शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

‘भूषण’चा खो खो

By admin | Updated: August 17, 2015 23:12 IST

शिवशाहीर (इतिहास संशोधक नव्हे) ब.मो.पुरंदरे यांना राज्य सरकारतर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा खो खो सुरु झाला असावा, असे दिसते.

शिवशाहीर (इतिहास संशोधक नव्हे) ब.मो.पुरंदरे यांना राज्य सरकारतर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा खो खो सुरु झाला असावा, असे दिसते. सरकारच्या निर्णयाला सर्वात आधी कडाडून आणि आगजाळ विरोध केला राष्ट्रवादीचे नेते जितेन्द्र आव्हाड यांनी. त्या समयी त्यांचे शीर्षस्थ नेते शरद पवार यांनीही आव्हाडांची कड घेतली होती. पण परवा त्याच पक्षाचे उप-शीर्षस्थ नेते अजित पवार यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडताना, आव्हाडांचे मत हे त्यांचे व्यक्तिगत मत असून त्या मताशी पक्षाचा काहीही संबंध नाही असे जाहीर करुन टाकले. पण केवळ तिथेच न थांबता, पुरस्कार राज्य सरकार देत असल्याने, तो कोणाला द्यायचा वा कोणाला नाकारायचा, याचा अधिकार पूर्णपणे सरकारचा असल्याचे सांगून किमान त्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या बाजूने या वादावर पडदा टाकला. पण आता अजित पवारांनी सोडून दिलेला मुद्दा हाती धरुन काही साहित्यिक आणि समाजसेवक यांनी पुरंदरेंना जाहीर केलेला पुरस्कार रद्द करावा, अशी मागणी करुन खो खोचा खेळ पुढे नेला आहे. याचा अर्थ सरकारने असे पुरस्कार देण्याला आणि तथाकथित मान्यवरांनी त्यांचा स्वीकार करायला यांची काही हरकत नाही, असे दिसते. त्यांनी जर सरकारी पुरस्कारांचे थोतांडच बंद करुन टाका, अशी मागणी केली असती तर बात निराळी होती. कारण मुळात पूर्वीच्या काळात सरंजामदारांनी विविध कलांमधील कलावंतांना पुरस्कृत वा उपकृत करुन आपल्या पदरी बाळगण्याची जी पद्धत होती, तीच पद्धत म्हणजे तो सरंजामशाही वृत्तीचा अंश सरकारी पुरस्कारांमध्ये उतरलेला असतो आणि लोकशाहीत ते बसत नाही, यासाठी पुरस्कारच नकोत, अशी टोकेरी भूमिका घेणारेही काही साहित्यिक, कलावंत आणि समाजसेवक आहेत. परिणामी या श्रेणीतील लोक ना पुरस्कार मिळविण्याच्या भानगडीत पडत ना त्यासाठी कोणाची हाँजी हाँजी करत. सरकार कोणतेही असो आणि कोणाचेही असो, ओशाळेपण प्रदान करताना, आपला आणि परका हा भेदभाव होतच असतो. केवळ पुरस्कारच कशाला, विविध सरकारी समित्या आणि अगदी कुलगुरुपदापर्यंच्या प्रतिष्ठित पदांपर्यंत हा आपपरभाव होतच असतो आणि ‘तळे राखील, तोच पाणी चाखील’ असा तात्त्विक मलामादेखील दिला जातो. काही वर्षांपूर्वी शरद पवार यांनी राज्यातल्या विविध क्षेत्रातील लोकाना रातोरात लक्षाधीश करुन टाकले होते. ‘पवारांचा रमणा’ असे यथार्थ नामाभिधान त्यास प्रदानही केले गेले होते. अत्यंत घाऊक पद्धतीने दिल्या गेलेल्या त्या ‘पुरस्कारां’बाबत मात्र कुणी ब्रदेखील उच्चारला नव्हता. भूमिका वस्तुनिष्ठ असावी, व्यक्तिनिष्ठ नव्हे!