शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

विजयासाठी ‘वाट्टेल ते’ घातकच!

By किरण अग्रवाल | Updated: April 11, 2019 08:24 IST

युद्धात व प्रेमात सारे क्षम्य असते असे म्हणतात, त्याप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणातही जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मुभा असल्याचे जणू गृहीतच धरले जाते.

किरण अग्रवालयुद्धात व प्रेमात सारे क्षम्य असते असे म्हणतात, त्याप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणातही जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मुभा असल्याचे जणू गृहीतच धरले जाते. नाही तरी अलीकडे निष्ठा, तत्त्वादी शब्द राजकीय क्षितिजावरून अस्तंगत होऊ पाहात आहेत, त्यामुळे काही बाबी सोडताना नवीन काही अनुसरणे हा कालप्रवाहाचाच भाग ठरावा. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या खासगीतील कमजोरी अगर उणिवा हेरण्यासाठी ‘डिटेक्टिव्ह’ नेमून त्यांच्याद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधिताचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्नही या ‘वाट्टेल ते’ प्रकारात मोडणारेच ठरावेत.विकासाच्या बाबतीत कितपत प्रगती साधली गेली हा वादाचा विषय होऊ शकेल; परंतु निवडणुकीतील प्रचार साधनांत मोठी प्रगती साधली गेल्याचे यंदा प्रकर्षाने दिसून येत आहे. उमेदवार भलेही अंगठेबहाद्दूर असेल, मात्र त्याच्या प्रचारासाठी उभारण्यात आलेल्या ‘वॉररूम’मध्ये तंत्रकुशल तरुणांच्या फौजा तैनात असल्याने जाहीर स्वरूपातील प्रचारापेक्षाही मतदाराच्या हाती असलेल्या मोबाइल फोनपर्यंत पोहचून व्यक्तिगत पातळीवर संपर्काचे प्रभावी फंडे प्रत्येकाकडून राबविले जात आहेत. यात स्वत:चा प्रचार व त्यादृष्टीने आपण केलेली किंवा भविष्यात करावयाच्या कामांची माहिती ‘सोशल मीडिया’द्वारे मतदारांपर्यंत पोहचवतानाच, निवडणूक रिंगणातील आपल्या विरोधकास जेरीस आणणारे मुद्देही ‘फॉरवर्ड’ करण्याला प्राधान्य दिले जात आहे. प्रचार हा तर नंतरचा भाग झाला, परंतु उमेदवारी मिळू न देण्यासाठीही असे ‘फंडे’ सोशली व्हायरल करण्यात आल्याचे दिसून आले आहे. जळगावमधील भाजपचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांची उमेदवारी कापली जाण्यास असेच काहीसे कारण लाभल्याचे लपून राहिलेले नाही. तेव्हा, एकूणच निवडणूक प्रचारात सोशल मीडियाला व त्यावरून केल्या जाणाऱ्या उचित आणि अनुचितही प्रचाराला यंदा मोठेच महत्त्व प्राप्त झाले आहे.यातील अनुचित प्रचारासाठीच्या माहिती संकलनाकरिता काही राजकीय पक्षांनी व उमेदवारांनीही खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीजना काम दिल्याचे या क्षेत्रातील असोसिएशनचे अध्यक्ष कुंवर विक्रमसिंह यांनीच सांगितले आहे. विरोधकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शिवाय अनैतिक संबंध आदी माहिती याद्वारे मिळवून व तिचा प्रचारात वापर करून प्रतिस्पर्ध्याची प्रतिमा डागाळण्याचे काम केले जात असल्याचे पाहता यंदा प्रचारात कोणती पातळी गाठली जाऊ पाहते आहे ते स्पष्ट व्हावे. नीती, नैतिकता वगैरे सब झुठ; दुसऱ्याचे येनकेन प्रकारे खच्चीकरण करून आपल्या विजयाचा मार्ग प्रशस्त करू पाहण्याची ही रणनीती बहुतेकांकडून अवलंबिली जाऊ पाहात असल्याने तिला लाभलेली सर्वमान्यता लक्षात यावी. कुणाच्या खासगी आयुष्याचे असे भांडवलीकरण करणे चुकीचे आहे, नैतिकतेस धरून नाही व कायदेशीरदृष्ट्या वैधतेत मोडणारेही नाही; हे माहीत असूनही तसे करण्याचा प्रयत्न होतो, हे खरे आक्षेपार्ह ठरावे. पण, काळ बदलला तसे प्रचाराचे तंत्र बदलले व त्यात ‘सबकुछ चलता है’ प्रवृत्ती बळावली, त्याचेच हे लक्षण म्हणता यावे.निवडणुका येतील-जातील, जय-पराजयही होत राहतील; मात्र प्रचाराच्या असल्या ‘वाट्टेल त्या’ तंत्रातून कुणाच्या का होईना प्रतिमेवर ओढले जाणारे ओरखडे आणि त्याद्वारे गढुळणारे समाजमन हे चिंतेचाच विषय ठरावे. पण काळ इतका वेगाने पुढे सरकत आहे आणि निवडणुकीच्या रणांगणात यश मिळवण्याकरिता इतकी काही अटीतटीची लढाई चालली आहे की, प्रचारातील योग्य-अयोग्यतेचे भानच कुणाकडून राखले जाताना दिसत नाही. असे भान नसलेल्या व ताळतंत्र सोडून प्रचार करू पाहणाऱ्यांना आपल्या मताधिकाराच्या उपयोगाने ताळ्यावर आणण्याचे काम मतदारांनाच करावे लागणारे आहे.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकPoliticsराजकारण