शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोणालाही कांदा रडविणार नाही याची काळजी घ्यायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 11:32 IST

शासनदरबारी मात्र कांद्याचा उत्पादन खर्च ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल असा मांडला जातो. सध्या मिळत असलेला दर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे.

दरवर्षीप्रमाणे आताही कांदा शेतकऱ्यांना रडवतो आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारची शेती हिताची भाषा केवळ बेगडी असल्याने त्यावर कोणताही उपाय करण्यात येत नाही. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ येते तेव्हा सरकार बहिरे बनते. कांद्याचे दर वाढून महागाई झाल्याची ओरड सुरू झाली की, सरकार खडबडून जागे होते आणि मागचा-पुढचा कोणताही विचार न करता कांद्याचे दर पाडण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसे गेले चार वर्षे चालू आहे. त्यात हवामान बदलाने अडचणीची भर घातली आहे. कांदा खरिपात आणि उन्हाळी अशा दोन हंगामात पिकतो. यावर्षी खरीप हंगामात पाऊस उशिरा सुरू झाला आणि पुढे तो एक महिना अधिक पडत राहिला. परिणामी, कांद्याची लागवड उशिरा झाली. तो आता काढणीला आला आहे.

कांद्याची आवक एकदम वाढली की, दर पाडून खरेदी करण्याची व्यापाऱ्यांची खोड आहे. त्याचा अभ्यास करूनच व्यापारी दर कसे पाडायचे, याचे आराखडे तयार करून बसलेले असतात. आताही ते घडत आहे. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते. आवक सुरू होताच प्रतिक्विंटलचा दर १,२०० वरून ६०० ते ७०० रुपयांपर्यंत खाली आला. कांद्याचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्च १,७५० येतो. शासनदरबारी मात्र कांद्याचा उत्पादन खर्च ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल असा मांडला जातो. सध्या मिळत असलेला दर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे. नाशिक जिल्ह्यातील नगरसूल गावचे शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांद्याला मिळत असलेल्या कमी दराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होळीच्या दिवशी कांद्याचीच होळी करण्याचा कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देणारे पत्र धाडले आहे. कृष्णा डोंगरे यांच्या संतापाचा अर्थ आपण साऱ्यांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सरकार आता तातडीने कांद्याच्या बाजारात हस्तक्षेप करेल, असे वाटत नाही. कांदा प्रतिकिलो पाच ते सात रुपयांनी विकला गेला आणि ग्राहकांना तो पंधरा ते वीस रुपयांना मिळत राहिला, तर सरकारची जबाबदारी संपते. महागाई वाढली अशी ओरड होण्याचे कारणच उद्भवत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र कंबरडे मोडणार आहे. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आधीच झाला आहे. आता कांदा खपविणे एवढेच त्याच्या हाती राहिले आहे. वास्तविक, दरवर्षीच्या हवामानाच्या बदलानुसार कांद्याचे कमी-अधिक उत्पादन होते. त्याचा मध्य साधून, दर पाडल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होणार नाही, यासाठी प्रसंगी बाजारपेठेत हस्तक्षेप करण्याची तयारी सरकारने केली पाहिजे. त्यासाठी दरवर्षीच्या हवामानाचा अंदाज, बाजारपेठेतील दर, पुरवठा, अपेक्षित उत्पादन, प्रत्यक्ष होणारे उत्पादन, उत्पादन खर्च, आदींचा अभ्यास करणारी यंत्रणा उभी करायला हवी. ती कधी उभीच केली गेली नाही. कांद्याचे दर वाढले की, कांदा ग्राहकाला रडवितो म्हणायचे आणि दर कोसळले की उत्पादक शेतकऱ्यांना रडवितो, अशी खंत व्यक्त करून हात बांधून बसायचे!

राजकीय फायद्या-तोट्याचा विचार कसा सुचताे? अचानक निर्यातबंदी कशी होते? कांद्यासारखीच परिस्थिती यावर्षी गव्हासंबंधी होणार होती. सरकार मोठ्या प्रमाणात गहू खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना त्याची चिंता तुलनेने कमी असते. यावर्षी पुन्हा गहू उत्पादकांना फटका बसणार आहे, असे दिसते. गतवर्षी हिवाळ्याचे दिवस कमी होते. उन्हाळा लवकर सुरू झाल्याने उतारा कमी पडला. परिणामी, शेतकऱ्यांचे उत्पादन घटले. आतादेखील फेब्रुवारीमध्येच थंडी गायब होऊन उन्हाचा तडाखा ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. केंद्र सरकारच्या कृषी खात्याने या हंगामात बंपर उत्पादन होणार, असा अंदाज बांधला होता. मान्सूनचे दिवस वाढल्याने गव्हाला पोषक परिस्थिती होती. लागवडीचे क्षेत्रही वाढले आहे. थंडीवर येणारे हे पीक उन्हाचे चटके बसू लागले की, उत्पादनावर परिणाम होतो. आता तसेच होणार अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. याचा अंदाज बांधून गव्हाचा साठा, अपेक्षित नवे उत्पादन आणि एकूण मागणीचे गणित मांडून दर वाढल्याने किंवा पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यापैकी कोणालाही कांदा रडविणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तसे मात्र अपवादानेच घडते.

टॅग्स :onionकांदा