शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

महाराष्ट्र बेकीकरण समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:35 IST

मराठी माणसाला घोड्यांची रेस, शेअर बाजार, मटका वगैरेंमध्ये फारशी गती नसते, असा समज होता.

- संदीप प्रधानमराठी माणसाला घोड्यांची रेस, शेअर बाजार, मटका वगैरेंमध्ये फारशी गती नसते, असा समज होता. (अर्थात, आपल्याला सर्वच गोष्टींमध्ये गती असल्याचा मराठी माणसाचा समज असतो, हा भाग अलाहिदा) मात्र, राजकारणात मराठी माणसाला १०० टक्के गती असते, असा ठाम समज होता. मात्र, कर्नाटकातील निवडणुकीत महाराष्ट्र बेकीकरण समितीने (निक्कालाकरिता सीमा भागातील मंडळींमध्ये दुहीच्या विचाराबाबत जे एकीकरण दिसले, त्यामुळे हे नामकरण) आपल्या हाताने पायावर पाडलेला धोंडा पाहिल्यावर मराठी माणसाला राजकारणात तरी धड गती आहे किंवा कसे, हेच समजेनासे झाले आहे. कर्नाटकातील २२४ जागांपैकी सीमावर्ती बेळगावात १८ जागा व त्यापैकी जेमतेम १० जागांवर या बेकीकरणवाल्यांचा वरचष्मा. मागील निवडणुकीत जेमतेम दोन जागांवर विजय मिळवलेला. मात्र, यंदा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच एकीकरणावर विस्तव ठेवून मरहट्ट्यांनी खेकड्यांचे नांगे परस्परांविरुद्ध परजले. सीमावासीयांचे आधारस्तंभ असलेले उद्धव ठाकरे हे जपानमध्ये बुलेट ट्रेन याचि देही, याचि डोळा पाहण्याकरिता गेले असताना शरद पवार बेळगावी पोहोचले. त्यांनी नांग्या नाचवणाऱ्या बेकीकरांना ‘एकत्र राहा’, असा संदेश दिला. (पवार वरकरणी देत असलेल्या संदेशाच्या विपरीत घडते, हा निव्वळ योगायोग असतो) त्यानंतर, नितीनभाऊ गडकरी तेथे दाखल झाले. बेळगावी कुंद्याचा भलामोठा घास अलगद तोंडात टाकून त्यांनी भरभर आकड्यांचा खेळ सुरू केला. एक तासात पाच किलोमीटर रस्ता, एकही रुपया न टाकता सीमावर्ती भागात अमूक लाख कोटी रुपयांची विकासकामे, शाळा, महाविद्यालये, विमानतळ, पंचतारांकित हॉटेल वगैरे वगैरे... मराठी माणसाचे डोळे पांढरे पडले आणि जीभ हातभर लांब लोंबू लागली. (येल्लूरच्या महाराष्ट्र स्कूलला नावात महाराष्ट्र असल्याने कर्नाटक सरकारचे अनुदान मिळाले नाही व एमएच स्कूल असे नामकरण केल्यावर मिळाले, या वास्तव्याचा चक्क आकड्यांच्या महापुरात विसर पडला) त्यामुळे मराठी मतांचे आपणच ‘ठाकूर’ असल्याचा दावा करणाºयांना भाजपात आशेचा ‘किरण’ दिसला, तर सीमावर्ती पाटलांनी ‘मराठा तितुका मेळवावा’, या पवारांच्या आवाहनाला साद घातली. मग, सुरू झाले परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांचे घमासान. सीमावर्ती मराठी बेकीकरण समितीच्या सदस्यांच्या वाकफैरी पाहत साहित्य संमेलनातील अखंड महाराष्ट्राच्या ठरावांनी वारा घेत सुस्कारे सोडत होता. यंदा ‘नोटा’चा पर्याय स्वीकारण्याचा विचार करत होता. अखेरीस, मतदानाच्या दिवशी बेकीकरणवाल्यांना खड्यासारखं बाजूला सारून त्यानं चक्क राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना मतं दिली. आता कन्नडिगांची नाराजी पत्करून कुठला राष्ट्रीय पक्ष सीमावर्ती भागातील मंडळींच्या बाजूनं उभा राहणार आहे? दहा वर्षांपूर्वी बेकीनं एकीकरणवाल्यांच्या पदरात टाकलेला भोपळा पुन्हा पडल्यानं कन्नड रक्षण वेदिकेच्या मंडळींना हर्षवायू व्हायचा तेवढे बाकी आहे. यापुढं साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव करून शिळ्या कढीला ऊत आणायला नको किंवा राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेखाची औपचारिकता तरी कशाला हवी?