शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

सारांश : मोदींच्या पहिल्या सभेने खान्देशचे महत्व अधोरेखित!

By किरण अग्रवाल | Updated: November 10, 2024 17:03 IST

खानदेशात पहिल्याच टप्प्यात थेट पंतप्रधान मोदी यांची सभा झाल्याने महायुतीच्या गोटात विश्वासाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक असून, आता विरोधी नेत्यांकडून सभांचे मैदान गाजवले जाण्याची प्रतीक्षा आहे.

विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात भाजपा नेते खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच सभा धुळे येथे झाल्याने महायुतीच्या दृष्टीने जळगाव खान्देशचे असलेले महत्त्व अधोरेखित होऊन गेले म्हणायचे. या सभेतील मोदी यांचा सुस्पष्ट रोख व विरोधकांवरील हल्लाबोल पाहता यापुढील काळात सर्वपक्षीय प्रचार युद्ध कसे रंगते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. 

विधानसभेची निवडणूक आता बऱ्यापैकी रंगात आली आहे. दिवाळी  होऊन गेली आणि अर्ज माघारीही उलटून गेल्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच प्रचाराने वेग घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 'डोअर टू डोअर' प्रचार व पदयात्रांवर भर दिसून आला. आता जाहीर सभांचा धडाका सुरू झाला आहे. यात भाजपाचे प्रमुख नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील प्रचाराच्या शुभारंभाची सभा खान्देशच्या धुळ्यात झाल्याने महायुतीच्या गोटात विजयाच्या विश्वासाचे बळ संचारणे स्वाभाविक म्हणायला हवे. भाजपाचे स्टार प्रचारक अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिंदेसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार, काँग्रेस नेते व अन्य पक्षांच्या स्टार प्रचारकांच्याही सभा यापुढील काळात नियोजित आहेत, त्यामुळे प्रचार आता गडद होणार आहे. 

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभेच्या एकूण 20 जागांपैकी भाजपाकडे सर्वाधिक आठ जागा असून, महायुतीचे तब्बल 15 आमदार आहेत. लगतच्या नाशिक जिल्ह्यातही भाजपाचे प्राबल्य आहे, यादृष्टीने पंतप्रधानांच्या राज्यातील पहिल्याच सभेचे नियोजन धुळ्यात केले गेले. आजवर महाराष्ट्रातील निवडणुकांमधील काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ धुळे नंदुरबार मध्ये होत आला, आता भाजपानेही याच 'बेल्ट'ला शुभारंभासाठी निवडले आहे. धुळ्यात मोदी यांनी आदिवासींचा मुद्दा, धुळे इंदोर रेल्वेमार्ग, इंडस्ट्रियल कॉरिडोर, टेक्सटाईल हब अशा विकासविषयक विविध मुद्द्यांना हात घालतानाच  विरोधकांचा सडकून समाचार घेतलाच, शिवाय 'एक है तो सेफ है'चा नारा देऊन भाजपाची असलेली वोट बँक अधिक बळकट करून दिली आहे. 

धुळ्यातील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्याला इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक हब बनवण्याची ग्वाही देतानाच गेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या अनुषंगाने 'वोट जिहाद'चा मुद्दा छेडून सावध राहण्याचे आवाहन केले. तोच धागा पकडून पंतप्रधान मोदी यांनी हा 'एक है तो सेफ है' चा नारा दिला, जो या निवडणुकीतील जाहीर प्रचाराच्या प्रारंभातच चर्चित ठरून गेला. धुळ्यानंतरच्या नाशिक येथे झालेल्या जाहीर सभेतही त्याची पुनरुक्ती केली गेल्याचे पाहता त्यातून भाजपाच्या वाटचालीची स्पष्टता होणारी आहे. 

अर्थात, जाहीर प्रचार सभांचा धडाका आताशी सुरू झाला आहे. विविध पक्षांच्या बाजूने आरोप प्रत्यारोपांचे मैदान गाजू लागले आहे. आगामी काळात यात भरच पडण्याची चिन्हे आहेत. खान्देशातील चोपडा, पाचोरा सारख्या जागांवर दोन्ही शिवसेनेत तर जळगाव शहर, चाळीसगाव, धुळे सारख्या ठिकाणी भाजपा व उद्धवसेनेत सामने होत असल्याने तेथे अधिक निकराचा प्रचार दिसतो आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांनी आव्हान उभे करून ठेवले आहे. एरंडोलमध्ये माजी खासदार ए.टी. पाटील यांनी बंड कायम ठेवले असून, नंदुरबार जिल्ह्यात मंत्री असलेले वडील विजयकुमार गावित भाजपाची उमेदवारी करत असताना त्यांच्या कन्या माजी खासदार हिना गावित यांनी अक्कलकुवामधून अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे अधिकृत पक्षीय उमेदवारांची अडचण झाली आहे. दुसरीकडे जागोजागच्या पोलिसांच्या तपासणीत लाखोंची बंडले हाती लागत आहेत. त्यामुळे मतदानाला राहिलेल्या दहा दिवसात प्रचार व स्पर्धा कोणत्या टोकाला पोहोचते हे बघणे औत्सुक्याचे ठरले आहे. 

सारांशात, पंतप्रधान मोदी यांच्या सभेने खानदेशातील जाहीर प्रचारसभा सुरू झाल्या असून, यापुढील काळातही विविध मान्यवरांच्या तोफा धडाडणार आहेत. यातून मतदारांचे मतनिर्धारण व्हावे व मतदानाचा टक्का वाढावा हीच अपेक्षा.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalgaonजळगावDhuleधुळेnandurbar-acनंदुरबार