शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

आजचा अग्रलेख - कंगनाच्या शापाने गांधी कसा मरेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 08:13 IST

अंगावर पंचा, हातात काठी अशा वेशातल्या महात्म्याच्या पाठीशी कोटीकोटींच्या संख्येने उभ्या राहणाऱ्या सामान्य भारतीयांचे सामूहिक शहाणपण सिनेमातील फालतूपणाच्या पातळीवर अजूनतरी गेलेले नाही, याबद्दल नि:शंक असावे.

ठळक मुद्देदेशात एक कंपू गेली शंभर वर्षे हेच करत आला आहे. सोबतच काही गंभीर मुद्यांवर बुद्धिभेद करून गांधींबद्दल द्वेष निर्माण करण्यात आला. त्याच द्वेषाची परिणती वृद्ध महात्म्याच्या हत्येत झाली.

भारताला १९४७ मध्ये मिळाली ती भीक होती. २०१४ मध्ये खरे स्वातंत्र्य मिळाले, अशा स्वरूपाच्या अभिनेत्री कंगना रानौतच्या बेताल बडबडीकडे साऱ्या शहाण्या माणसांनी दुर्लक्षच केले. समाजातील सोडा, तिचे दस्तुर सिनेमासृष्टीतील स्थान लक्षात घेता केवळ पद्मश्री मिळाली म्हणून तिच्या बोलण्याची दखल घ्यावी, असेही नव्हते. त्यामुळे बाईसाहेब आणखी चेकाळल्या. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असतानाही आपला २०१४ च्या स्वातंत्र्याचा मुद्दा कसा योग्य होता हे पटविताना त्या महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वाची खिल्ली उडवायला लागल्या आहेत. एक गाल पुढे करून स्वातंत्र्य मिळत नाही, हे नट्टापट्टा करताना स्वत:चेच गाल रंगविणाऱ्यांनी, लेखक- दिग्दर्शकांच्या सांगण्यानुसार डायलॉग उच्चारणाऱ्यांनी देशाला सांगावे, यापेक्षा मोठा विनोद नाही. विक्रम गोखले नावाच्या मराठी नटाने कंगनाचा वेताळ खांद्यावर घेताना धीरगंभीर चेहऱ्याने काहीतरी तत्त्वज्ञान मांडतो आहोत, असा आव आणला व हे गोखले पितृस्थानी असल्याने ते काहीतरी विचार करूनच बोलले असतील, असे अवधूत गुप्ते नावाचे आणखी एक थोर वगैरे गायक, संगीतकार बोलले असले तरी ही सगळी मंडळी कुणाला खूश करण्यासाठी सत्य इतिहासाचे विडंबन करताहेत, हे साऱ्यांनाच माहिती आहे.

अंगावर पंचा, हातात काठी अशा वेशातल्या महात्म्याच्या पाठीशी कोटीकोटींच्या संख्येने उभ्या राहणाऱ्या सामान्य भारतीयांचे सामूहिक शहाणपण सिनेमातील फालतूपणाच्या पातळीवर अजूनतरी गेलेले नाही, याबद्दल नि:शंक असावे. हे सारे पाहून एक प्रश्न वारंवार अनेकांना पडतो - तो म्हणजे स्वत: महात्मा गांधी हयात असते तर कंगना व मंडळींची वक्तव्ये आणि झालेच तर पुतळ्यावर गोळ्या झाडून जयंती साजरी करणाऱ्या किड्यांबद्दल गांधींची प्रतिक्रिया काय असती? ज्या महात्म्याने आयुष्यात टीकाकारांचा कधीच प्रतिवाद केला नाही, सावरकरांना कधी उत्तर दिले नाही, जिनांचे मुद्दे कधी खोडून काढत बसले नाहीत, इतकेच कशाला नथूराम गोडसेची गोळी आपल्या प्राणाचा वेध घेत असताना त्यालाही हात जोडले, ‘हे राम’ म्हणत जगाचा निरोप घेतला, त्या गांधींनी कंगना किंवा त्यासारख्या इतरांची साधी दखलही घेतली नसती. कुठे तो संपूर्ण सहस्त्रकातील थोर, जगाला वंद्य महात्मा अन् कुठे ही थिल्लर, वाह्यात व अदखलपात्र मंडळी. हे खरे आहे, की कंगना रानौत एकटी नाही. भारतीय जनमानसातील गांधींना मारण्याचा हा पहिला प्रयत्नही नाही. गांधींबद्दलच्या अशा कुचाळक्या, टिंगलटवाळी, कुजबुज, नको नको त्या विषयांवरचे विनोद यामागे पुन्हा पुन्हा त्यांच्या चारित्र्याची हत्या करणे हाच हेतू असतो.

देशात एक कंपू गेली शंभर वर्षे हेच करत आला आहे. सोबतच काही गंभीर मुद्यांवर बुद्धिभेद करून गांधींबद्दल द्वेष निर्माण करण्यात आला. त्याच द्वेषाची परिणती वृद्ध महात्म्याच्या हत्येत झाली. प्रत्यक्षात ज्या सत्य व अहिंसेच्या तत्त्वाचा महात्मा गांधींनी आयुष्यभर पुरस्कार केला, ते तत्त्व दुबळ्यांचे नव्हतेच मुळी. अहिंसा बलवानांनाच शोभते, ही त्या तत्त्वाच्या अंगीकाराची आद्य अट होती. म्हणूनच ज्यांच्या साम्राज्यावर कधीकाळी सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटिश महासत्तेला अहिंसेपुढे नमते घ्यावे लागले. सतत सत्याची कास, हिंसेचा स्पर्श होताच दोन पावले मागे येण्याची तयारी यामुळे गांधींची नैतिक ताकद, अधिष्ठान हिमालयाहून अधिक उंचीचे होते. अहिंसेचे तत्त्व भगवान बुद्ध, भगवान महावीर अशा धर्मसंस्थापकांच्या मुशीतून भारतीय भूमीवर शेकडो वर्षे आधी तावून सुलाखून निघालेले होते. महात्मा गांधींनी आधी दक्षिण आफ्रिकेत व नंतर भारतात समकालीन संदर्भांसह त्याचा अवलंब केला. महासत्तेविरुद्ध थेट लढा दुबळ्या भारतीयांना पेलवणार नाही, रक्तपात होईल, पिढ्या नष्ट होतील, हे ओळखून त्यांनी अहिंसा, असहकार अशी आयुधे निवडली. जोडीला क्रांतिकारकही सक्रिय होते. या सगळ्यांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. या प्रक्रियेत अनेकजण ब्रिटिशधार्जिणे होतेच. हीच मंडळी कधी पंडित नेहरू, कधी महात्मा गांधींचे चारित्र्यहनन करीत आली. त्यासाठी कधी सरदार पटेल, कधी सुभाषबाबूंना खांद्यावर घेत आली. दरवेळी लोक संतापतात. परंतु लायकी नसणाऱ्यांना पुरस्कार देऊन प्रतिष्ठा वाढविणारे मात्र गप्प राहतात. वाह्यातपणा थांबविण्याचा प्रयत्न करीत नाहीत. कंगनाच्या शापाने गांधी मरणार नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जे सुरू आहे ते मात्र नक्कीच उद्विग्न करणारे आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतMahatma Gandhiमहात्मा गांधी