शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

विजयासाठी ‘वाट्टेल ते’ घातकच!

By किरण अग्रवाल | Updated: April 11, 2019 08:24 IST

युद्धात व प्रेमात सारे क्षम्य असते असे म्हणतात, त्याप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणातही जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मुभा असल्याचे जणू गृहीतच धरले जाते.

किरण अग्रवालयुद्धात व प्रेमात सारे क्षम्य असते असे म्हणतात, त्याप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणातही जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मुभा असल्याचे जणू गृहीतच धरले जाते. नाही तरी अलीकडे निष्ठा, तत्त्वादी शब्द राजकीय क्षितिजावरून अस्तंगत होऊ पाहात आहेत, त्यामुळे काही बाबी सोडताना नवीन काही अनुसरणे हा कालप्रवाहाचाच भाग ठरावा. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या खासगीतील कमजोरी अगर उणिवा हेरण्यासाठी ‘डिटेक्टिव्ह’ नेमून त्यांच्याद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधिताचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्नही या ‘वाट्टेल ते’ प्रकारात मोडणारेच ठरावेत.विकासाच्या बाबतीत कितपत प्रगती साधली गेली हा वादाचा विषय होऊ शकेल; परंतु निवडणुकीतील प्रचार साधनांत मोठी प्रगती साधली गेल्याचे यंदा प्रकर्षाने दिसून येत आहे. उमेदवार भलेही अंगठेबहाद्दूर असेल, मात्र त्याच्या प्रचारासाठी उभारण्यात आलेल्या ‘वॉररूम’मध्ये तंत्रकुशल तरुणांच्या फौजा तैनात असल्याने जाहीर स्वरूपातील प्रचारापेक्षाही मतदाराच्या हाती असलेल्या मोबाइल फोनपर्यंत पोहचून व्यक्तिगत पातळीवर संपर्काचे प्रभावी फंडे प्रत्येकाकडून राबविले जात आहेत. यात स्वत:चा प्रचार व त्यादृष्टीने आपण केलेली किंवा भविष्यात करावयाच्या कामांची माहिती ‘सोशल मीडिया’द्वारे मतदारांपर्यंत पोहचवतानाच, निवडणूक रिंगणातील आपल्या विरोधकास जेरीस आणणारे मुद्देही ‘फॉरवर्ड’ करण्याला प्राधान्य दिले जात आहे. प्रचार हा तर नंतरचा भाग झाला, परंतु उमेदवारी मिळू न देण्यासाठीही असे ‘फंडे’ सोशली व्हायरल करण्यात आल्याचे दिसून आले आहे. जळगावमधील भाजपचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांची उमेदवारी कापली जाण्यास असेच काहीसे कारण लाभल्याचे लपून राहिलेले नाही. तेव्हा, एकूणच निवडणूक प्रचारात सोशल मीडियाला व त्यावरून केल्या जाणाऱ्या उचित आणि अनुचितही प्रचाराला यंदा मोठेच महत्त्व प्राप्त झाले आहे.यातील अनुचित प्रचारासाठीच्या माहिती संकलनाकरिता काही राजकीय पक्षांनी व उमेदवारांनीही खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीजना काम दिल्याचे या क्षेत्रातील असोसिएशनचे अध्यक्ष कुंवर विक्रमसिंह यांनीच सांगितले आहे. विरोधकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शिवाय अनैतिक संबंध आदी माहिती याद्वारे मिळवून व तिचा प्रचारात वापर करून प्रतिस्पर्ध्याची प्रतिमा डागाळण्याचे काम केले जात असल्याचे पाहता यंदा प्रचारात कोणती पातळी गाठली जाऊ पाहते आहे ते स्पष्ट व्हावे. नीती, नैतिकता वगैरे सब झुठ; दुसऱ्याचे येनकेन प्रकारे खच्चीकरण करून आपल्या विजयाचा मार्ग प्रशस्त करू पाहण्याची ही रणनीती बहुतेकांकडून अवलंबिली जाऊ पाहात असल्याने तिला लाभलेली सर्वमान्यता लक्षात यावी. कुणाच्या खासगी आयुष्याचे असे भांडवलीकरण करणे चुकीचे आहे, नैतिकतेस धरून नाही व कायदेशीरदृष्ट्या वैधतेत मोडणारेही नाही; हे माहीत असूनही तसे करण्याचा प्रयत्न होतो, हे खरे आक्षेपार्ह ठरावे. पण, काळ बदलला तसे प्रचाराचे तंत्र बदलले व त्यात ‘सबकुछ चलता है’ प्रवृत्ती बळावली, त्याचेच हे लक्षण म्हणता यावे.निवडणुका येतील-जातील, जय-पराजयही होत राहतील; मात्र प्रचाराच्या असल्या ‘वाट्टेल त्या’ तंत्रातून कुणाच्या का होईना प्रतिमेवर ओढले जाणारे ओरखडे आणि त्याद्वारे गढुळणारे समाजमन हे चिंतेचाच विषय ठरावे. पण काळ इतका वेगाने पुढे सरकत आहे आणि निवडणुकीच्या रणांगणात यश मिळवण्याकरिता इतकी काही अटीतटीची लढाई चालली आहे की, प्रचारातील योग्य-अयोग्यतेचे भानच कुणाकडून राखले जाताना दिसत नाही. असे भान नसलेल्या व ताळतंत्र सोडून प्रचार करू पाहणाऱ्यांना आपल्या मताधिकाराच्या उपयोगाने ताळ्यावर आणण्याचे काम मतदारांनाच करावे लागणारे आहे.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकPoliticsराजकारण