शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Lok Sabha Election Result 2024 : मायावती : राजकीय शेवटाची सुरुवात?

By रवी टाले | Updated: June 7, 2024 09:35 IST

Lok Sabha Election Result 2024 : यावेळी उत्तर प्रदेशातली हक्काची मतेही मायावतींना मिळाली नाहीत, कारण ऐन निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी घेतलेले अनाकलनीय निर्णय!

- रवी टाले(कार्यकारी संपादक, जळगाव)लोकसभा निवडणूक निकालांनी ज्या नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, त्यामध्ये बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यावेळी त्यांच्या पक्षाला एकही जागा तर जिंकता आली नाहीच; पण मतांची टक्केवारीही चांगलीच घसरली. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाखालोखाल बहुजन समाजवादी पक्षाचा दबदबा होता; परंतु २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितिजावर उदय झाला आणि मायावतींच्या  कारकिर्दीला ग्रहणच लागले.

गत लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाशी युती करून बसपने १० जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र मायावतींनी कोणत्याही पक्षाशी युती करण्यास नकार दिला होता. त्याशिवाय आणखीही बरेच अनाकलनीय निर्णय त्यांनी निवडणुकीदरम्यान घेतले. उमेदवारांची निवड आणि घोषणा यामध्येही बरेच घोळ घातले. राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ४८८ जागा बसपने देशभर लढविल्या; पण पक्ष निवडणूक लढवतोय, असे जाणवलेच नाही. मायावतींनी गतवर्षी त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून भाचा आकाश आनंद याच्या नावाची घोषणा केली होती; पण ऐन लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना मायावतींनी त्याला थेट बेदखलच केले. कधीकाळी गळ्यातील ताईत असलेल्या सतीशचंद्र मिश्रा यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देऊनही प्रचारापासून अलिप्तच ठेवले.

निवडणूक निकालांनंतरही मायावतींचे अनाकलनीय वागणे सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार देऊनही मुस्लिमांची मते मिळाली नाहीत, म्हणून यापुढे त्यांना फारच काळजीपूर्वक उमेदवारी देऊ, अशी धक्कादायक पोस्ट त्यांनी निकालाच्या दुसऱ्याच दिवशी समाजमाध्यमांवर केली. गत लोकसभा निवडणुकीत सप-बसप युतीला उत्तर प्रदेशात मिळालेल्या १५ जागांपैकी दहा जागा एकट्या बसपला मिळाल्या होत्या. तरीही मायावतींनी युती तोडण्याची घोषणा केली. ती युती कायम राहिली असती तर गत कामगिरीच्या बळावर बसपला जागा वाटपात सन्मानजनक वाटा मिळू शकला असता आणि पक्षाचे काही खासदार तरी नक्कीच निवडून आले असते. यावेळीही काँग्रेसने बसपला इंडिया आघाडीत आणण्याचा प्रयत्न केला; पण मायावतींनी त्या प्रस्तावालाही ठाम नकार दिला.

इंडिया आघाडीपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतल्याने बसप ही भारतीय जनता पक्षाची ‘बी टीम’ असल्याच्या आरोपाला बळ मिळाले आणि बसपचा परंपरागत जाटव मतदारही पक्षापासून दूर गेला. परिणामी पक्षाने केवळ जागाच गमावल्या नाहीत, तर मतांच्या टक्केवारीतही पक्ष लक्षणीयरीत्या माघारला. वस्तुतः उत्तर प्रदेशात बसपची हक्काची अशी किमान २० टक्के मते आहेत; पण यावेळी त्याच्या अर्धीही पक्षाला मिळू शकली नाहीत. त्याचा थेट लाभ सप-कॉंग्रेस युती आणि चंद्रशेखर आजाद यांना मिळाला आहे. आजाद लोकसभेत पोहचले आहेत, तर सप आणि कॉंग्रेसच्या जागांमध्ये लक्षणीय भर पडली आहे. बसपची हक्काची दलित मते त्यांच्याकडे वळल्याचा त्यासाठी मोठा हातभार लागला. पोकळी ही गोष्ट केवळ ब्रह्मांडातच असते. इतर कोठेही पोकळी निर्माण झाली, तरी ती अल्पावधीतच भरून निघत असते. बसपला तो अनुभव लोकसभा निवडणुकीत आला आहे. त्यापासून धडा न घेतल्यास मायावतींच्या राजकीय शेवटास सुरुवात होऊ शकते.

टॅग्स :mayawatiमायावतीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल