शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विशेष लेख: तुमचाच गेरू, तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा

By यदू जोशी | Updated: April 6, 2024 09:54 IST

Amravati lok sabha constituency: अमरावतीच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे सुदाम देशमुख. ते अचलपूरच्या गिरणीत कामगार होते, त्यातून कम्युनिस्ट चळवळीत गेले. आयुष्यभर फकिरी वृत्तीने जगले. पँट-शर्ट अन् चप्पल असा वेश होता. मनाला भिडणारे भाषण करत. लहेजा बराचसा वऱ्हाडी असायचा.

 - यदु जोशीअमरावतीच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे सुदाम देशमुख. ते अचलपूरच्या गिरणीत कामगार होते, त्यातून कम्युनिस्ट चळवळीत गेले. आयुष्यभर फकिरी वृत्तीने जगले. पँट-शर्ट अन् चप्पल असा वेश होता. मनाला भिडणारे भाषण करत. लहेजा बराचसा वऱ्हाडी असायचा. समाज प्रबोधनाच्या चळवळीत संत गाडगेबाबांनी जे केले तेच निरपेक्ष भावनेने राजकारणही करता येते हे काकांनी कृतीतून सिद्ध केले. कितीही सत्तापदे मिळाली तरी अभावात जगणे हा त्यांचा स्थायिभाव होता. दोन वेळा अचलपूरचे आमदार होते. 

१९८९ ची लोकसभा निवडणूक लागली. काँग्रेसच्या दिग्गज नेत्या उषाताई चौधरी रिंगणात होत्या. इतर सर्वपक्षीयांनी (त्यात काही काँग्रेस नेतेही होते) सुदामकाकांना गळ घातली; तुम्ही लढले पाहिजे. ते उभे राहिले आणि फाटक्या माणसांपासून सगळ्यांनी आपणच उमेदवार असल्याचे मानून ती निवडणूक लढवली. काकांजवळ पैसे होते कुठे? रिक्षावाले, भाजीवाले, हातठेलेवाल्यांपासून सगळ्यांनी दोन रुपये, पाच रुपये गोळा करून निवडणूक निधी उभा केला. आज ज्यांना विविध राजकीय पक्षांचे लोक पैसा वाटतात अशा गरिबांनी काकांसाठी पैसा उभा केला. प्रचारात फारशा गाड्या वगैरे नसायच्या; पण काकांच्या प्रचारातील गाडी पेट्रोलपंपावर आली की बिनापैशांनी टंकी फुल व्हायची. काही दुकानदार ग्राहकाला बदाम खायला द्यायचे अन् म्हणायचे, ‘खाओ बदाम, लाओ सुदाम.’ हयातभर रस्त्यावरची लढाई लढलेल्या या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचा सामान्य माणूस हाच स्टार प्रचारक होता. काका कम्युनिस्ट पक्षाचे होते; पण कोणीही त्यांचा पक्ष पाहिला नाही, जात विचारली नाही. प्रभाकरराव वैद्य, बाळासाहेब मराठे अशा अमरावतीतील पितृतुल्य व्यक्ती त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्या निवडणुकीत मतदारसंघातील भिंतींवरचा एक नारा आजही अमरावतीकरांच्या लक्षात आहे, ‘तुमचाच गेरू, तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा.’

साधेपणा, त्याग, नैतिकता हे काकांसाठी बोलण्याचे नाही तर कृतीचे विषय होते. ते अनवाणी फिरत, मग कोणी तरी त्यांना स्लिपर, चप्पल घेऊन देई. मग कोणी अनवाणी दिसला की काका त्यांना चप्पल देऊन टाकत. अखंड समाजसेवेला वाहून घेतलेल्या या नेत्याला लोक विचारायचे, ‘काका! तुम्ही लग्न का नाही केले?’ काका म्हणायचे, ‘अरे बेटा, कामाच्या गडबडीत लक्षातच नाही राहिले.’ अमरावतीत नमुना गल्लीत दहा बाय दहाच्या खोलीत ते राहायचे. तिथेच सगळ्यांना भेटायचे, कोणताही आडपडदा नव्हता, सामान्य रिक्षावालाही त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलू शकत असे, आजच्या नेत्यांकडे पाहून हे सगळे खरे वाटणार नाही. लोकसभेला ते १ लाख ४० हजार २३९ एवढ्या मोठ्या मताधिक्याने जिंकले. त्यांच्या विजयी मिरवणुकीत लोकांनी आपापल्या परीने गोडधोड वाटले, सुदाम्याचे पोहे अन् साखरही वाटली. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. 

सुदामकाकांच्या ठायी पारदर्शकता किती असावी? त्यावेळी खासदारांना दहा गॅस कनेक्शन आणि दहा टेलिफोन कनेक्शन वाटण्याचा कोटा दिला जायचा. सुदामकाकांनी आपलातुपला न करता त्यांच्याकडे ते मागण्यासाठी आलेल्या लोकांची निवड ईश्वरचिठ्ठीने केली. स्वत:साठी काहीही ठेवून घेतले नाही. सामान्यांशी कधीही नाळ तुटू न देणाऱ्या या सत्शील नेत्याच्या बँक खात्यात पैसे नव्हते, पण ते गेले त्या दिवशी लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी होते, हीच त्यांची कमाई होती.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४amravati-pcअमरावतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४