शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

‘भूषण’चा खो खो

By admin | Updated: August 17, 2015 23:12 IST

शिवशाहीर (इतिहास संशोधक नव्हे) ब.मो.पुरंदरे यांना राज्य सरकारतर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा खो खो सुरु झाला असावा, असे दिसते.

शिवशाहीर (इतिहास संशोधक नव्हे) ब.मो.पुरंदरे यांना राज्य सरकारतर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा खो खो सुरु झाला असावा, असे दिसते. सरकारच्या निर्णयाला सर्वात आधी कडाडून आणि आगजाळ विरोध केला राष्ट्रवादीचे नेते जितेन्द्र आव्हाड यांनी. त्या समयी त्यांचे शीर्षस्थ नेते शरद पवार यांनीही आव्हाडांची कड घेतली होती. पण परवा त्याच पक्षाचे उप-शीर्षस्थ नेते अजित पवार यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडताना, आव्हाडांचे मत हे त्यांचे व्यक्तिगत मत असून त्या मताशी पक्षाचा काहीही संबंध नाही असे जाहीर करुन टाकले. पण केवळ तिथेच न थांबता, पुरस्कार राज्य सरकार देत असल्याने, तो कोणाला द्यायचा वा कोणाला नाकारायचा, याचा अधिकार पूर्णपणे सरकारचा असल्याचे सांगून किमान त्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या बाजूने या वादावर पडदा टाकला. पण आता अजित पवारांनी सोडून दिलेला मुद्दा हाती धरुन काही साहित्यिक आणि समाजसेवक यांनी पुरंदरेंना जाहीर केलेला पुरस्कार रद्द करावा, अशी मागणी करुन खो खोचा खेळ पुढे नेला आहे. याचा अर्थ सरकारने असे पुरस्कार देण्याला आणि तथाकथित मान्यवरांनी त्यांचा स्वीकार करायला यांची काही हरकत नाही, असे दिसते. त्यांनी जर सरकारी पुरस्कारांचे थोतांडच बंद करुन टाका, अशी मागणी केली असती तर बात निराळी होती. कारण मुळात पूर्वीच्या काळात सरंजामदारांनी विविध कलांमधील कलावंतांना पुरस्कृत वा उपकृत करुन आपल्या पदरी बाळगण्याची जी पद्धत होती, तीच पद्धत म्हणजे तो सरंजामशाही वृत्तीचा अंश सरकारी पुरस्कारांमध्ये उतरलेला असतो आणि लोकशाहीत ते बसत नाही, यासाठी पुरस्कारच नकोत, अशी टोकेरी भूमिका घेणारेही काही साहित्यिक, कलावंत आणि समाजसेवक आहेत. परिणामी या श्रेणीतील लोक ना पुरस्कार मिळविण्याच्या भानगडीत पडत ना त्यासाठी कोणाची हाँजी हाँजी करत. सरकार कोणतेही असो आणि कोणाचेही असो, ओशाळेपण प्रदान करताना, आपला आणि परका हा भेदभाव होतच असतो. केवळ पुरस्कारच कशाला, विविध सरकारी समित्या आणि अगदी कुलगुरुपदापर्यंच्या प्रतिष्ठित पदांपर्यंत हा आपपरभाव होतच असतो आणि ‘तळे राखील, तोच पाणी चाखील’ असा तात्त्विक मलामादेखील दिला जातो. काही वर्षांपूर्वी शरद पवार यांनी राज्यातल्या विविध क्षेत्रातील लोकाना रातोरात लक्षाधीश करुन टाकले होते. ‘पवारांचा रमणा’ असे यथार्थ नामाभिधान त्यास प्रदानही केले गेले होते. अत्यंत घाऊक पद्धतीने दिल्या गेलेल्या त्या ‘पुरस्कारां’बाबत मात्र कुणी ब्रदेखील उच्चारला नव्हता. भूमिका वस्तुनिष्ठ असावी, व्यक्तिनिष्ठ नव्हे!