शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

लोकमत संपादकीय - प्रदूषणाची राजधानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 05:23 IST

केंद्र व राज्य सरकार यांना न्यायालय फटकारत आहे. पण थंडीचा मोसम संपला की प्रदूषणाच्या प्रश्नाकडे दोन्ही सरकारे दुर्लक्ष करीत आहेत. दिल्ली ही प्रदूषणाची राजधानीच बनली आहे

एक काळ असा होता की, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात लोक दिल्लीच्या थंड हवेचा आनंद लुटत. मुद्दाम दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देत. पण गेल्या काही वर्षांत थंडीचे हे चार महिने दिल्लीकरांना नको नकोसे वाटू लागले आहेत, या थंडीच्या महिन्यांत त्यांचा श्वास कोंडू लागला आहे. थंडीमध्ये कोणी आजारी पडत नाही, दवाखाने ओस पडतात, असे पूर्वी दिल्लीत बोलले जात असे. पण आता थंडी सुरू होताच दिल्लीत श्वास घेणे अवघड होत चालले आहे, दम्याचा त्रास असलेल्यांचे तर हालच आहेत. गेल्या दोन आठवड्यांत श्वसनाच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि रुग्णालये, दवाखान्यांत गर्दी वाढत चालली आहे. याचे कारण थंडीमध्ये दिल्ली व परिसरात होणारे प्रदूषण. गेल्या सहा सात वर्षांत या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून, दरवर्षी सर्वोच्च न्यायालयाला त्यात लक्ष घालावे लागत आहे.

केंद्र व राज्य सरकार यांना न्यायालय फटकारत आहे. पण थंडीचा मोसम संपला की प्रदूषणाच्या प्रश्नाकडे दोन्ही सरकारे दुर्लक्ष करीत आहेत. दिल्ली ही प्रदूषणाची राजधानीच बनली आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. यावरून तेथील स्थितीचा अंदाज यावा. यंदा प्रदूषणामुळे दिल्लीच्या शाळांना एक आठवड्याची सुटी जाहीर करण्यात आली आहे. रस्त्यांवर कमीत कमी वाहने यावीत म्हणून, सरकारी खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांनी घरातून बाहेर पडू नये, सकाळी फिरायला, संध्याकाळी खेळायला जायचे टाळावे, घराच्या दारे व खिडक्या बंद कराव्यात, बाहेर पडायची वेळ आली तर मास्क लावावा, असा सल्ला सरकारने दिला आहे. शेजारच्या पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश या राज्यांनीही याचे अनुकरण करावे, असा दिल्ली सरकारचा आग्रह आहे. या प्रदूषणाची कारणे सर्वज्ञात आहेत. थंडीमध्ये उन्ह नसते आणि वारे पडत असल्याने हवेतील प्रदूषित घटक खालीच राहतात. त्याचा सर्वाधिक फटका दिल्लीत बसतो, याची अनेक कारणे आहेत. एक तर वाहनांची संख्या दिल्लीत प्रचंड आहे. त्यांची इंजिने प्रदूषित घटक सतत बाहेर फेकत राहतात. दुसरे कारण म्हणजे मोठ्या शहरांत सतत सुरू असणारी बांधकामे. दिल्ली त्याला अपवाद नाही. सध्या तर सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळेही प्रदूषणात भर पडत आहे. तिसरे कारण म्हणजे या काळात दिल्ली व शेजारच्या राज्यांतील शेतकरी जाळत असलेला कृषी कचरा. या सर्वांमुळे दिल्लीकरांचा अक्षरशः कोंडमारा होत आहे. त्यामुळेच काही काळ बांधकामे थांबवा, रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांची संख्या मर्यादित राहील, याची काळजी घ्या, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून, याची अंमलबजावणी कशी करता येईल, प्रदूषण कमी कसे करता येईल, याबाबत उपाययोजना करा, असेही न्यायालयाने सांगितले आहे. श्वसनाच्या आजारांमुळे लोकांचे जीव जात असताना सरकारांचे एकमेकांवर जबाबदारी ढकलणे सुरू आहे.

पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशातील शेतकरी जो कृषी कचरा जाळतात, त्यामुळे फार प्रदूषण होत नाही, असा दावा केंद्र सरकारने यंदा प्रथमच न्यायालयात केला आहे. त्यावर पंजाब व उत्तर प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्याने आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना राग कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ही भूमिका घेतल्याचा आरोप केजरीवाल सरकारने केला आहे. याउलट केजरीवाल सरकार सातत्याने प्रदूषणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याची भाजपची टीका आहे. काय खाेटे, काय खरे कोणास ठावे; पण दरवर्षी प्रदूषणात वाढ होत आहे आणि त्यामुळे लोकांचे जीव जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. देशात दिल्ली शहर प्रदूषणाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असले तरी कोलकाता चौथ्या व मुंबई सहाव्या स्थानी आहे. म्हणजे राजधानी दिल्ली जात्यात आहे, तर कोलकाता, मुंबई सुपामध्ये आहेत. दिल्लीसारखी स्थिती या शहरांत यायला वेळ लागणार नाही. याशिवाय देशातील असंख्य लहान शहरांत प्रदूषण वाढत चालले आहे. जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणारे हवामान बदल यांचा फटका पावसाळ्यामध्ये बसू लागला आहे. उष्णतेच्या लाटांमुळेही मृत्यू वाढत असून, थंडीत जीव जाण्याची वेळ आली आहे. तापमानातील बदल आणि प्रदूषण यांकडे आता धोक्याची घंंटा म्हणूनच पहायलाच हवे.

टॅग्स :delhiदिल्लीNCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्रpollutionप्रदूषण