शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

खाकीतील नराधम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:29 AM

खाकी वर्दीवाले पूर्वीसारखा दरारा अथवा आदर केव्हाच गमावून बसले आहेत. हप्तावसुली, गुन्हेगारांना संरक्षण, सर्वसामान्यांना विनाकारण वेठीस धरणे हे प्रकार पोलिसांकडून सर्रास सुरु आहेत

खाकी वर्दीवाले पूर्वीसारखा दरारा अथवा आदर केव्हाच गमावून बसले आहेत. हप्तावसुली, गुन्हेगारांना संरक्षण, सर्वसामान्यांना विनाकारण वेठीस धरणे हे प्रकार पोलिसांकडून सर्रास सुरु आहेत. भ्रष्टाचारात तर हा विभाग राज्यात अव्वल आहे. काही लोकांच्या या प्रतापांमुळे आधीच बदनाम झालेल्या पोलीस खात्याची अब्रू पुरती चव्हाट्यावर आणण्याचे काम नागपुरातील एका पोलीस शिपायाने केले आहे. या नराधमाने पिस्तुलाच्या धाकावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा चीड आणणारा आणि तेवढाच लज्जास्पद प्रकार नागपुरातील सोनेगाव येथे उघडकीस आला आहे. पोलिसाची वर्दी घातली की आम्हाला कुठेही, काहीही करण्याचा, कसेही वागण्याचा जणू परवानाच मिळाला आहे, अशा अविर्भावात पोलीस खात्यातील काही लोक समाजात वावरत असतात. भररस्त्यावर दारु पिऊन धिंगाणा घालणे, चौकाचौकात अड्डे जमवून वाहनचालकांना वेठीस धरणे या गोष्टी आता नव्या राहिलेल्या नाहीत. कालपरवा तर एका पोलीस कॉन्स्टेबलने जिल्हा न्यायालयातील एका अधिकाºयालाच मारहाण केली. आपण समाजाचे रक्षक आहोत भक्षक नाही याचेही भान त्यांना बरेचदा राहात नाही,अशी परिस्थिती आहे. ही एकप्रकारची पोलिसी गुंडागर्दीच म्हणायला हवी. एका असहाय महिलेस पिस्तुलाचा धाक दाखवून, तिच्या बाळाला मारण्याची धमकी देऊन बळजबरी करण्याचे धाडस एक पोलीस शिपाई करतोच कसा? त्याच्यावर कुणाचाच वचक नाही काय? की पोलीस खात्यात आता असा वचक ठेवणारे अधिकारीच राहिले नाहीत. अशा नराधमास मग तो पोलीस असला तरी कठोर शिक्षा व्हायलाच हवी. सर्वसामान्य लोक पोलीस ठाण्यात जायला आधीच घाबरतात आणि अशा घटनांमुळे त्यांची ही भीती आणखी वाढते. एकीकडे शासनातर्फे पोलीस जनतेचा मित्र असल्याची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात असतात. विशेषत: महिलांना पोलीस ठाणे म्हणजे आपले माहेर वाटावे या दृष्टीने त्यांच्या मदतीकरिता वेळोवेळी कार्यपद्धतीत योग्य ते बदल तसेच सुधारणा केल्या जातात. पण असे बेपर्वा पोलीसवाले शासनाच्या या प्रयत्नांवर पाणी फेरतात. त्यामुळे खाकी वर्दीतील या गुन्हेगारांना कोण लगाम घालणार असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. खरे तर पोलिसांमधील ही वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. यासाठी वेळप्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यासही हरकत नाही. आपण जनतेचे रक्षक आहोत ही भावना प्रत्येक पोलिसाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.

टॅग्स :Policeपोलिस