शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

विजयासाठी ‘वाट्टेल ते’ घातकच!

By किरण अग्रवाल | Updated: April 11, 2019 08:24 IST

युद्धात व प्रेमात सारे क्षम्य असते असे म्हणतात, त्याप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणातही जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मुभा असल्याचे जणू गृहीतच धरले जाते.

किरण अग्रवालयुद्धात व प्रेमात सारे क्षम्य असते असे म्हणतात, त्याप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणातही जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मुभा असल्याचे जणू गृहीतच धरले जाते. नाही तरी अलीकडे निष्ठा, तत्त्वादी शब्द राजकीय क्षितिजावरून अस्तंगत होऊ पाहात आहेत, त्यामुळे काही बाबी सोडताना नवीन काही अनुसरणे हा कालप्रवाहाचाच भाग ठरावा. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या खासगीतील कमजोरी अगर उणिवा हेरण्यासाठी ‘डिटेक्टिव्ह’ नेमून त्यांच्याद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधिताचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्नही या ‘वाट्टेल ते’ प्रकारात मोडणारेच ठरावेत.विकासाच्या बाबतीत कितपत प्रगती साधली गेली हा वादाचा विषय होऊ शकेल; परंतु निवडणुकीतील प्रचार साधनांत मोठी प्रगती साधली गेल्याचे यंदा प्रकर्षाने दिसून येत आहे. उमेदवार भलेही अंगठेबहाद्दूर असेल, मात्र त्याच्या प्रचारासाठी उभारण्यात आलेल्या ‘वॉररूम’मध्ये तंत्रकुशल तरुणांच्या फौजा तैनात असल्याने जाहीर स्वरूपातील प्रचारापेक्षाही मतदाराच्या हाती असलेल्या मोबाइल फोनपर्यंत पोहचून व्यक्तिगत पातळीवर संपर्काचे प्रभावी फंडे प्रत्येकाकडून राबविले जात आहेत. यात स्वत:चा प्रचार व त्यादृष्टीने आपण केलेली किंवा भविष्यात करावयाच्या कामांची माहिती ‘सोशल मीडिया’द्वारे मतदारांपर्यंत पोहचवतानाच, निवडणूक रिंगणातील आपल्या विरोधकास जेरीस आणणारे मुद्देही ‘फॉरवर्ड’ करण्याला प्राधान्य दिले जात आहे. प्रचार हा तर नंतरचा भाग झाला, परंतु उमेदवारी मिळू न देण्यासाठीही असे ‘फंडे’ सोशली व्हायरल करण्यात आल्याचे दिसून आले आहे. जळगावमधील भाजपचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांची उमेदवारी कापली जाण्यास असेच काहीसे कारण लाभल्याचे लपून राहिलेले नाही. तेव्हा, एकूणच निवडणूक प्रचारात सोशल मीडियाला व त्यावरून केल्या जाणाऱ्या उचित आणि अनुचितही प्रचाराला यंदा मोठेच महत्त्व प्राप्त झाले आहे.यातील अनुचित प्रचारासाठीच्या माहिती संकलनाकरिता काही राजकीय पक्षांनी व उमेदवारांनीही खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीजना काम दिल्याचे या क्षेत्रातील असोसिएशनचे अध्यक्ष कुंवर विक्रमसिंह यांनीच सांगितले आहे. विरोधकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शिवाय अनैतिक संबंध आदी माहिती याद्वारे मिळवून व तिचा प्रचारात वापर करून प्रतिस्पर्ध्याची प्रतिमा डागाळण्याचे काम केले जात असल्याचे पाहता यंदा प्रचारात कोणती पातळी गाठली जाऊ पाहते आहे ते स्पष्ट व्हावे. नीती, नैतिकता वगैरे सब झुठ; दुसऱ्याचे येनकेन प्रकारे खच्चीकरण करून आपल्या विजयाचा मार्ग प्रशस्त करू पाहण्याची ही रणनीती बहुतेकांकडून अवलंबिली जाऊ पाहात असल्याने तिला लाभलेली सर्वमान्यता लक्षात यावी. कुणाच्या खासगी आयुष्याचे असे भांडवलीकरण करणे चुकीचे आहे, नैतिकतेस धरून नाही व कायदेशीरदृष्ट्या वैधतेत मोडणारेही नाही; हे माहीत असूनही तसे करण्याचा प्रयत्न होतो, हे खरे आक्षेपार्ह ठरावे. पण, काळ बदलला तसे प्रचाराचे तंत्र बदलले व त्यात ‘सबकुछ चलता है’ प्रवृत्ती बळावली, त्याचेच हे लक्षण म्हणता यावे.निवडणुका येतील-जातील, जय-पराजयही होत राहतील; मात्र प्रचाराच्या असल्या ‘वाट्टेल त्या’ तंत्रातून कुणाच्या का होईना प्रतिमेवर ओढले जाणारे ओरखडे आणि त्याद्वारे गढुळणारे समाजमन हे चिंतेचाच विषय ठरावे. पण काळ इतका वेगाने पुढे सरकत आहे आणि निवडणुकीच्या रणांगणात यश मिळवण्याकरिता इतकी काही अटीतटीची लढाई चालली आहे की, प्रचारातील योग्य-अयोग्यतेचे भानच कुणाकडून राखले जाताना दिसत नाही. असे भान नसलेल्या व ताळतंत्र सोडून प्रचार करू पाहणाऱ्यांना आपल्या मताधिकाराच्या उपयोगाने ताळ्यावर आणण्याचे काम मतदारांनाच करावे लागणारे आहे.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकPoliticsराजकारण