शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लेख: तोकडी तरतूद! 2300 रुपये हवे, मिळाले जेमतेम 700 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 12:18 IST

सार्वजनिक आरोग्याकरिता दरडोई किमान २३०० रुपयांची तरतूद केली पाहिजे. यावर्षी ती सातशेहून थोडी अधिक, म्हणजेच तोकडी आहे.

-डॉ. प्रदीप आवटे (सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचे विश्लेषक)

सार्वजनिक आरोग्यासाठीची आर्थिक तरतूद आपल्या एकूण सकल उत्पादनाच्या किमान अडीच टक्के असावी असे गेली काही वर्षे आपले उद्दिष्ट राहिलेले आहे आणि २०२५ पर्यंत आपण ते गाठू, असा एक आशावादही ! यावर्षीच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्यासाठी ९८,३११ कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. 

ती मागील वर्षीपेक्षा आठ हजार कोटींनी जरी अधिक असली तरी ती 'जीडीपी'च्या १.८ टक्क्यांच्या आसपास आहे म्हणजे अजूनही अडीच टक्क्यांचा टप्पा आपल्याला गाठता आलेला नाही. सार्वजनिक आरोग्याकरिता आपण दरडोई किमान रुपये २३०० एवढा खर्च केला पाहिजे. मागील वर्षी ही तरतूद दरडोई ६९० रु. एवढी होती. यावर्षी ती सातशेहून थोडी अधिक एवढी आहे, म्हणजेच तोकडी आहे.

वैद्यकीय शिक्षणाच्या दहा हजार जागा वाढविण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. आरोग्य मनुष्यबळ विकास निकडीचा असताना देशातील वैद्यकीय शिक्षणाचे बेसुमार खासगीकरण झाल्याने वैद्यकीय शिक्षण सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. म्हणूनच वैद्यकीय शिक्षणाचे वारेमाप खासगीकरण रोखणे आणि या शिक्षणाची गुणवत्ता राखत हे शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल याचा सांगोपांग विचार करणे आवश्यक आहे.

कॅन्सर उपचाराकरिता लागणारी; तसेच इतर जीवनावश्यक अशी सुमारे ३६ औषधे आयात शुल्कमुक्त करणे हा अत्यंत स्तुत्य निर्णय तथापि निव्वळ काही मूठभर औषधे स्वस्त करण्यापेक्षाही एकूणच औषधे स्वस्त कशी मिळतील , याकरिता औषध कंपन्यांच्या लॉबीचे वर्चस्व झुगारून आणखी काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. कॅन्सर रुग्णांसाठी २०० 'डे-केअर' सेंटरचा फायदा अनेक रुग्णांना होईल.

गिग वर्कर्स अर्थात असंघटित क्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपात छोटी-छोटी कामे करणारे कामगार 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजने' अंतर्गत आरोग्य विम्याच्या छायेखाली येणे ही आनंदाची गोष्ट आहे. गेली काही वर्षे आपण आयुष्मान भारत आणि इतर योजनांच्या आधारे आरोग्य विम्याचे एक मॉडेल देशात विकसित करतो आहोत. अमेरिकेचा अनुभव लक्षात घेतला तर या मॉडेलमध्ये प्रचंड पैसा तर खर्च होतो; पण सार्वजनिक आरोग्यातील मूलभूत निर्देशांक सुधारण्याच्या अनुषंगाने फारसा फायदा होत नाही. 

इन्शुरन्स कपन्याचेच उखळ पाढरे होताना दिसते. त्यामुळे भारताने इंग्लंडचे नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचे मॉडेल स्वीकारून बहुतेक सर्व आरोग्य सेवा जनतेला मोफत, तर काही विशिष्ट सेवा अल्पदरात देण्याचे धोरण अवलंबिले पाहिजे आणि आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था विशेषतः प्रथम आणि दुसऱ्या स्तरावरील दवाखाने, रुग्णालये अधिक सुदृढ कसे होतील, यादृष्टीने सातत्यपूर्ण आणि आश्वासक प्रयत्न करायला हवेत. कारण एकूणच आजारी पडणाऱ्यांपैकी केवळ तीन टक्के लोकांना प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये भरती होण्याची आणि आरोग्य विम्याची गरज पडते हे लक्षात घेतले पाहिजे. 

सध्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कंत्राटी, अस्थिर मनुष्यबळाच्या प्रश्नाशी झगडते आहे. उपकेंद्र स्तरावर 'हेल्थ अँड वेलनेस सेंटर' सुरू केली आहेत तीसुद्धा कंत्राटी मनुष्यबळाच्या आधारावर! प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. ही केंद्रे अधिक बळकट, सक्षम आणि लोकोपयोगी कशी होतील, यादृष्टीने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. तसे काही या अर्थसंकल्पाने केलेले नाही, हे मात्र खरे!

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५Healthआरोग्यnirmala sitharamanनिर्मला सीतारामनCentral Governmentकेंद्र सरकार