शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

आजचा अग्रलेख - कंगनाच्या शापाने गांधी कसा मरेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 08:13 IST

अंगावर पंचा, हातात काठी अशा वेशातल्या महात्म्याच्या पाठीशी कोटीकोटींच्या संख्येने उभ्या राहणाऱ्या सामान्य भारतीयांचे सामूहिक शहाणपण सिनेमातील फालतूपणाच्या पातळीवर अजूनतरी गेलेले नाही, याबद्दल नि:शंक असावे.

ठळक मुद्देदेशात एक कंपू गेली शंभर वर्षे हेच करत आला आहे. सोबतच काही गंभीर मुद्यांवर बुद्धिभेद करून गांधींबद्दल द्वेष निर्माण करण्यात आला. त्याच द्वेषाची परिणती वृद्ध महात्म्याच्या हत्येत झाली.

भारताला १९४७ मध्ये मिळाली ती भीक होती. २०१४ मध्ये खरे स्वातंत्र्य मिळाले, अशा स्वरूपाच्या अभिनेत्री कंगना रानौतच्या बेताल बडबडीकडे साऱ्या शहाण्या माणसांनी दुर्लक्षच केले. समाजातील सोडा, तिचे दस्तुर सिनेमासृष्टीतील स्थान लक्षात घेता केवळ पद्मश्री मिळाली म्हणून तिच्या बोलण्याची दखल घ्यावी, असेही नव्हते. त्यामुळे बाईसाहेब आणखी चेकाळल्या. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असतानाही आपला २०१४ च्या स्वातंत्र्याचा मुद्दा कसा योग्य होता हे पटविताना त्या महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वाची खिल्ली उडवायला लागल्या आहेत. एक गाल पुढे करून स्वातंत्र्य मिळत नाही, हे नट्टापट्टा करताना स्वत:चेच गाल रंगविणाऱ्यांनी, लेखक- दिग्दर्शकांच्या सांगण्यानुसार डायलॉग उच्चारणाऱ्यांनी देशाला सांगावे, यापेक्षा मोठा विनोद नाही. विक्रम गोखले नावाच्या मराठी नटाने कंगनाचा वेताळ खांद्यावर घेताना धीरगंभीर चेहऱ्याने काहीतरी तत्त्वज्ञान मांडतो आहोत, असा आव आणला व हे गोखले पितृस्थानी असल्याने ते काहीतरी विचार करूनच बोलले असतील, असे अवधूत गुप्ते नावाचे आणखी एक थोर वगैरे गायक, संगीतकार बोलले असले तरी ही सगळी मंडळी कुणाला खूश करण्यासाठी सत्य इतिहासाचे विडंबन करताहेत, हे साऱ्यांनाच माहिती आहे.

अंगावर पंचा, हातात काठी अशा वेशातल्या महात्म्याच्या पाठीशी कोटीकोटींच्या संख्येने उभ्या राहणाऱ्या सामान्य भारतीयांचे सामूहिक शहाणपण सिनेमातील फालतूपणाच्या पातळीवर अजूनतरी गेलेले नाही, याबद्दल नि:शंक असावे. हे सारे पाहून एक प्रश्न वारंवार अनेकांना पडतो - तो म्हणजे स्वत: महात्मा गांधी हयात असते तर कंगना व मंडळींची वक्तव्ये आणि झालेच तर पुतळ्यावर गोळ्या झाडून जयंती साजरी करणाऱ्या किड्यांबद्दल गांधींची प्रतिक्रिया काय असती? ज्या महात्म्याने आयुष्यात टीकाकारांचा कधीच प्रतिवाद केला नाही, सावरकरांना कधी उत्तर दिले नाही, जिनांचे मुद्दे कधी खोडून काढत बसले नाहीत, इतकेच कशाला नथूराम गोडसेची गोळी आपल्या प्राणाचा वेध घेत असताना त्यालाही हात जोडले, ‘हे राम’ म्हणत जगाचा निरोप घेतला, त्या गांधींनी कंगना किंवा त्यासारख्या इतरांची साधी दखलही घेतली नसती. कुठे तो संपूर्ण सहस्त्रकातील थोर, जगाला वंद्य महात्मा अन् कुठे ही थिल्लर, वाह्यात व अदखलपात्र मंडळी. हे खरे आहे, की कंगना रानौत एकटी नाही. भारतीय जनमानसातील गांधींना मारण्याचा हा पहिला प्रयत्नही नाही. गांधींबद्दलच्या अशा कुचाळक्या, टिंगलटवाळी, कुजबुज, नको नको त्या विषयांवरचे विनोद यामागे पुन्हा पुन्हा त्यांच्या चारित्र्याची हत्या करणे हाच हेतू असतो.

देशात एक कंपू गेली शंभर वर्षे हेच करत आला आहे. सोबतच काही गंभीर मुद्यांवर बुद्धिभेद करून गांधींबद्दल द्वेष निर्माण करण्यात आला. त्याच द्वेषाची परिणती वृद्ध महात्म्याच्या हत्येत झाली. प्रत्यक्षात ज्या सत्य व अहिंसेच्या तत्त्वाचा महात्मा गांधींनी आयुष्यभर पुरस्कार केला, ते तत्त्व दुबळ्यांचे नव्हतेच मुळी. अहिंसा बलवानांनाच शोभते, ही त्या तत्त्वाच्या अंगीकाराची आद्य अट होती. म्हणूनच ज्यांच्या साम्राज्यावर कधीकाळी सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटिश महासत्तेला अहिंसेपुढे नमते घ्यावे लागले. सतत सत्याची कास, हिंसेचा स्पर्श होताच दोन पावले मागे येण्याची तयारी यामुळे गांधींची नैतिक ताकद, अधिष्ठान हिमालयाहून अधिक उंचीचे होते. अहिंसेचे तत्त्व भगवान बुद्ध, भगवान महावीर अशा धर्मसंस्थापकांच्या मुशीतून भारतीय भूमीवर शेकडो वर्षे आधी तावून सुलाखून निघालेले होते. महात्मा गांधींनी आधी दक्षिण आफ्रिकेत व नंतर भारतात समकालीन संदर्भांसह त्याचा अवलंब केला. महासत्तेविरुद्ध थेट लढा दुबळ्या भारतीयांना पेलवणार नाही, रक्तपात होईल, पिढ्या नष्ट होतील, हे ओळखून त्यांनी अहिंसा, असहकार अशी आयुधे निवडली. जोडीला क्रांतिकारकही सक्रिय होते. या सगळ्यांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. या प्रक्रियेत अनेकजण ब्रिटिशधार्जिणे होतेच. हीच मंडळी कधी पंडित नेहरू, कधी महात्मा गांधींचे चारित्र्यहनन करीत आली. त्यासाठी कधी सरदार पटेल, कधी सुभाषबाबूंना खांद्यावर घेत आली. दरवेळी लोक संतापतात. परंतु लायकी नसणाऱ्यांना पुरस्कार देऊन प्रतिष्ठा वाढविणारे मात्र गप्प राहतात. वाह्यातपणा थांबविण्याचा प्रयत्न करीत नाहीत. कंगनाच्या शापाने गांधी मरणार नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जे सुरू आहे ते मात्र नक्कीच उद्विग्न करणारे आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतMahatma Gandhiमहात्मा गांधी