शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

Lok Sabha Election 2019 : इतिहास चाळताना...वैचारिक मुद्यांवर लातूरच्या ऐतिहासिक लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 3:33 PM

सुसंस्कृत राजकारणाचा ‘लातूर पॅटर्न’ 

- धर्मराज हल्लाळे

लातूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहिली लढत झाली ती शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील आणि काँग्रेसचे पी.जी. पाटील यांच्यात. या लढतीत भाई उद्धवराव पाटील यांनी बाजी मारली. पुढे १९८० पासून २००४ पर्यंत शिवराज पाटील चाकूरकर यांनी सात वेळा या मतदारसंघाचे विजयी नेतृत्व केले. देशपातळीवर मुद्दे त्यांनी प्रचारात आणले. वैयक्तिक टीकेचा तर विषयच नसायचा. पक्षाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरण ते मतदारांना पटवून सांगत असत. जातीय समिकरणांचा कधी मेळ घातला नाही. त्यामुळेच शिवराज पाटील चाकूरकर १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६, १९९८, १९९९ सातवेळा या मतदारसंघातून विजयी झाले. एस. काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील, जनता दलाचे डॉ. बापूसाहेब काळदाते, भाजपाचे डॉ. गोपाळराव पाटील आदी दिग्गज नेत्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात दंड थोपटले होते. 

१९८४ ची काँग्रेस विरुद्ध एस. काँग्रेस ही लढत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या एस. काँग्रेसच्या तिकिटावर लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात डॉ. पद्मसिंह पाटील यांना उतरविले. या निवडणुकीत चमत्कार होईल, असे राजकीय अंदाज बांधले गेले. परंतु, या तुल्यबळ लढतीत डॉ. पद्मसिंह पाटील यांना २ लाख ३ हजार १२९ तर चाकूरकर यांना २ लाख ८१ हजार ४३६ मते मिळाली. ७८ हजार ३३७ मतांनी चाकूरकर यांचा या निवडणुकीत विजय झाला. १९८९ ला डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी चाकूरकरांच्या विरोधात तुल्यबळ लढत दिली. काँग्रेस विरुद्ध जनता दल अशी दुरंगी लढत झाली. त्यात चाकूरकर यांनी ३ लाख ४ हजार ७३३ मते घेऊन विजय मिळविला. तर बापूसाहेब काळदातेंना २ लाख ६० हजार ८७८ मते मिळाली होती. त्यानंतर १९९६ ला बापूसाहेब काळदाते पुन्हा चाकूरकरांच्या विरोधात उतरले. समोर शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे डॉ. गोपाळराव पाटील होते. तिरंगी लढत झाली. तिघेही दिग्गज. कोण बाजी मारणार, असा प्रश्न होता. महाराष्ट्रात जनता दलाचे वारे होते. त्यामुळे राजकीय विश्लेषक याच अंगाने अंदाज बांधत होते. पण या तिरंगी लढतीतही शिवराज पाटील चाकूरकर यांनी बाजी मारली. २ लाख ७९ हजार ७७५ मते त्यांनी घेतली. गोपाळराव पाटील २ लाख ४०३ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर बापूसाहेब काळदाते यांना १ लाख ३८ हजार ७२५ मते मिळाली अन् ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. जातीय समिकरणे नाहीत, एकमेकांची उणीदुणी नाही की, व्यक्तिगत टीका नसलेल्या या लढतीने सुसंस्कृत आदर्श पाया रचला आहे. 

१९७७ ला अस्तित्वात आलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक आणि वैचारिक मुद्यांवर लक्षवेधी लढती झाल्या असून, सुसंस्कृत राजकारणाचा लातूर पॅटर्न म्हणून या लढतींकडे आदराने पाहिले गेले आहे. वैयक्तिक टीकेचा लवलेश नाही की, एकमेकांची उणीदुणी नाहीत. केवळ विकास आणि राजकीय मुद्यांवर लढण्याची परंपरा लातूर लोकसभा मतदारसंघाने देशात निर्माण केली आहे. 

विकास अन् पक्षाचे धोरण...लातूर लोकसभा मतदारसंघात शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. बापूसाहेब काळदाते, डॉ. गोपाळराव पाटील या दिग्गज नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या. प्रचारात कधी व्यक्तिगत टीका नाही, भाषाही सुसंस्कृत, राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा लवलेशही नाही. विकास आणि पक्षाचे राष्ट्रीय धोरण आपापल्या शैलीत त्यांनी मतदारांसमोर मांडले. ही परंपरा सहाव्या लोकसभा निवडणुकीपासून आहे. १९८० पासून चौदाव्या लोकसभेपर्यंत चाकूरकर काँग्रेसकडून लढत राहिले आणि ते सातवेळा विजयीही झाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlatur-pcलातूरShivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकर