शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

विशेष लेख: तुमचाच गेरू, तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा

By यदू जोशी | Updated: April 6, 2024 09:54 IST

Amravati lok sabha constituency: अमरावतीच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे सुदाम देशमुख. ते अचलपूरच्या गिरणीत कामगार होते, त्यातून कम्युनिस्ट चळवळीत गेले. आयुष्यभर फकिरी वृत्तीने जगले. पँट-शर्ट अन् चप्पल असा वेश होता. मनाला भिडणारे भाषण करत. लहेजा बराचसा वऱ्हाडी असायचा.

 - यदु जोशीअमरावतीच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे सुदाम देशमुख. ते अचलपूरच्या गिरणीत कामगार होते, त्यातून कम्युनिस्ट चळवळीत गेले. आयुष्यभर फकिरी वृत्तीने जगले. पँट-शर्ट अन् चप्पल असा वेश होता. मनाला भिडणारे भाषण करत. लहेजा बराचसा वऱ्हाडी असायचा. समाज प्रबोधनाच्या चळवळीत संत गाडगेबाबांनी जे केले तेच निरपेक्ष भावनेने राजकारणही करता येते हे काकांनी कृतीतून सिद्ध केले. कितीही सत्तापदे मिळाली तरी अभावात जगणे हा त्यांचा स्थायिभाव होता. दोन वेळा अचलपूरचे आमदार होते. 

१९८९ ची लोकसभा निवडणूक लागली. काँग्रेसच्या दिग्गज नेत्या उषाताई चौधरी रिंगणात होत्या. इतर सर्वपक्षीयांनी (त्यात काही काँग्रेस नेतेही होते) सुदामकाकांना गळ घातली; तुम्ही लढले पाहिजे. ते उभे राहिले आणि फाटक्या माणसांपासून सगळ्यांनी आपणच उमेदवार असल्याचे मानून ती निवडणूक लढवली. काकांजवळ पैसे होते कुठे? रिक्षावाले, भाजीवाले, हातठेलेवाल्यांपासून सगळ्यांनी दोन रुपये, पाच रुपये गोळा करून निवडणूक निधी उभा केला. आज ज्यांना विविध राजकीय पक्षांचे लोक पैसा वाटतात अशा गरिबांनी काकांसाठी पैसा उभा केला. प्रचारात फारशा गाड्या वगैरे नसायच्या; पण काकांच्या प्रचारातील गाडी पेट्रोलपंपावर आली की बिनापैशांनी टंकी फुल व्हायची. काही दुकानदार ग्राहकाला बदाम खायला द्यायचे अन् म्हणायचे, ‘खाओ बदाम, लाओ सुदाम.’ हयातभर रस्त्यावरची लढाई लढलेल्या या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचा सामान्य माणूस हाच स्टार प्रचारक होता. काका कम्युनिस्ट पक्षाचे होते; पण कोणीही त्यांचा पक्ष पाहिला नाही, जात विचारली नाही. प्रभाकरराव वैद्य, बाळासाहेब मराठे अशा अमरावतीतील पितृतुल्य व्यक्ती त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्या निवडणुकीत मतदारसंघातील भिंतींवरचा एक नारा आजही अमरावतीकरांच्या लक्षात आहे, ‘तुमचाच गेरू, तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा.’

साधेपणा, त्याग, नैतिकता हे काकांसाठी बोलण्याचे नाही तर कृतीचे विषय होते. ते अनवाणी फिरत, मग कोणी तरी त्यांना स्लिपर, चप्पल घेऊन देई. मग कोणी अनवाणी दिसला की काका त्यांना चप्पल देऊन टाकत. अखंड समाजसेवेला वाहून घेतलेल्या या नेत्याला लोक विचारायचे, ‘काका! तुम्ही लग्न का नाही केले?’ काका म्हणायचे, ‘अरे बेटा, कामाच्या गडबडीत लक्षातच नाही राहिले.’ अमरावतीत नमुना गल्लीत दहा बाय दहाच्या खोलीत ते राहायचे. तिथेच सगळ्यांना भेटायचे, कोणताही आडपडदा नव्हता, सामान्य रिक्षावालाही त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलू शकत असे, आजच्या नेत्यांकडे पाहून हे सगळे खरे वाटणार नाही. लोकसभेला ते १ लाख ४० हजार २३९ एवढ्या मोठ्या मताधिक्याने जिंकले. त्यांच्या विजयी मिरवणुकीत लोकांनी आपापल्या परीने गोडधोड वाटले, सुदाम्याचे पोहे अन् साखरही वाटली. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. 

सुदामकाकांच्या ठायी पारदर्शकता किती असावी? त्यावेळी खासदारांना दहा गॅस कनेक्शन आणि दहा टेलिफोन कनेक्शन वाटण्याचा कोटा दिला जायचा. सुदामकाकांनी आपलातुपला न करता त्यांच्याकडे ते मागण्यासाठी आलेल्या लोकांची निवड ईश्वरचिठ्ठीने केली. स्वत:साठी काहीही ठेवून घेतले नाही. सामान्यांशी कधीही नाळ तुटू न देणाऱ्या या सत्शील नेत्याच्या बँक खात्यात पैसे नव्हते, पण ते गेले त्या दिवशी लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी होते, हीच त्यांची कमाई होती.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४amravati-pcअमरावतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४