शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

लोकसभा निवडणूक : मैफिलीची भैरवी, कोणाचा सूर लागणार? हे उद्या स्पष्ट होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 08:33 IST

ही निवडणूक अनेक दृष्टींनी ऐतिहासिक. एकूण अठरावी, तर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ते शताब्दी या अमृतकाळातील पहिली निवडणूक.

भारतीय लोकशाहीतील निवडणुकीची मैफील समेवर पोहोचली आहे. देशातील प्रत्येक प्राैढ मतदाराला सहभागी करून घेणारा महोत्सव समारोपाच्या टप्प्यावर आहे. शनिवारी, अखेरच्या सातव्या टप्प्याचे मतदान पार पडले. सायंकाळी वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोलचे आकडे आणि त्यांवरील चर्चेची रंगीबेरंगी उधळण झाली. कल अनुकूल असल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून आनंद साजरा झाला; तर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले. पण, हे क्षणिक. खरा गुलालाचा रंग उद्या, ४ तारखेला मतमाेजणीने उधळला जाईल. ही निवडणूक अनेक दृष्टींनी ऐतिहासिक. एकूण अठरावी, तर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ते शताब्दी या अमृतकाळातील पहिली निवडणूक.

दोन देदीप्यमान विजयांनंतर तिसऱ्यांदा जनतेकडे काैल मागणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी करतील. तीन वेळा शपथ इतरांनीही घेतली; पण इंदिरा गांधी यांची शपथ सलग नव्हती; तर अटलबिहारी वाजपेयींनी तीन कार्यकाळ पूर्ण केले नाहीत. नेहरू व मोदी यांच्याशी संबंधित आणखी योगायोग असा की, देशाची पहिली निवडणूक ऑक्टोबर १९५१ ते फेब्रुवारी १९५२ अशी चालली होती आणि २०२४ च्या निवडणुकीने दुसरा प्रदीर्घ असा तब्बल ८३ दिवसांचा कालावधी घेतला. सर्वाधिक ८० जागांच्या उत्तर प्रदेशसोबत बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सर्व सातही टप्प्यांमध्ये निवडणूक झाली.

महाराष्ट्र व जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्पे झाले. ही इतकी लांबड आवश्यक होती का, हा प्रश्न हा उत्सव संपल्यानंतरही चर्चेत राहील. १६ मार्च रोजी निवडणूक आयोगाने अठराव्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच आंध्र  प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश व सिक्कीम विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतरच्या उण्यापुऱ्या तीन महिन्यांत या उत्सवाचे नानाविध रंग, प्रचाराचा धुरळा, आरोप-प्रत्यारोपांचे जहरी बाण, काही संबद्ध तर काही असंबद्ध मुद्द्यांवरील प्रचार देशाने अनुभवला. मतदारयादीतील नावे गहाळ होणे, मतदान प्रक्रियेतील संथपणा व गोंधळ ते राजकीय पक्षांकडून परस्परविरोधी तक्रारींची दखल घेण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर निवडणूक आयोगावर सतत टीका होत राहिली. सोबतच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ आणि ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ म्हणजे ‘इंडिया’ या विरोधकांच्या आघाडी अशा दोन्ही बाजूंनी मोट बांधली जाण्याचा प्रवास देशाने अनुभवला.

लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ५४० जागा लढविणाऱ्या ‘रालाेआ’मध्ये ४४१ जागा लढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व, तर इंडिया आघाडीतील घडणे-बिघडणे या प्रवासाचे वैशिष्ट्य होते. आघाडीत २८५ व स्वतंत्रपणे ४३ जागा लढविणे, आघाडीतील घटकपक्षांना १८१ जागा देणे, हा १३९ वर्षांची परंपरा असलेल्या देशातील सर्वांत जुन्या काँग्रेस पक्षाचा लवचिकपणा ठळक होता. पं. नेहरूंच्या रांगेत उभे राहू पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ त्यांचा पक्ष किंवा ‘रालोआ’च्याच नव्हे, तर एकूणच निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. भाजपचा जाहीरनामाच मुळी ‘मोदींची गॅरंटी’ या नावाने जारी झाला. त्यातील प्रत्येक आश्वासन, वचनांवर मोदींची छाप होती.

प्रचारातही यत्र, तत्र, सर्वत्र नरेंद्र मोदीच होते. नाही म्हणायला गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराची चर्चा झाली. तथापि, मोदींचा प्रचार, त्यांनी विरोधकांचा घेतलेला समाचार, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर, त्यांचे झंझावाती दौरे, दोनशेच्या वर प्रचारसभा व रोड शो, त्यांची भाषणे हाच माध्यमे तसेच मतदारांमधील चर्चेचा केंद्रबिंदू होता. विरोधकांकडून तितक्या मोठ्या प्रमाणात कुणी नेता केंद्रस्थानी नसला तरी कन्याकुमारी ते काश्मीर अशी दक्षिणोत्तर भारत जोडो यात्रा, नंतर मणिपूर ते मुंबई ही पूर्व-पश्चिम जोडणारी न्याय यात्रा काढणारे, न्यायपत्राच्या माध्यमातून महिला, बेरोजगार, शेतकरी, आदी घटकांना विविध आश्वासने देणारे राहुल गांधी हे गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत बऱ्यापैकी सावरलेले, आक्रमक झालेले यावेळी दिसले.

सोबतच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी मैदान गाजवले. या निमित्ताने भारतीय राजकारण तरुण पिढीच्या हातात जात असल्याचे दिसले. असो. जनतेच्या कल्याणासाठी काय करणार आहोत, हे सत्ताधारी व विरोधकांनी सांगून झाले आहे. ‘गॅरंटी’ की ‘न्याय’ यांतील आवडीनिवडीचा काैल मतदान यंत्रांमध्ये बंद आहे. मंगळवारी यंत्रे उघडतील तेव्हा मैफिलीच्या भैरवीत कोणाचा सूर लागला व कोणासाठी ती बेसूर झाली, हे स्पष्ट होईल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४