शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: ३० सप्टेंबरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, सरकारने लेखी दिले: मनोज जरांगे पाटील
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
5
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
6
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
7
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
8
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
9
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
10
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
11
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
12
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
13
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
14
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
15
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
16
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
17
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
18
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
19
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
20
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पुन्हा मोदी...अखेर कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 03:59 IST

मोदी सरकारची पीक विमा योजना अद्भुत होती, मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये विम्याचे कव्हरेज ३० हून २४ टक्क्यांवर आले. एक चांगली योजना जन्मत:च आजारी होण्याचे कारण राज्य सरकारची उदासीनता हे होते.

- एन. के. सिंग(वरिष्ठ पत्रकार)निकाल धक्कादायक आहेत. मोदी विरोधाचे दुकान चालविणारे पत्रकार आणि विश्लेषकांचे सोडा, निरपेक्ष भावनेने तथ्यांचे आकलन करणाऱ्या छोट्या वर्गासाठीही. क्वचितच कुणी असेल जो २०१९ च्या निवडणूक निकालाच्या जवळपास राहिला असावा. आम्हाला जनतेला ओळखता आले नाही. ‘जनता-मोदी बाँड’ पाहू शकलो नाही. त्यामुळे आम्हाला व्यावसायिक कौशल्य आणखी वाढवावे लागेल.देशाने नरेंद्र मोदींना सरकार चालविण्याची आणखी एक संधी दिली आहे. आमच्या टीकेला तिरस्कृत करून. केवळ ‘चौकीदार चोर है’चा नारा देणाराच नव्हे तर आम्ही आणि आमची समजूतही पराभूत झाली आहे. राफेल व्यवहारात मोदींच्या वैयक्तिक शूचितेच्या प्रतिमेवर दूरवर कोणताही परिणाम होईल, असे कोणतेही तथ्य राहुल गांधी यांना देता आले नाही. आम्ही निरपेक्ष विश्लेषक होण्याचा दावा करीत असलो तर असा विश्वास बाळगण्याची चूक कशी झाली? सुमारे १३४ कोटींची लोकसंख्या असलेला देश नेहरू-इंदिरा कुटुंबातील वंशज राहुल गांधी किंवा मायावती, अखिलेश, तेजस्वी किंवा अन्य कुणाकडे २५ लाख कोटींचे बजेट असलेल्या भारताची सत्ता सोपवू इच्छित होता?काँग्रेसने जाहीरनाम्यात प्रत्येक गरिबाला दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मोदी सरकारने दोन-दोन हजार रुपयांचे केवळ दोन हप्ते देऊन त्यांना आपल्या बाजूने कसे ओढले? आपला संदेश पोहोचविण्यासाठी काँग्रेसकडे कटिबद्ध कॅडर नव्हते. संघटनात्मक ढाचाचा अभाव होता. कदाचित राहुल गांधींना ‘आज आहे, उद्या नाही’ या भावनेने राजकारण करण्याची त-हा बदलावी लागेल. निवडणूक प्रचारासाठी दिवस-रात्र एक करणारे ६८ वर्षीय नरेंद्र मोदी केदारनाथच्या गुहेत साधना करण्यासाठी गेले तेव्हा मीडियाने दिवसभर त्यांच्यावर फोकस ठेवला. राहुल गांधी उत्तराखंडच्या एखाद्या गावातील दलिताच्या घरी ‘आध्यात्मिक शांती’साठी दोन दिवस राहिले असते तर मीडियाने त्यांच्यावरही लक्ष केंद्रित केले असते, पण मोदींना जनता आपल्या संस्कृतीच्या निकटस्थ पाहते. राहुल गांधी यांच्याबाबत पाश्चात्त्य संस्कृतीचे लाडके हा भाव आजही कायम आहे. ही भावना संपविण्यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये खूप प्रयत्न केले आहेत.मोदी सरकारची पीक विमा योजना अद्भुत होती, मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये विम्याचे कव्हरेज ३० हून २४ टक्क्यांवर आले. एक चांगली योजना जन्मत:च आजारी होण्याचे कारण राज्य सरकारची उदासीनता हे होते. दहा राज्यांपैकी भाजपशासित आठ राज्यांमध्येच कामगिरी वाईट राहिली. राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचे रिझल्ट कार्ड केंद्र सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यावर निर्भर असावे. अखलाक, पहलू खान, जुनैद मारले गेल्याबद्दल उत्तर देणे हे त्यांचे काम नाही, असे मोदींना त्यांना निक्षून सांगावे लागेल. २०१९ मध्ये मोदी बदललेले अधिक प्रभावी आणि निकाल देणारे प्रमुख सिद्ध होतील, असा विश्वास आहे. तरच आम्हा निरपेक्ष विश्लेषकांना समीक्षा करणे सहजसोपे ठरेल. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९