कशाला हवी?